शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
2
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
3
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
4
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
5
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
6
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
7
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
8
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
9
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
10
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
11
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
12
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
13
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
14
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
15
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
16
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
17
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
18
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
19
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
20
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान

आईच्या अस्थी रक्षेवर मुलांनी केले वृक्षारोपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2019 15:43 IST

रिसोड तालुक्यातील मांडवा येथील गरकळ कुटुंबाने फाटा देत आईच्या निधनानंतर पर्यावरण संवर्धनासाठी एक आगळाच संदेश समाजाला दिला आहे. आईच्या अस्थी शेतात खड्डे खोदून त्यात टाकत त्यावर वृक्षाची लागवड करण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्करिसोड: हिंदू धर्मातील संस्कारानुसार एखाद्या व्यक्तीचे निधन झाल्यानंतर अंत्यसंंस्कार उरकून मृत व्यक्तीच्या अस्थींचे नदीपात्रात विर्सजन केले जाते. या परंपरेला रिसोड तालुक्यातील मांडवा येथील गरकळ कुटुंबाने फाटा देत आईच्या निधनानंतर पर्यावरण संवर्धनासाठी एक आगळाच संदेश समाजाला दिला आहे. आईच्या अस्थी शेतात खड्डे खोदून त्यात टाकत त्यावर वृक्षाची लागवड करण्यात आली.रिसोड तालुक्यातील मांडवा गावातील माजी ग्रामपंचायत सदस्या गुंफाबाई माधवराव गरकळ यांचे बुधवार १० जुलै रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ६० वर्षीय गुंफाबाई या बुधवारी पहाटेपासून पंढरपुर यात्रेत जाण्याच्या लगबगीत गुंतल्या होत्या.तथापि, त्यांची नेमाने पंढरपूरला जाण्याची इच्छा अपूर्णच राहिली आणि हृदयविकाराच्या तीव्र धक्क्यामुळे त्यांची प्राणज्योत मालवली. गुंफाबाई गरकळ यांच्या अचानक निधनामुळे त्यांची शालिकराम गरकळ व बद्री गरकळ ही दोन मुले दुखी झाली. तथापि, या दोघा भावांनी आईच्या स्मृती चिरंतर टिकाव्या आणि एक आदर्श संदेश समाजाला मिळावा म्हणून तंटामुक्ती अध्यक्ष डॉ.सुरेश गरकळ व सरपंच विजय चव्हाण यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर स्वत:च्या शेतात खड्डे खोदले आणि आईच्या अस्थी खड्ड्यात टाकत त्यावर बेल, आंबा, निंब, जांभुळ व पेरु या पाच वृक्षांची लागवड केली. गरकळ कुटुंबाच्या या उपक्रमामुळे समाजापुढे एक वेगळा आदर्श निर्माण झाला असून, अंधश्रध्देलाही आळा बसण्याचा पायंडा पडला आहे.

जलसंवर्धनाचाही समाजाला संदेशगुंफाबाई यांच्या शालिकराम गरकळ व बद्री गरकळ या दोन मुलांनी आईच्या अस्थीवर वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देतानाच जलसंवर्धनाचाही अभिनव संदेश या माध्यमातून दिला आहे. हिंदू संस्कृतीत मृत व्यक्तीच्या अस्थींचे जलविसर्जन होत नाही, तोवर मृतात्म्याला शांती मिळत नाही, असा समज आहे. तथापि, यामुळे जलस्त्रोताील पाणी दुषित होते, ही बाब लक्षात घेतली जात नाही. शालिकराम व बद्री गरकळ या भावांनी मात्र आईच्या अस्थी नदीपात्रात विसर्जित न करता या गैरसमजालाही तिलांजली दिली.

टॅग्स :washimवाशिमRisodरिसोड