शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदारला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
5
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
6
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
7
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
8
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
9
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
10
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
11
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
12
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
13
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
14
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
15
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
16
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
17
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
18
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
19
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
20
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 

पाण्याअभावी शेतकऱ्याने तोडली डाळींबाची झाडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2019 17:48 IST

येथील अनंता कुटे नामक शेतकºयावर एका एकरातील डाळींबांची झाडे तोडण्याची वेळ आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमूंगळा (वाशिम) : सततची नापिकी, तीन वर्षांपासून कमी झालेले पर्जन्यमान, उत्पन्नापेक्षा लागवड व संगोपन खर्च जास्त आदी कारणामुळे मुंगळा येथील अनंता कुटे नामक शेतकºयावर एका एकरातील डाळींबांची झाडे तोडण्याची वेळ आली आहे. डाळींबाच्या ३५० पैकी आतापर्यंत १२५ च्या आसपास झाडे तोडली असून, अद्याप कृषी किंवा महसूल यंत्रणेने पंचनामा केला नाही.मालेगाव तालुक्यातील मुंगळा येथील शेतकºयांनी पारंपारिक पिकांबरोबरच संत्रा, डाळींब या फळबागेलाही प्राधान्य दिले आहे. येथील अल्पभूधारक शेतकरी अनंता कुटे यांनी सहा, सात वर्षांपूर्वी एका एकरात डाळींबाची जवळपास ३५० झाडांची लागवड केली होती. विदर्भ कोकन ग्रामीण बँकेचे वैयक्तीक सर्वांच्या नावावर दीड लाख रुपये कर्ज काढुन विहीर व एक एकरावर डाळीबांची ३५० झाडांची लागवड केली. पहिल्या एक, दोन वर्षी बºयापैकी उत्पादन आले. पण कमी बाजारभावामुळे लागवड खर्च वजा जाता जेमतेम उत्पन्न मिळाले. डाळींबाची झाडे डोलदार असल्यामुळे हिम्मत न हरता त्यांनी वाटचाल ठेवली. गत तीन वर्षांपासून पर्जन्यमान कमी झाल्याने डाळींब बाग जगविण्याची कसरत कुटे यांना करावी लागत आहे. प्रकल्प व धरणातही पाणी नसल्याने सुरूवातीच्या काळात टँकरने पाणी देऊन डाळींब बाग जगविण्याचा प्रयत्न केला. परंतू, उत्पन्नापेक्षा संगोपन खर्च जास्त येत असल्याने कुटे यांच्यापुढे आर्थिक पेच निर्माण झाला. डाळींब बाग जगविण्यासाठी शासनाने अर्थसहाय्य करावे, अशी मागणी अनेक महिन्यांपासून करण्यात आली. मात्र, अद्याप याकडे शासन, प्रशासनाने लक्ष दिले नाही, असे अनंता कुटे यांनी सांगितले. यावर्षी भीषण पाणीटंचाई असल्यामुळे झाडाला फारशी फळधारणा झाली नाही. एप्रिल महिन्यापासून विहिर व बोअरवेलचे पाणी कमी झाल्याने आणि सिंचनाचा दुसरा कोणताही पर्याय नसल्याने नाईलाजास्तव डाळींबांची झाडे तोडण्याचा निर्णय घ्यावा लागला, असे कुटे यांनी सांगितले. आतापर्यंत जवळपास १२५ झाडे तोडली असून, कृषी किंवा महसूल विभागाने अद्याप पंचनामा केला नाही, असा दावाही कुटे यांनी केला. शासनाने नुकसानभरपाई द्यावी, फळबाग उत्पादक शेतकºयांना अनुदान द्यावे, अशी मागणीही कुटे सोमवार, २० मे रोजी यांनी केली.

टॅग्स :washimवाशिमagricultureशेतीFarmerशेतकरी