शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
5
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
6
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
7
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
8
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
9
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
10
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
11
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
12
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
13
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
14
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
15
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
16
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
17
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
18
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
19
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
20
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बदलापूरमधील घटना

‘शेतकरी सन्मान’चा निधी अन्य लाभार्थींच्या खात्यात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2019 14:30 IST

अचूक बँक खाते व अन्य माहिती दिल्यानंतरही अनुदानाची रक्कम अन्य शेतकरी लाभार्थींच्या बँक खात्यात जमा होत असल्याचे प्रकार समोर येत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : केंद्र शासनाने शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्यासाठी शेतकरी सन्मान निधी योजना सुरू केली. या योजनेत आधीच विविध तांत्रिक घोळ असल्याने अनेक शेतकरी अद्याप या योजनेपासून वंचित आहेत. त्यातच आता शेतकऱ्यांनी अचूक बँक खाते व अन्य माहिती दिल्यानंतरही अनुदानाची रक्कम अन्य शेतकरी लाभार्थींच्या बँक खात्यात जमा होत असल्याचे प्रकार समोर येत आहेत. या संदर्भात शेतकºयांनी तहसीलस्तरावर तक्रारीही केल्या आहेत.कें द्र शासनाने शेतकºयांसाठी पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेची घोषणा केली. या योजनेंतर्गत दरवर्षी शेतकºयाला सहा हजार रुपये मिळणार आहेत. या योजनेत आता क्षेत्र मर्यादेची कोणतीही अट नसल्याने सर्व पात्र लाभार्थी शेतकरी कुटुंबाच्या याद्या संकलित करून वेळोवेळी निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सुचनांनुसार पीएम किसान पोर्टलवर माहिती अपलोड करण्याची तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले. यासाठी तलाठी अथवा ग्रामसेवकांकडून नोंदणी केली जात आहे. शेतकरी नाव, गाव, वय, व्यवसाय, खाते क्रमांक, क्षेत्र, बँक खाते क्रमांक, आधार क्रमांक यांसह स्वयंघोषणापत्र भरून तलाठी अथवा ग्रामसेवकाकडे देत आहेत. दरम्यान, हजारो शेतकºयांनी संपूर्ण माहिती तलाठ्यांकडे देऊनही खात्यात निधी जमा झाला नसल्याबाबत चौकशी सुरू केली. त्यावेळी काही शेतकºयांची रक्कम दुसºयाच व्यक्तीच्या खात्यात जमा झाल्याचे निदर्शनास आले. तलाठ्यांनी भरलेली माहिती अचूक असतानाही हा प्रकार घडत आहे. त्यामुळे शेतकरी संभ्रमात पडले असून, या प्रकाराची चौकशी करण्याची मागणी त्यांच्याकडून करण्यात येत आहे. तक्रारी होऊनही शेतकºयांना मिळाला नाही लाभशेतकरी सन्मान निधीपासून वंचित असल्याने शेतकºयांनी चौकशी सुरू केली असता त्यांची रक्कम दुसºयाच शेतकºयांच्या खात्यात जमा झाली असल्याचे निदर्शनास आले. असा प्रकार घडलेल्या मानोरा तालुक्यातील काही शेतकºयांनी तहसीलदारांकडे तक्रारही केली. आता या तक्रारीला आठवडा उलटत आला तरी, त्यावर कोणतीही कार्यवाही करून शेतकºयांच्या खात्यात रक्कम अद्याप जमा करण्यात आली नाही.

यासंदर्भातील माहिती आपल्याला मिळाली आहे; परंतु खूप कमी शेतकºयांबाबत हा प्रकार घडला आहे. त्यातही अचूक माहिती भरल्यानंतर असा प्रकार घडत नाही. तथापि, या प्रकाराची चौकशी करून तांत्रिक दोष दूर करण्यासह संंबंधित शेतकºयांना त्याचा लाभ देण्यात येणारच आहे.- शैलेश हिंगेनिवासी उपजिल्हाधिकारी

टॅग्स :washimवाशिमPM Kisan Schemeप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनाFarmerशेतकरीbankबँक