शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
5
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
6
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
7
बापहो, काळजी फक्त कमाईची नको; मुलांच्या यशासाठी त्यांना वेळ देणंही तितकंच मोलाचं! 
8
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
9
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
10
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
11
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
12
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
13
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
14
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
15
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
16
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
17
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
18
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
19
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
20
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?

पालकमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेतच फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2020 11:07 IST

या पत्रकार परिषदेमध्ये फिजिकल डिस्टन्सिंगचे कोणतेच पालन करण्यात आल्याचे दिसून आले नाही.

- नंदकिशोर नारेलोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटाक सभागृहामध्ये पालकमंत्री शंभुराज देसाई यांची पत्रकार परिषद २९ जून रोजी दुपारी १ वाजता घेण्यात आली. या पत्रकार परिषदेमध्ये फिजिकल डिस्टन्सिंगचे कोणतेच पालन करण्यात आल्याचे दिसून आले नाही. विशेष म्हणजे प्रत्येक पत्रकार परिषदेच्यावेळी येणाऱ्या पत्रकारांचे सॅनिटायझरने हात स्वच्छ केल्या जातात यावेळी त्याचाही विसर प्रशासनाला पडल्याचे दिसून आले.पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी पत्रकार परिषदेमध्ये कोरोनासंदर्भात सद्यस्थिती , उपाययोजना संदर्भात प्रशासनाकडून आढावा घेण्यात आल्याचे सांगितले. तसेच खरिपाच्या पेरणीसंदर्भात, पोहरादेवी विकास आराखडाबाबतचा आढावा, बियाणे न उगविल्याबाबत, पीक कर्जासंदर्भात, हेल्पलाईन शुभारंभासंदर्भात , आरोग्य विभागातील कर्मचारी , औषधसाठा संदर्भात आढावा घेण्यात आल्याचे सांगण्यात आले. यावेळी त्यांना कोरोनाच्या पृष्ठभूमिवर आपण जिल्हयात आले नाही व जिल्हयातील नागरिकांचे भ्रमणध्वनी उचलले नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. यावर त्यांनी माझ्या गावाहून येतांना सहा जिल्हे पार करुन यावे लागते. त्याकरिता सहा जिल्हयांची परवानगी घ्या आणि मधात मला काही झाले तर काय. माझ्यामुळे जिल्हावासिय अडचणीत येवू नये म्हणून मी आलो नाही. परंतु ४ ते ५ मिटींग मी व्हीसीव्दारे घेतल्या आहेत. तसेच नागरिकांचे भ्रमणध्वनी सुध्दा घेतले आहेत.एखादयावेळी घेणे शक्य झाले नसावे असे मला वाटते. शेवटी मी पण माणूस आहे चुका होणारच असल्याचे सांगितले.पत्रकार परिषदेमध्येच शासनाच्या विविध योजनांच्या पुस्तिकेचे, फलकाचे अनावरण करण्यात आले. यावेळी पत्रकार परिषदेमध्ये पत्रकारांव्यतिरिक्त आवश्यकता नसलेले अधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थितीमुळे सभागृहात एकच गर्दी झाली होती. जवळ जवळ असलेल्या खुर्च्यांवर सर्वजण बसल्याने फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन झालेले दिसून आले नाही. सभागृहात अतिरिक्त लावण्यात आलेल्या खुर्च्यांवरही अधिकारी कर्मचारी बसलेले होते. प्रशासनाकडूनच नियमांचे पालन करण्याच्या सूचना केल्या जात असतांना त्यांच्याकडूनच पालन न झाल्याचे पत्रकार परिषदेत कुजबूज दिसून आली.लोकप्रतिनिधींसह अनेक अधिकाऱ्यांची उपस्थितीपत्रकार परिषदमध्ये जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह काही महत्वाचे अधिकारी वगळता ईतरही अधिकारी आणि कर्मचाºयांनी नाहक उपस्थिती लावली असल्याने सभागृहात फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन झाले नाही. विशेष म्हणजे या पत्रकार परिषदेमध्ये लोकप्रतिनिधी यांचीही उपस्थिती दिसून आली.

जिल्हावासी माझ्यामुळे अडचणीत येवू नये म्हणून आलो नाहीकोरोनाचे संकट जिल्हयात आल्यानंतर प्रथमच जिल्हयात आगमन झालेल्या पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी साताºयाहून येताना सहा जिल्हे पार करतांना मलाच काही व्हावे व नंतर मी जिल्हयात यावे. यामुळे जिल्हावासिय अडचणीत येतील म्हणून मी आलो नसल्याचे सांगितले. परंतु मी येवू शकलो नाही तरी प्रशासनाच्या संपर्कात मात्र नियमित होतो.

टॅग्स :washimवाशिमPoliticsराजकारण