शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

गृह विलगीकारणाचे आदेश न पाळणाऱ्यांवर पोलीस कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2020 11:05 IST

या संदर्भात संबंधितांना पोलीस पाटील, ग्रामसेवक यांच्यामार्फत लेखी नोटीस बजावली जाणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : ‘कोरोना’ विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून महानगरातून परत आलेल्या नागरिकांनी पुढील १५ दिवस गृह अलगीकरणात (होम क्वारंटाईन) राहावे, कुटुंबातील व्यक्ती, गावातील नागरिकांशी संपर्क टाळावा आदेश जिल्हाधिकारी ऋषिकेश मोडक यांनी ३१ मार्च रोजी दिले.या संदर्भात संबंधितांना पोलीस पाटील, ग्रामसेवक यांच्यामार्फत लेखी नोटीस बजावली जाणार आहे. तसेच या आदेशांचे उल्लंघन केल्यास संबंधित व्यक्तीवर पोलीस कारवाई करण्यात येणार असल्याचे आदेशात म्हटले आहे.जिल्ह्यात अद्यापपर्यंत कोरोना विषाणूचा संसर्ग झालेला एकही पॉझिटिव्ह अथवा संशयित रुग्ण आढळलेला नाही.जिल्ह्यातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी जिल्ह्यात प्रवेशबंदी करण्यात आली आहे. मात्र, तत्पूर्वी मुंबई, पुणे यासह विविध शहरात, जिल्ह्यात कामानिमित्त गेलेले नागरिक, विद्यार्थी आपल्या गावी परतले आहेत. जिल्ह्यात अद्यापपर्यंत कोरोनाचा रुग्ण नसला तरी बाहेरील जिल्ह्यातून आलेल्या एखाद्या व्यक्तीपासून या विषाणूचा संसर्ग होऊ नये, यासाठी पुढील काही दिवस खबरदारी घेणे आवश्यक आहे.

पोलीस पाटील, ग्रामसेवक यांच्यावर जबाबदारीसंचारबंदी, लॉकडाऊनमुळे मुंबई, पुणेसह इतर महानगरातून नागरिक, विद्यार्थी जिल्ह्यात परतले आहेत. या सर्व नागरिकांनी १५ दिवस कुटुंबातील तसेच गावातील इतर व्यक्तींच्या संपर्कात न येता घरातच वेगळे राहणे आवश्यक आहे. परंतू अनेक नागरिक व विद्यार्थी हे घरात न राहता गावात फिरत आहेत. अशा सर्व नागरिकांची माहिती पोलीस पाटील, ग्रामसेवक यांच्यामार्फत घेतली जात आहे. ही माहिती तहसीलदार, गट विकास अधिकाऱ्यांमार्फत जिल्हा प्रशासनाकडे सादर केली जाणार आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याwashimवाशिम