शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमधील पंचमहल यथे मोठा अपघात; पावागडमध्ये रोपवे कोसळला, 6 जणांचा मृत्यू
2
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
3
एकनाथ शिंदे यांनी घेतली शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची भेट; म्हणाले, “अभिमानास्पद...”
4
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
5
Asia Cup Record : सचिन तेंडुलकर भारताचा 'नंबर वन ऑलराउंडर'; जयसूर्याची तर गोष्टच न्यारी
6
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
7
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
8
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
9
जीएसटी कमी झाल्यानंतर, किती रुपयांवर येईल Maruti Baleno? किती रुपयांचा होईल फायदा? जाणून घ्या
10
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?
11
चंद्रग्रहण २०२५: तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ दान, धनवान बनाल; कल्याण होईल, सुख-सुबत्ता लाभेल
12
"गणित जुळलं की...", अभिनेत्री ऋतुजा बागवे लग्नाबद्दल स्पष्टच बोलली
13
DCM अजित पवार अन् पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यात नेमका काय झाला संवाद? वाचा शब्द न् शब्द
14
भारत, पाकिस्तान, अमेरिका अन् जपानमध्ये आपत्ती येणार; बाबा वेंगाची 'ती' भविष्यवाणी खरी होणार?
15
“...तोपर्यंत मराठा समाजाला कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण मिळणार नाही”: बाळासाहेब थोरात
16
५०० वर्षांनी चंद्रग्रहणात शुभ योग: ५ राशींचे पंचक सुटेल, लाभ मिळेल; ४ राशींनी सावध राहावे!
17
मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ‘हिट’, शेतकरी, धारावी पुनर्वसन आंदोलन याच मार्गाने जाणार?
18
“आज BJP आहे, उद्या बाजी पलटेल, काँग्रेस सत्तेत येईल”; कोणत्या नेत्यांनी व्यक्त केला विश्वास?
19
VIRAL : खोदकाम करताना सापडलं १९९७चं जलजीऱ्याचं पाकिट; पण सोशल मीडियावर का होतंय व्हायरल?
20
BCCI नं श्रेयस अय्यरला दिलं कॅप्टन्सीचं गिफ्ट; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेसाठी असा आहे भारतीय संघ

कीटकनाशकाची फवारणी करताना १४ जणांना विषबाधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:30 IST

कामरगांव : सद्यपरिस्थितीत सोयाबीनवर शेंगा पोखरणाऱ्या अळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्याने, धोक्यात आलेले सोयाबीन पीक वाचविण्यासाठी महागड्या कीटकनाशकाची फवारणी ...

कामरगांव : सद्यपरिस्थितीत सोयाबीनवर शेंगा पोखरणाऱ्या अळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्याने, धोक्यात आलेले सोयाबीन पीक वाचविण्यासाठी महागड्या कीटकनाशकाची फवारणी शेतकऱ्यांकडून केल्या जात आहे. ही फवारणी करताना महिन्याभरात १४ जणांना विषबाधा झाल्याची घटना कारंजा तालुक्यातील कामरगाव परिसरात घडली. त्यामुळे विषबाधेच्या या घटना टाळण्यासाठी फवारणी करतांना काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.

शेतात कीटकनाशकाची फवारणी करतांना अंग झोंबणे, घाम येणे, मळमळ होणे, अशी लक्षणे दिसल्याने विषबाधा झालेल्या व्यक्तींना उपचारासाठी कामरगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. काहींना कामरगाव ग्रामीण रुग्णालयातील उपचारानंतर सुट्टी देण्यात आली, तर दोघांवर अद्यापही उपचार सुरू आहे. विषबाधा झालेल्यांत धनराज बांगडे माळेगाव, ओम मुंदे ब्राह्मणवाडा, आश्विन ठाकरे बाबापूर, चिराग शहा मस्तान शहा ब्राह्मणवाडा, देविदास पाटील विळेगाव, सूरज कैकाडी कामरगाव, श्रीकृष्ण बेंदरे बेंबळा, चंदू शेलोकार कामरगाव, किशोर कांबळे कामरगाव, मनिष देशमुख कामरगाव, लखन तायडे बांबर्डा, नरेश डाखोरे बांबर्डा, आशिष पवार शिंगणापूर व दिनेश भोसले शिंगणापूर यांचा समावेश आहे. कीटकनाशकाची फवारणी करताना एवढ्या मोठ्या प्रमाणात विषबाधा झाल्याने, विषबाधेचा हा प्रकार कृषी विभागाने गांभीर्याने घेण्याची गरज निर्माण झाली असून, कृषी विभागामार्फत फवारणी किट उपलब्ध करून देण्याची मागणी केल्या जात आहे.