शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
4
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
5
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
6
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
7
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
8
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
9
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
10
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
11
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
12
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
13
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
14
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
15
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
16
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
17
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
18
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
19
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
20
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान

वाशिम जिल्ह्यातील १६३ ग्रामपंचायतींमध्ये राजकारण तापले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 10:39 IST

Gram Panchayt Election : या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाची भूमिका नेमकी काय राहील, याकडे मतदारांचे लक्ष लागून आहे.

ठळक मुद्देग्रामपंचायतींचा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर.राजकीय मोर्चेबांधणीला वेग आला आहे. सदस्यांमधून सरपंचाची निवड करण्याचा निर्णय लागू केला.

 लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यातील १६३ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी १५ जानेवारी २०२१ रोजी मतदान होणार असून, गुलाबी थंडीत ग्रामीण भागातील राजकारण चांगलेच तापत असल्याचे दिसून येते. स्थानिक पातळीवर निवडणूक स्वतंत्र आघाडी, पॅनलच्या माध्यमातून लढवायची की पक्षाच्या झेंड्याखाली? याबाबत चारही प्रमुख पक्षांत चर्चा सुरू असल्याची माहिती आहे.एप्रिल २०२० ते डिसेंबर २०२० या कालावधीत जिल्ह्यातील १६३ ग्रामपंचायतींचा पाच वर्षांचा कार्यकाळ संपुष्टात येत आहे. या ग्रामपंचायतींचा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच, राजकीय मोर्चेबांधणीला वेग आला आहे. राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेस असे तीन पक्ष मिळून महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आहे. सर्व निवडणुका या महाविकास आघाडीच्या नावाखाली लढविण्यात येतील, असे वरिष्ठ स्तरावरून यापूर्वीच जाहीर केलेले आहे. जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका या महाविकास आघाडीच्या नावाखाली लढविण्यात आल्या होता. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणूक ही महाविकास आघाडीच्या नावाखाली लढविली जाईल की नेहमीप्रमाणे स्वतंत्र पॅनल, आघाडीच्या माध्यमातून लढविली जाईल, याकडे इच्छुक उमेदवारांसह मतदारांचे लक्ष लागून आहे. तत्कालीन फडणवीस सरकारने थेट जनतेतून सरपंचपदाची निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला होता. महाविकास आघाडी सरकारने हा निर्णय रद्द करून पूर्वीप्रमाणेच सदस्यांमधून सरपंचाची निवड करण्याचा निर्णय लागू केला. १६३ ग्रामपंचायतींमध्ये निवडणूकमुळे राजकीय वातावरण तापले असून, इच्छुक उमेदवारांनी ‘गॉड फादर’च्या घराचे उंबरठे झिजविणे सुरू केल्याचे चित्र ग्रामीण भागात पहावयास मिळत आहे. या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाची भूमिका नेमकी काय राहील, याकडे मतदारांचे लक्ष लागून आहे. 

टॅग्स :washimवाशिमPoliticsराजकारणgram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक