शहरं
Join us  
Trending Stories
1
मान्सूनची घाई, वेळेआधीच केरळ गाठले; राज्यात २ दिवसांत; २००९ नंतर प्रथमच आठवडाभर आधी आगमन
2
केंद्र अन् राज्यांनी ‘टीम इंडिया’प्रमाणे काम केल्यास काहीही अशक्य नाही; PM मोदी यांचे आवाहन
3
काळजी नको, सगळे सुरळीत होईल; राहुल गांधींचा दिलासा, सीमाभागातील मृतांच्या कुटुंबांचे सांत्वन
4
५ वर्षांत एक ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचे लक्ष्य; 'महाराष्ट्राचेही व्हिजन २०४७': CM फडणवीस
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आग्रही; पण विधिमंडळाच्या नीतिमूल्य समितीची अद्याप प्रतीक्षाच
6
मुंबई, पुणे, नागपूरसह ७ जिल्ह्यांतून ५४ टक्के उत्पन्न; विकासाच्या प्रादेशिक असंतुलनावर बोट
7
हगवणेंकडून पिस्तुले, चांदीची भांडी, कार जप्त; CM फडणवीस, DCM शिंदेंकडून कुटुंबाचे सांत्वन
8
संततधारेने पिकांना मोठा फटका; बळीराजा संकटात, अनेक जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता
9
ॲपलला भारतात जायचे असेल तर जावे, पण अमेरिकेत फोनवर कर लागणारच; ट्रम्प यांचा धमकीवजा इशारा
10
कीव्ह शहरावर रशियाचे ड्रोन, क्षेपणास्त्र हल्ले; १५ जखमी, ओबोलोन जिल्ह्याचे सर्वाधिक नुकसान
11
रुग्णासाठी चॅटजीपीटी बनले वकील, बिनतोड युक्तिवादाने मिळवून दिला २ लाखांचा रिफंड
12
पनवेल-सोमटणे, पनवेल-चिखली नवीन कॉर्ड लाइन; राहुरी-शनी शिंगणापूर नव्या रेल्वे मार्गास मान्यता
13
‘फिरत्या पम्पिंग स्टेशन’मुळे पाण्याचा लवकर निचरा; ४ वर्षांसाठी भाडेतत्त्वावर, ८ कोटी खर्च
14
‘विरार-अलिबाग’ विलंबाचा दिल्ली एक्स्प्रेसवेला फटका; ठाण्यात होणार अवजड वाहनांमुळे कोंडी
15
PBKS vs DC : दिल्लीकर समीरची मॅच विनिंग फिफ्टी; पंजाबचं टेन्शन वाढलं! Qualifier 1 च्या शर्यतीत नवं ट्विस्ट
16
Vaishnavi Hagawane: वैष्णवीच्या बाळाला एकनाथ शिंदेंनी घेतलं जवळ, आईवडिलांना दिला धीर; काय घडलं?
17
IPL 2025 Qualifier 1 Race : आता MI चे कट्टर चाहतेही करतील CSK ला चीअर; कारण...
18
हे वागणं बरं नव्हं... खासदारांनी नाराजीचा सूर आळवत रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना धरले धारेवर 
19
'दोषींना पाठिशी घालणाऱ्यांवरही कारवाई करणार', एकनाथ शिंदेंनी घेतली वैष्णवी हगवणेच्या आईवडिलांची घेतली भेट
20
टायपिंगमधून सुटका! तुम्ही जो विचार कराल तो दिसेल स्क्रीनवर; मनातील विचारांनी मोबाइलही चालवता येणार

बिहार पॅटर्नच्या धर्तीवर लाखो वृक्षांची लागवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:29 IST

जिल्ह्यात पानी फाउंडेशनच्या समृद्ध गाव स्पर्धेंतर्गत कारंजा आणि मंगरुळपीर या दोन तालुक्यांतील ४३ ग्रामपंचायतींत विविध कामे केली जात आहेत. ...

जिल्ह्यात पानी फाउंडेशनच्या समृद्ध गाव स्पर्धेंतर्गत कारंजा आणि मंगरुळपीर या दोन तालुक्यांतील ४३ ग्रामपंचायतींत विविध कामे केली जात आहेत. यात जलसंधारण, मृद संधारणासह, वृक्ष लागवड या प्रमुख कामांचा समावेश आहे. यातील बहुतांश कामे लोकसहभागातून केली जात असली तरी काही कामे प्रशासनाच्या सहकार्यातूनही केली जात आहेत. आता पानी फाउंडेशनच्या समृद्ध गाव स्पर्धेंतर्गत सहभागी ४३ ग्रामपंचायतींत बिहार पॅटर्नच्या धर्तीवर वृक्ष लागवड करून त्या वृक्षांचे संवर्धन गावकऱ्यांकडून केले जाणार आहे. यासाठी सामाजिक वनीकरण विभागाकडून वृक्षरोप उपलब्ध केली जाणार आहेत.

---------------

या गावांत होणार वृक्ष लागवड

कारंजा तालुका (२४) : जानोरी, विळेगाव, अंतरखेडा, जामठी, बेलमंडळ, पोहा, उंबर्डा बाजार, काकड शिवणी, शिवनगर, दोनद, गायवळ, नारेगाव, बेलमंडळ, शेलूवाडा, धोत्रा देशमुख, धोत्रा जहॉगीर, शिवण, पिंपळगाव, बांबर्डा, बेलखेडा, शहादतपूर, आखतवाडा, पिंप्री मोडक, रामनगर.

०००००००००००००

मंगरुळपीर तालुका (१९) : लखमापूर, बोरव्हा, शेंदुरजना मोरे, सायखेडा, घोटा, स्वासीन, जांब, पिंप्री खु, चिंचाळा, लाठी, पिंपळखुटा, शेलगाव, तपोवन, नागी, पिंप्री (अवगन), उमरी बु., जनुना, जाेगलदरी, पारवा.

---------------

रोहयोतून मजुरांच्या हाताला काम

पानी फाउंडेशनच्या समृद्ध गाव स्पर्धेंतर्गत बिहार पॅटर्नच्या धर्तीवर वृक्ष लागवड करून पर्यावरण संवर्धन करणे हाच उद्देश नाही, तर या माध्यमातून मजुरांच्या हाताला कामही दिले जाणार आहे. रोहयोच्या माध्यमातून किमान पाच मजुरांच्या आधारे ४३ ग्रामपंचायतींत ही वृक्ष लागवड केली जाणार आहे. वृक्ष लागवडीनंतर याच कामगारांना या वृक्षांच्या संगोपन आणि संवर्धनाचे कामही दिले जाणार आहे.

००००००००००००००००

काय आहे बिहार पॅटर्न

धुळे जिल्ह्यातील बिहारी नावाच्या एका गरीब शेतकऱ्याने राबविलेला वृक्ष लागवडीसह संगोपन, संरक्षणाचा प्रकल्प यशस्वी ठरला. त्यामुळे लावलेली झाडे जगविता येऊ शकतात. त्याचे सरंक्षण होऊ शकते, हा विश्वास व्यक्त झाला. त्या व्यक्तीच्या नावावरूनच त्या संकल्पनेला अर्थात वृक्ष लागवड, संगोपन आणि संरक्षणाच्या पॅटर्नला ‘बिहार पॅटर्न’ असे नामकरण केले गेले. ‘बिहार पॅटर्न’ हा प्रयोग राज्यात २००८ पासून राबविला जात आहे.

०००००००००००००००००००००००

कोट:

समृद्ध गाव स्पर्धेतील सहभागी गावांचा सर्वांगीण विकास हेच पानी फाउंडेशन स्पर्धेमागील उद्दिष्ट आहे. वृक्ष लागवडीतून पर्यावरण संवर्धन आणि त्यातून दीर्घकाळ मजुरांच्या हाताला काम, याच उद्देशाने सहभागी ४३ गावांत बिहार पॅटर्नच्या धर्तीवर वृक्ष लागवड केली जाणार आहे.

-सुभाष नानवटे,

जिल्हा समन्वयक, पानी फाउंडेशन