शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

खासगी वाहतूकदारांचा व्यवसाय ‘लॉकडाउन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2020 11:08 IST

विविध प्रकारच्या खासगी वाहनांवर काढलेले कर्ज कसे फेडावे, याची चिंता वाहनमालकांना लागली आहे.

- शंकर वाघ लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर जैन : लॉकडाउन व संचारबंदीच्या काळात २४ मार्चपासून ते आजतागायत खासगी वाहतूक बंद असल्याने खासगी वाहतूकदारांना जबर फटका बसला आहे. विविध प्रकारच्या खासगी वाहनांवर काढलेले कर्ज कसे फेडावे, याची चिंता वाहनमालकांना लागली आहे.कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून २४ मार्चपासून लॉकडाउन व संचारबंदी लागू आहे. ३१ मे पर्यंत संचारबंदी व लॉकडाउनचा कालावधी वाढविण्यात आला आहे. लॉकडाउनमध्ये अनेक उद्योग, धंदे यासह लघु व्यावसाय बंद असल्याने याचा आर्थिक फटका व्यावसायिकांना बसला. २० एप्रिलनंतर जिल्ह्यात कृषीविषयक क्षेत्र तसेच ४ मे पासून अनेक व्यवसायांना मुभा मिळाली आहे. परंतू, खासगी प्रवासी वाहतूक बंद असल्याने याचा फटका खासगी वाहनधारकांना बसत आहे. प्रवासी वाहतूक करणारे आॅटो, काळीपिवळी, लक्झरी आदी खासगी बसचालकांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे.आॅटोद्वारे प्रवासी वाहतूक करून अनेक युवक आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. अशाच प्रकारे काळीपिवळी, प्रवासी वाहतूक करणाऱ्या लक्झरी बसेसचे मालक-चालकही प्रवासी व्यवसायातून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून खासगी प्रवासी वाहतूक बंद करण्यात आली. अद्यापही खासगी प्रवासी वाहतूक सुरू नसल्यामुळे वाहनांवर काढलेल्या कर्जाची परतफेड कशी करावी, याची चिंता वाहनमालकांना लागली आहे.

भरपाईची मागणीकोरोनामुळे २४ मार्चपासून देशात लॉकडाऊन पुकारण्यात आला. त्याची अंमलबजावणीही सुरू आहे. याचा सर्वाधिक फटका आॅटो, काळीपिवळी, खासगी बस चालक मालकांना बसत आहे. आॅटो, काळीपिवळी व खाजगी लक्झरी मालक, चालक, वाहकांची संख्या जास्त आहे. त्यामुळे शासनाने सहानुभूतीपूर्वक विचार करून खासगी प्रवासी वाहतुकदारांना दिलासा द्यावा, अशी मागणी प्रकाश बळी यांच्यासह अनेकांनी केली.

 

टॅग्स :washimवाशिमShirpur Jainशिरपूर जैन