शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

आईच्या अस्थी रक्षेवर मुलांनी केले वृक्षारोपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2019 15:43 IST

रिसोड तालुक्यातील मांडवा येथील गरकळ कुटुंबाने फाटा देत आईच्या निधनानंतर पर्यावरण संवर्धनासाठी एक आगळाच संदेश समाजाला दिला आहे. आईच्या अस्थी शेतात खड्डे खोदून त्यात टाकत त्यावर वृक्षाची लागवड करण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्करिसोड: हिंदू धर्मातील संस्कारानुसार एखाद्या व्यक्तीचे निधन झाल्यानंतर अंत्यसंंस्कार उरकून मृत व्यक्तीच्या अस्थींचे नदीपात्रात विर्सजन केले जाते. या परंपरेला रिसोड तालुक्यातील मांडवा येथील गरकळ कुटुंबाने फाटा देत आईच्या निधनानंतर पर्यावरण संवर्धनासाठी एक आगळाच संदेश समाजाला दिला आहे. आईच्या अस्थी शेतात खड्डे खोदून त्यात टाकत त्यावर वृक्षाची लागवड करण्यात आली.रिसोड तालुक्यातील मांडवा गावातील माजी ग्रामपंचायत सदस्या गुंफाबाई माधवराव गरकळ यांचे बुधवार १० जुलै रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ६० वर्षीय गुंफाबाई या बुधवारी पहाटेपासून पंढरपुर यात्रेत जाण्याच्या लगबगीत गुंतल्या होत्या.तथापि, त्यांची नेमाने पंढरपूरला जाण्याची इच्छा अपूर्णच राहिली आणि हृदयविकाराच्या तीव्र धक्क्यामुळे त्यांची प्राणज्योत मालवली. गुंफाबाई गरकळ यांच्या अचानक निधनामुळे त्यांची शालिकराम गरकळ व बद्री गरकळ ही दोन मुले दुखी झाली. तथापि, या दोघा भावांनी आईच्या स्मृती चिरंतर टिकाव्या आणि एक आदर्श संदेश समाजाला मिळावा म्हणून तंटामुक्ती अध्यक्ष डॉ.सुरेश गरकळ व सरपंच विजय चव्हाण यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर स्वत:च्या शेतात खड्डे खोदले आणि आईच्या अस्थी खड्ड्यात टाकत त्यावर बेल, आंबा, निंब, जांभुळ व पेरु या पाच वृक्षांची लागवड केली. गरकळ कुटुंबाच्या या उपक्रमामुळे समाजापुढे एक वेगळा आदर्श निर्माण झाला असून, अंधश्रध्देलाही आळा बसण्याचा पायंडा पडला आहे.

जलसंवर्धनाचाही समाजाला संदेशगुंफाबाई यांच्या शालिकराम गरकळ व बद्री गरकळ या दोन मुलांनी आईच्या अस्थीवर वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देतानाच जलसंवर्धनाचाही अभिनव संदेश या माध्यमातून दिला आहे. हिंदू संस्कृतीत मृत व्यक्तीच्या अस्थींचे जलविसर्जन होत नाही, तोवर मृतात्म्याला शांती मिळत नाही, असा समज आहे. तथापि, यामुळे जलस्त्रोताील पाणी दुषित होते, ही बाब लक्षात घेतली जात नाही. शालिकराम व बद्री गरकळ या भावांनी मात्र आईच्या अस्थी नदीपात्रात विसर्जित न करता या गैरसमजालाही तिलांजली दिली.

टॅग्स :washimवाशिमRisodरिसोड