शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
3
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
4
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
5
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
6
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
7
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
8
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
9
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
10
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
11
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
12
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
13
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
14
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
15
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
16
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
17
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
18
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
19
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
20
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या अंमलबजावणीस गती!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2019 14:32 IST

शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळण्याकरिता केंद्र शासनाने अंमलात आणलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेची अंमलबजावणी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याआधी थांबविण्यात आली होती.

वाशिम - शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळण्याकरिता केंद्र शासनाने अंमलात आणलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेची अंमलबजावणी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याआधी थांबविण्यात आली होती; मात्र आता याअंतर्गतच्या कामकाजास गती प्राप्त झाली असून १ लाख १५ हजार पात्र शेतकरी कुटूंबांपैकी पहिल्या हप्त्याच्या रकमेपासून वंचित १ लाख ८ हजार ३०२ शेतकरी कुटूंबांना पहिल्या हप्त्याची रक्कम लवकरच मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना अंमलात आल्यानंतर जिल्हास्तरावर पात्र शेतकरी कुटुंबाची माहिती संकलित करण्याची कार्यवाही ग्राम स्तरावरून सुरू करण्यात आली होती. त्यासाठी तलाठ्यांच्या नेतृत्वात ग्रामसेवक, कृषी सहायक आणि विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या सचिवांची समिती स्थापन करून ७ ते १० फेब्रुवारी २०१९ यादरम्यान समित्यांनी गावनिहाय पात्र खातेधारक शेतकऱ्यांची यादी तयार केली. त्या यादीचे १० ते १२ फेब्रुवारीदरम्यान कुटुंबनिहाय वर्गीकरण करण्यात आले. तसेच १५ ते २० फेब्रुवारीदरम्यान पात्र शेतकरी कुटुंबांची यादी त्या-त्या गावांमध्ये प्रसिद्ध करून त्यावर हरकती मागविण्यात आल्या. त्यानुसार, पात्र शेतकरी कुटुंबांच्या यादीमध्ये आवश्यक दुरुस्त्या करून अंतिम यादी २० ते २१ फेब्रुवारी दरम्यान त्या-त्या तहसील कार्यालयात प्रसिद्ध करून पात्र काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत देय असलेल्या पहिल्या हप्त्याची २ हजार रुपये रक्कम जमा करण्यात आली; मात्र १० मार्च २०१९ पासून लोकसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू झाल्याने अन्य योजनांप्रमाणेच प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचेही काम थांबविण्यात आले होते. यामुळे योजनांतर्गत लाभापासून हजारो पात्र शेतकरी वंचित राहिले. त्या सर्व संबंधितांना आता योजनेचा लाभ दिला जाणार असून थांबलेली मोहीम पुन्हा सुरू करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

जिल्ह्यातील ६,६९८ शेतकऱ्यांच्या खात्यात पहिल्या हप्त्याची रक्कम जमा

दोन हेक्टरपर्यंत शेत जमीन असलेल्या शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. याअंतर्गत तीन टप्प्यात प्रत्येकी २ हजार रुपये याप्रमाणे ६ हजार रुपयांची मदत केली जाणार असून जिल्ह्यातील ६ हजार ६९८ शेतकऱ्यांच्या खात्यात पहिल्या टप्प्यात २४ फेब्रुवारी २०१९ रोजी प्रत्येकी २ हजार रुपये जमा करण्यात आले आहेत. जिल्हयातील सुमारे १ लाख १५ हजार शेतकरी कुटूंबाना प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा लाभ मिळणार आहे.

 

टॅग्स :agricultureशेतीwashimवाशिम