शहरं
Join us  
Trending Stories
1
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
2
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
3
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
4
सेकंड हँड कारच्या किंमती धडाधड घसरल्या...; स्पिनी, कार्स २४ सारखे २ लाखांपर्यंत डिस्काऊंट देऊ लागले...
5
वादग्रस्त विधानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाराज; आ. गोपीचंद पडळकरांना केला फोन, म्हणाले...
6
सर्वच नावं परप्रांतीय कशे? राजुऱ्यातील ६,८५३ मतदारांच्या वोट चोरीच्या आरोपांवर आयोगाकडून थंड प्रतिसाद
7
"पाकिस्तान, बांगलादेशमध्ये घरात असल्यासारखं वाटतं’’, काँग्रेसच्या सॅम पित्रोदा यांचं विधान, Gen-Z ला केलं असं आवाहन    
8
IPO असावा तर असा! ७४% प्रीमिअमवर बंपर लिस्टिंग; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल
9
सर्वपित्री अमावास्या २०२५: सर्वपित्री अमावस्येला सूर्यग्रहण; त्यादिवशी श्राद्धविधी करावे की नाही?
10
E 20 पेट्रोलमुळे करोडोंची फेरारी खराब झाली; युजरने विचारले, गडकरी घेणार का जबाबदारी?  
11
Video:"...तर मंत्रिपदाची खुर्ची सोडावी लागेल"; DCM अजित पवारांनी पक्षातील नेत्यांचे कान टोचले
12
आयफोन १६ खरेदी करण्याची योग्य वेळ; २७ हजारांहून अधिक रुपये वाचतील, कुठे सुरू आहे ऑफर?
13
अतिशय गुप्तपणे अमेरिकेचे सैन्य बांगलादेशात पोहचलं; १२० जवान दाखल, काही तरी मोठं घडतंय?
14
‘मला एकटे पाडण्यासाठी मोठा राजकीय डाव शिजतोय’; मनोज जरांगे यांचा खळबळजनक दावा
15
कमाल झाली राव! वजन कमी होईल अन् चेहऱ्यावर ग्लो येईल; रोज 'हे' फळ खाल्ल्याचे 'जादुई' फायदे
16
India vs Oman सामन्याआधीच्या सराव सत्रात ६ खेळाडू गैरहजर? टीम इंडियात नेमकं काय घडतंय...
17
आर्यनची केस लढण्यास मुकुल रोहतगींनी दिलेला नकार, शाहरुख खान थेट त्यांच्या पत्नीशीच बोलला
18
राज ठाकरे यांनी अंबरनाथमध्ये कार्यकर्त्यांना दिला असा कानमंत्र, पितृपक्षाबाबत म्हणाले... 
19
एका क्लिकमध्ये मिळणार PF ची पूर्ण हिस्ट्री; EPFO नं बदलली पासबुक पाहण्याची सुविधा
20
Tanya Mittal : "नवऱ्याला राजासारखं ठेवेन", बेरोजगाराशी लग्न करण्यास तयार आहे तान्या मित्तल, म्हणाली...

वाशिम जिल्ह्यात श्रमदानातून जलसंधारणाची कामे करणाऱ्या ग्रामस्थांनी केले वृक्षारोपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2018 13:56 IST

वाशिम: यंदा पार पडलेल्या वॉटर कप स्पर्धेत श्रमदानातून जलसंधारणाची कामे करणाऱ्या शेकडो ग्रामस्थांनी २८ आणि २९ जुलै रोजी वृक्ष लागवड केली.

ठळक मुद्दे वॉटर कप स्पर्धेत २८ आणि २९ जुलै रोजी वृक्ष लागवड करण्याचे ठरविण्यात आले होते. त्यानुसार २८ जुलै रोजी सकाळीच वॉटर कप स्पर्धेत सहभागी गावांत या मोेहिमेला सुरुवात करण्यात आली.स्पर्धेमधे करण्यात आलेल्या श्रमदानातून केलेल्या कामाच्या परिसरात वृक्षारोपण केले.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: यंदा पार पडलेल्या वॉटर कप स्पर्धेत श्रमदानातून जलसंधारणाची कामे करणाऱ्या शेकडो ग्रामस्थांनी २८ आणि २९ जुलै रोजी वृक्ष लागवड केली. यात कारंजा तालुक्यातील ग्रामस्थांचाही सहभाग होता. या वृक्ष लागवडीसाठी स्पर्धेदरम्यान तयार केलेल्या रोपवाटिकेतील रोपांचाच वापर करण्यात आला.पाणी फाऊंडेशनच्यावतीने यंदा राज्यातील विविध तालुक्यांत राबविण्यात आलेल्या वॉटर कप स्पर्धेत २८ आणि २९ जुलै रोजी वृक्ष लागवड करण्याचे ठरविण्यात आले होते. त्यानुसार २८ जुलै रोजी सकाळीच वॉटर कप स्पर्धेत सहभागी गावांत या मोेहिमेला सुरुवात करण्यात आली. ही मोहिम २९ जुलै रोजी पार पडली. वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर आणि कारंजा या दोन तालुक्यांचा यंदाच्या वॉटर कप स्पर्धे समावेश होता. त्यापैकी कारंजा तालुक्यातील पोहा, बेलमंडळ, काकडशिवनी, विळेगाव, बांबर्डा, पिंपळगांव बु, पिंप्रिमोडक, धनज बु, आदि गावांत वृक्षारोपण करण्यात आले. पोहा येथे सरपंच डॉ. शरद दहातोंडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी स्पर्धेमधे करण्यात आलेल्या श्रमदानातून केलेल्या कामाच्या परिसरात वृक्षारोपण केले. बेलमंडळ येथे सरपंच सचिन एकनार यांनी जिल्हा परिषद शाळेच्या आवारात शिक्षक व विद्यर्थ्यांना सोबत घेऊन वृक्षारोपण केले, तसेच उपस्थित विद्यार्थ्यांना ग्रामपंचायतकडून वृक्षमित्रचे प्रमाणपत्र देऊन त्यांचा गौरव करण्याचे ठरविले, काकड शिवणी येथे  सरपंच संगीता चक्रनारायण व त्यांच्या सहकाऱ्यांनी गाव शिवारात वृक्षारोपण केले. विळेगाव येथे गावाचे ग्रामसेवक जितेंन्द्र वडते, राजू घुले, नंदा खंङारे, रवि घुले, गिता रामटेके व गावकऱ्यांनी मिळून वृक्षारोपण केल. धनज बु, येथे सरपंच मोटलानी व ग्रामसेवकांनी वृक्षारोपण केले. पिंप्रीमोडक येथ सरपंच ललिता थोटांगे व बचतगट महिला मंडळाने वृक्षारोपण केले. पिंपळगांव येथे सरपंच दादाराव बहुटे व प्रशिक्षणार्थी यांनी वृक्षारोपण केले, तसेच बांबर्डा येथे  सरपंच कांचन भेंडे व गावकऱ्यांनी वृक्षारोपण केले. पाणी फाऊंंडेशन कडून राबविन्यात आलेल्या वॉटर कपस्पर्धेमुळे गाव पाणीदार होण्यासह पर्यावरणात वृद्धी होण्यासह मदत होत आहे.

टॅग्स :washimवाशिमWater Cup Competitionवॉटर कप स्पर्धाKaranjaकारंजा