शहरं
Join us  
Trending Stories
1
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
2
Maharashtra Rain: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
3
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
4
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
5
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
6
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
7
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
8
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
9
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
10
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
11
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
12
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
13
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
14
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
15
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
16
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
17
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!
18
...तर मी ट्रेनमधून पडून मेलो असतो; एक चूक अन् आयुष्य संपलं असतं, 'मुरांबा'मधील अभिनेत्याने सांगितला धक्कादायक प्रसंग
19
महिन्याला ३० हजार कमावणारेही होऊ शकतात कोट्यधीश, 'अशी' करू शकता गुंतवणूक
20
Black Box: अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले

सात कृषी सेवा केंद्राच्या तपासणीत आढळल्या त्रूटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2019 16:37 IST

वाशिम : कृषी विभागातर्फे कृषी सेवा केंद्रांची झाडाझडती घेतली जात असून, ५ ते ७ जुलैदरम्यान वाशिम शहरातील एकूण सात कृषी सेवा केंद्राच्या तपासणीत काही त्रूटी आढळून आल्या.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : कृषी विभागातर्फे कृषी सेवा केंद्रांची झाडाझडती घेतली जात असून, ५ ते ७ जुलैदरम्यान वाशिम शहरातील एकूण सात कृषी सेवा केंद्राच्या तपासणीत काही त्रूटी आढळून आल्या. दोन कृषी सेवा केंद्रातील सात लाख रुपये किंमतीचे तणनाशक व किटकनाशक तसेच पाच कृषी सेवा केंद्रातील सोयाबीन बियाण्याच्या १६३ बॅग विक्री बंदचे आदेश कृषी विभागाने दिले. खरिप हंगामात शेतकºयांची फसवणूक होणार नाही याची दक्षता कृषी सेवा केंद्रांनी घ्यावी तसेच अवैध मार्गाने खते व बियाणे विक्री करू नये अशा सूचना कृषी विभागाने दिलेल्या आहेत. काही कृषी सेवा केंद्र याची दक्षता घेत आहेत तर काही कृषी सेवा केंद्रांमध्ये नियमांची अंमलबजावणी केली जात नसल्याच्या तक्रारी कृषी विभागाकडे प्राप्त होत आहेत. यासंदर्भात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार यांनी आढावा घेत तपासणी क रण्याचे निर्देश दिले. त्याअनुषंगाने ३ जुलैपासून जिल्हास्तरीय तसेच तालुकास्तरीय भरारी पथकातर्फे तपासणी केली जात आहे. वाशिम पंचायत समिती कृषी विभागाकडून ५ ते ७ जुलै दरम्यान तपासणी केली असता, काही कृषी सेवा केंद्राच्या नोंदवहीत त्रूटी आढळून आल्या.  नियमांचे उल्लंघन करणाºया दोन कृषी सेवा केंद्रातील सात लाख ६१ हजार २१४ रुपये किंमतीचे ६०१ लिटर तणनाशक व कीटकनाशक विक्रीस बंदी घालण्यात आली आहे तसेच त्यांना सात दिवसात त्रुटींची पूर्तता व खुलासा सादर करणेसाठी नोटिस बजावण्यात आली. विक्री परवानामध्ये समविष्ट नसलेली उत्पादने खरेदी-विक्री करीत असल्याने सदर विक्री बंद आदेश देण्यात आले. तसेच साठा फलक व साठा पुस्तक अद्यावत न ठवणे, मुक्तता अहवाल आढळून न आलेल्या पाच  कृषी सेवा केंद्रातील दोन लाख ९ हजार ७०० रुपये किंमतीच्या सोयाबीन बियाण्याच्या १६३ बॅगवर तसेच तूरीच्या ९ बॅगवरसुद्धा विक्री बंद आदेश देण्यात आले. खबरदारी म्हणून बियाण्यांचे २१ नमुने व खतांचे पाच नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले असून, तपासणी अहवाल प्राप्त होताच पुढील कारवाई केली जाईल, असे कृषी विभागाने स्पष्ट केले. 

 टोल फ्री क्रमांकावर करता येईल तक्रार !शेतकºयांनी कृषी निविष्ठांची खरेदी ही अधिकृत विक्रेत्यांकडूनच करावी, पक्के बिल घ्यावे, असे आवाहन कृषी विभागाने केले. खते, बियाणे, किटकनाशक आदीसंदर्भात काही तक्रार असल्यास तालुका कृषी अधिकारी, पंचायत समितीचे कृषी अधिकारी किंवा कृषी विभागाचा १८००२३३४००० या टोल फ्री क्रमांकावरही शेतकºयांना तक्रार नोंदविता येणार आहे. कृषि सेवा केंद्रधारकांनी आपल्या परवान्यात समाविष्ठ असलेल्या उत्पादनांचीच खरेदी-विक्री करावी. ज्या उत्पादनांची खरेदी-विक्री करावयाची आहेत ती आपल्या परवान्यामध्ये समाविष्ट करून घेण्यासाठी प्रक्रिया करावी व परवाना अधिकारी यांची मान्यता असल्यास विक्री करावी, अशा सूचना पंचायत समितीचे कृषी अधिकारी तथा गुण नियंत्रण निरीक्षक रमेश भद्रोड यांनी केल्या.

टॅग्स :washimवाशिम