शहरं
Join us  
Trending Stories
1
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
2
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
3
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
4
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
5
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
6
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
7
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?
8
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
9
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार
10
केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचं तिकीट किती? अपघात झाल्यास कोण देतं भरपाई?
11
Bhiwandi Fire: भिवंडीत भीषण आगीत, १२ केमिकल गोदामे जळून खाक!
12
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
13
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
14
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
15
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
16
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
17
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
18
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
19
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
20
Ahmedabad Plane Crash: अहमदाबाद दुर्घटनेनंतर विमानसेवांच्या प्रतिष्ठेवरही गंभीर परिणाम!

वाशिम जिल्ह्यातील १६३ ग्रामपंचायतींमध्ये राजकारण तापले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 10:39 IST

Gram Panchayt Election : या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाची भूमिका नेमकी काय राहील, याकडे मतदारांचे लक्ष लागून आहे.

ठळक मुद्देग्रामपंचायतींचा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर.राजकीय मोर्चेबांधणीला वेग आला आहे. सदस्यांमधून सरपंचाची निवड करण्याचा निर्णय लागू केला.

 लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यातील १६३ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी १५ जानेवारी २०२१ रोजी मतदान होणार असून, गुलाबी थंडीत ग्रामीण भागातील राजकारण चांगलेच तापत असल्याचे दिसून येते. स्थानिक पातळीवर निवडणूक स्वतंत्र आघाडी, पॅनलच्या माध्यमातून लढवायची की पक्षाच्या झेंड्याखाली? याबाबत चारही प्रमुख पक्षांत चर्चा सुरू असल्याची माहिती आहे.एप्रिल २०२० ते डिसेंबर २०२० या कालावधीत जिल्ह्यातील १६३ ग्रामपंचायतींचा पाच वर्षांचा कार्यकाळ संपुष्टात येत आहे. या ग्रामपंचायतींचा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच, राजकीय मोर्चेबांधणीला वेग आला आहे. राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेस असे तीन पक्ष मिळून महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आहे. सर्व निवडणुका या महाविकास आघाडीच्या नावाखाली लढविण्यात येतील, असे वरिष्ठ स्तरावरून यापूर्वीच जाहीर केलेले आहे. जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका या महाविकास आघाडीच्या नावाखाली लढविण्यात आल्या होता. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणूक ही महाविकास आघाडीच्या नावाखाली लढविली जाईल की नेहमीप्रमाणे स्वतंत्र पॅनल, आघाडीच्या माध्यमातून लढविली जाईल, याकडे इच्छुक उमेदवारांसह मतदारांचे लक्ष लागून आहे. तत्कालीन फडणवीस सरकारने थेट जनतेतून सरपंचपदाची निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला होता. महाविकास आघाडी सरकारने हा निर्णय रद्द करून पूर्वीप्रमाणेच सदस्यांमधून सरपंचाची निवड करण्याचा निर्णय लागू केला. १६३ ग्रामपंचायतींमध्ये निवडणूकमुळे राजकीय वातावरण तापले असून, इच्छुक उमेदवारांनी ‘गॉड फादर’च्या घराचे उंबरठे झिजविणे सुरू केल्याचे चित्र ग्रामीण भागात पहावयास मिळत आहे. या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाची भूमिका नेमकी काय राहील, याकडे मतदारांचे लक्ष लागून आहे. 

टॅग्स :washimवाशिमPoliticsराजकारणgram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक