शहरं
Join us  
Trending Stories
1
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
2
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
3
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
4
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
5
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
6
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
7
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
8
येत्या ११ नोव्हेंबरला प्रभागात कोणाची लागणार लॉटरी? मुंबईकरांसह सर्वपक्षीय नगरसेवकांचे लक्ष
9
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
10
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
11
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
12
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
13
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
14
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
15
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
16
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
17
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
18
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
19
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
20
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...

सात कृषी सेवा केंद्राच्या तपासणीत आढळल्या त्रूटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2019 16:37 IST

वाशिम : कृषी विभागातर्फे कृषी सेवा केंद्रांची झाडाझडती घेतली जात असून, ५ ते ७ जुलैदरम्यान वाशिम शहरातील एकूण सात कृषी सेवा केंद्राच्या तपासणीत काही त्रूटी आढळून आल्या.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : कृषी विभागातर्फे कृषी सेवा केंद्रांची झाडाझडती घेतली जात असून, ५ ते ७ जुलैदरम्यान वाशिम शहरातील एकूण सात कृषी सेवा केंद्राच्या तपासणीत काही त्रूटी आढळून आल्या. दोन कृषी सेवा केंद्रातील सात लाख रुपये किंमतीचे तणनाशक व किटकनाशक तसेच पाच कृषी सेवा केंद्रातील सोयाबीन बियाण्याच्या १६३ बॅग विक्री बंदचे आदेश कृषी विभागाने दिले. खरिप हंगामात शेतकºयांची फसवणूक होणार नाही याची दक्षता कृषी सेवा केंद्रांनी घ्यावी तसेच अवैध मार्गाने खते व बियाणे विक्री करू नये अशा सूचना कृषी विभागाने दिलेल्या आहेत. काही कृषी सेवा केंद्र याची दक्षता घेत आहेत तर काही कृषी सेवा केंद्रांमध्ये नियमांची अंमलबजावणी केली जात नसल्याच्या तक्रारी कृषी विभागाकडे प्राप्त होत आहेत. यासंदर्भात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार यांनी आढावा घेत तपासणी क रण्याचे निर्देश दिले. त्याअनुषंगाने ३ जुलैपासून जिल्हास्तरीय तसेच तालुकास्तरीय भरारी पथकातर्फे तपासणी केली जात आहे. वाशिम पंचायत समिती कृषी विभागाकडून ५ ते ७ जुलै दरम्यान तपासणी केली असता, काही कृषी सेवा केंद्राच्या नोंदवहीत त्रूटी आढळून आल्या.  नियमांचे उल्लंघन करणाºया दोन कृषी सेवा केंद्रातील सात लाख ६१ हजार २१४ रुपये किंमतीचे ६०१ लिटर तणनाशक व कीटकनाशक विक्रीस बंदी घालण्यात आली आहे तसेच त्यांना सात दिवसात त्रुटींची पूर्तता व खुलासा सादर करणेसाठी नोटिस बजावण्यात आली. विक्री परवानामध्ये समविष्ट नसलेली उत्पादने खरेदी-विक्री करीत असल्याने सदर विक्री बंद आदेश देण्यात आले. तसेच साठा फलक व साठा पुस्तक अद्यावत न ठवणे, मुक्तता अहवाल आढळून न आलेल्या पाच  कृषी सेवा केंद्रातील दोन लाख ९ हजार ७०० रुपये किंमतीच्या सोयाबीन बियाण्याच्या १६३ बॅगवर तसेच तूरीच्या ९ बॅगवरसुद्धा विक्री बंद आदेश देण्यात आले. खबरदारी म्हणून बियाण्यांचे २१ नमुने व खतांचे पाच नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले असून, तपासणी अहवाल प्राप्त होताच पुढील कारवाई केली जाईल, असे कृषी विभागाने स्पष्ट केले. 

 टोल फ्री क्रमांकावर करता येईल तक्रार !शेतकºयांनी कृषी निविष्ठांची खरेदी ही अधिकृत विक्रेत्यांकडूनच करावी, पक्के बिल घ्यावे, असे आवाहन कृषी विभागाने केले. खते, बियाणे, किटकनाशक आदीसंदर्भात काही तक्रार असल्यास तालुका कृषी अधिकारी, पंचायत समितीचे कृषी अधिकारी किंवा कृषी विभागाचा १८००२३३४००० या टोल फ्री क्रमांकावरही शेतकºयांना तक्रार नोंदविता येणार आहे. कृषि सेवा केंद्रधारकांनी आपल्या परवान्यात समाविष्ठ असलेल्या उत्पादनांचीच खरेदी-विक्री करावी. ज्या उत्पादनांची खरेदी-विक्री करावयाची आहेत ती आपल्या परवान्यामध्ये समाविष्ट करून घेण्यासाठी प्रक्रिया करावी व परवाना अधिकारी यांची मान्यता असल्यास विक्री करावी, अशा सूचना पंचायत समितीचे कृषी अधिकारी तथा गुण नियंत्रण निरीक्षक रमेश भद्रोड यांनी केल्या.

टॅग्स :washimवाशिम