शहरं
Join us  
Trending Stories
1
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
2
आजचे राशीभविष्य- ४ ऑक्टोबर २०२५: पैशांच्या गुंतवणुकीवर लक्ष द्या, कमी वेळात जास्त लाभ घेण्याची लालसा सोडा
3
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
4
अमेरिकी रस्त्यावर भारतीय बाइक्सने अभिमान वाटतो; राहुल यांनी अमेरिकेत केला भारतीय कंपन्यांचा गौरव
5
लेह हिंसाचार : सोनम वांगचुक यांना अटक; न्याय मागण्यासाठी पत्नी कोर्टात
6
‘बाबा’ विद्यार्थिनींना रात्री खोलीत येण्यास भाग पाडायचा; मिळाली १४ दिवस कोठडी
7
आता सौरऊर्जेवर चालणारी ई-बुलेट आली; ऊर्जाबचत, प्रदूषण नियंत्रणासाठी मोठा फायदा
8
नवी मुंबई विमानतळास दि. बा. पाटील यांचेच नाव; नामकरणासाठी पंतप्रधान मोदी सकारात्मक : मुख्यमंत्री 
9
अमेरिकेच्या टॅरिफ संकटात भारतासह युरोपियन देशांची भूमिका मोलाची; स्वेन ओस्टबर्ग यांचे मत
10
संपादकीय : आता खरी लढाई! मेळावे झाले, घोषणा झाल्या... आता सीमोल्लंघन कधी?
11
पाणंद रस्ते मोकळे करा,  तरच मिळेल सरकारी लाभ; प्रस्ताव विचाराधीन
12
सोमवारपासून परतीच्या सरी; चक्रीवादळ 'शक्ती'मुळे महाराष्ट्रात पुन्हा पाऊस? हवामान खात्याचा नेमका अंदाज काय?
13
डोनाल्ड ट्रम्प आता सिनेमावाल्यांवर का भडकले?
14
मनोज जरांगेंचा १९९४ च्या जी. आर. विरोधात एल्गार! 'या' दोन मोठ्या जातींच्या आरक्षणावर बोलले
15
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
16
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
17
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
18
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
19
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
20
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश

पाणीपुरवठा योजनांचा आराखडा तातडीने तयार करा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:27 IST

वाशिम : जलजीवन मिशनमध्ये समाविष्ट गावांसाठी पाणीपुरवठा योजनांचा आराखडा तयार करण्याची कार्यवाही अधिक गतीने करावी. या आराखड्यांना लवकरात लवकर ...

वाशिम : जलजीवन मिशनमध्ये समाविष्ट गावांसाठी पाणीपुरवठा योजनांचा आराखडा तयार करण्याची कार्यवाही अधिक गतीने करावी. या आराखड्यांना लवकरात लवकर प्रशासकीय मान्यता घेऊन कामे सुरू करण्याच्या अनुषंगाने सूक्ष्म नियोजन करावे, अशा सूचना पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी जलजीवन मिशनचा आढावा घेताना संबंधित यंत्रणेला दिल्या.

ग्रामीण भागामध्ये प्रत्येक घराला नळजोडणीद्वारे शुद्ध व पुरेसे पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी जलजीवन मिशन राबविण्यात येत आहे. जिल्ह्यात जलजीवन मिशनअंतर्गत करण्यात येत असलेल्या कार्यवाहीचा पालकमंत्री देसाई यांनी १९ जुलै रोजी आढावा घेतला. यावेळी जिल्हा परिषदेचे प्रभारी अध्यक्ष डॉ. श्याम गाभणे, खासदार भावना गवळी, आमदार सर्वश्री गोपीकिशन बाजोरिया, किरणराव सरनाईक, राजेंद्र पाटणी यांच्यासह अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. जिल्ह्यात राष्ट्रीय पेयजल योजनेच्या पहिल्या टप्प्यात सुरू असलेली पाणी पुरवठा योजनांची कामे डिसेंबरअखेरपर्यंत पूर्ण करावीत. तसेच जलजीवन मिशनमध्ये समाविष्ट गावांसाठी पाणीपुरवठा योजनांचा आराखडा तयार करण्याची कार्यवाही अधिक गतीने करण्याच्या सूचना ना. देसाई यांनी दिल्या. यावेळी जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस., जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत यांनी जलजीवन मिशनच्या अनुषंगाने करण्यात येत असलेल्या कार्यवाहीची माहिती दिली.

०००००

पाणीपुरवठा योजनेपासून गावे वंचित राहू नये!

एकही गाव पाणीपुरवठा योजनेपासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घ्यावी. तसेच थकबाकीमुळे बंद पडलेल्या प्रादेशिक पाणी पुरवठा योजना सुरू करण्यासाठी जिल्हा परिषदेने ग्रामपंचायतींशी समन्वय साधून आवश्यक कार्यवाही करावी, अशा सूचनाही पालकमंत्री देसाई यांनी दिल्या.