शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
2
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
3
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
4
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
5
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
6
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
7
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
8
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
9
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
10
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
11
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
12
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
13
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
14
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
15
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
16
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
17
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
18
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
19
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
20
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  

पाण्याअभावी शेतकऱ्याने तोडली डाळींबाची झाडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2019 17:48 IST

येथील अनंता कुटे नामक शेतकºयावर एका एकरातील डाळींबांची झाडे तोडण्याची वेळ आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमूंगळा (वाशिम) : सततची नापिकी, तीन वर्षांपासून कमी झालेले पर्जन्यमान, उत्पन्नापेक्षा लागवड व संगोपन खर्च जास्त आदी कारणामुळे मुंगळा येथील अनंता कुटे नामक शेतकºयावर एका एकरातील डाळींबांची झाडे तोडण्याची वेळ आली आहे. डाळींबाच्या ३५० पैकी आतापर्यंत १२५ च्या आसपास झाडे तोडली असून, अद्याप कृषी किंवा महसूल यंत्रणेने पंचनामा केला नाही.मालेगाव तालुक्यातील मुंगळा येथील शेतकºयांनी पारंपारिक पिकांबरोबरच संत्रा, डाळींब या फळबागेलाही प्राधान्य दिले आहे. येथील अल्पभूधारक शेतकरी अनंता कुटे यांनी सहा, सात वर्षांपूर्वी एका एकरात डाळींबाची जवळपास ३५० झाडांची लागवड केली होती. विदर्भ कोकन ग्रामीण बँकेचे वैयक्तीक सर्वांच्या नावावर दीड लाख रुपये कर्ज काढुन विहीर व एक एकरावर डाळीबांची ३५० झाडांची लागवड केली. पहिल्या एक, दोन वर्षी बºयापैकी उत्पादन आले. पण कमी बाजारभावामुळे लागवड खर्च वजा जाता जेमतेम उत्पन्न मिळाले. डाळींबाची झाडे डोलदार असल्यामुळे हिम्मत न हरता त्यांनी वाटचाल ठेवली. गत तीन वर्षांपासून पर्जन्यमान कमी झाल्याने डाळींब बाग जगविण्याची कसरत कुटे यांना करावी लागत आहे. प्रकल्प व धरणातही पाणी नसल्याने सुरूवातीच्या काळात टँकरने पाणी देऊन डाळींब बाग जगविण्याचा प्रयत्न केला. परंतू, उत्पन्नापेक्षा संगोपन खर्च जास्त येत असल्याने कुटे यांच्यापुढे आर्थिक पेच निर्माण झाला. डाळींब बाग जगविण्यासाठी शासनाने अर्थसहाय्य करावे, अशी मागणी अनेक महिन्यांपासून करण्यात आली. मात्र, अद्याप याकडे शासन, प्रशासनाने लक्ष दिले नाही, असे अनंता कुटे यांनी सांगितले. यावर्षी भीषण पाणीटंचाई असल्यामुळे झाडाला फारशी फळधारणा झाली नाही. एप्रिल महिन्यापासून विहिर व बोअरवेलचे पाणी कमी झाल्याने आणि सिंचनाचा दुसरा कोणताही पर्याय नसल्याने नाईलाजास्तव डाळींबांची झाडे तोडण्याचा निर्णय घ्यावा लागला, असे कुटे यांनी सांगितले. आतापर्यंत जवळपास १२५ झाडे तोडली असून, कृषी किंवा महसूल विभागाने अद्याप पंचनामा केला नाही, असा दावाही कुटे यांनी केला. शासनाने नुकसानभरपाई द्यावी, फळबाग उत्पादक शेतकºयांना अनुदान द्यावे, अशी मागणीही कुटे सोमवार, २० मे रोजी यांनी केली.

टॅग्स :washimवाशिमagricultureशेतीFarmerशेतकरी