शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

कृषी आयुक्तालयाने मागविली पीक नुकसानाची छायाचित्रे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2019 14:30 IST

छायाचित्रांच्या निरीक्षणानंतरच कृषी आयुक्तालयाकडून केंद्र शासनाकडे नुकसानाचा अंतिम अहवाल पाठविला जाणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : अवकाळी पावसाने जिल्ह्यातील पिकांचे अतोनात नुकसान झाले होते. यातील पीकविमाधारक शेतकऱ्यांंना भरपाई देण्यासाठी कृषी विभागाच्यावतीने एक सर्वकष अहवाल तयार करून कृषी आयुक्तालय पुणे यांच्याकडे पाठविण्यात आला. याअहवालाची पडताळणी सुरू असतानाच जिल्ह्यातील सर्व पीकविमाधारकांच्या नुकसानाची छायाचित्रे मागविण्यात आली असून, या छायाचित्रांच्या निरीक्षणानंतरच कृषी आयुक्तालयाकडून केंद्र शासनाकडे नुकसानाचा अंतिम अहवाल पाठविला जाणार आहे.जिल्ह्यात २७ आॅक्टोबर ते ४ नोव्हेंबरदरम्यान अवकाळी पावसामुळे शेतातील उभ्या पिकांसह काढणी केलेल्या सोयाबीनचे अतोनात नुकसान झाले. या नुकसानामुळे हवालदील झालेल्या शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी शासनाने महसूल व कृषी विभागाला तातडीने पंचनामे पूर्ण करण्याच्या सुचना केल्या. प्रत्यक्षात जिल्ह्यात २ लाख ९६ हजार १२५ शेतकºयांनी २ लाख ४ हजार ७८५ हेक्टर क्षेत्रातील पिकांचा विमा उतरविला होता. त्यातील १ लाख ५२ हजार १९४ शेतकºयांनी अवकाळी पावसामुळे झालेल्या पीक नुकसानापोटी विम्याचा लाभ मिळण्यासाठी प्रशासनाकडे अर्ज केले. या अर्जानुसार प्रशासनाने शेतकºयांच्या नुकसानाचे पंचनामेही केले. यानुसार पीक विमा काढणाºया शेतकºयांपैकी ६५ हजार ५४८ शेतकºयांच्या २८ हजार २६७ हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रातील उभ्या पिकांचे, तर १ लाख ३७ हजार ८५२ शेतकºयांच्या १ लाख ४३ हजार ७९८ हेक्टर क्षेत्रातील काढणी केलेल्या पिकांचे नुकसान झाल्याचे आढळून आले. अर्थात पीक विमा काढणाºया एकूण २ लाख ३ हजार ४०० शेतकºयांच्या १ लाख ७२ हजार ६५ पेक्षा अधिक हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले आहे. या शेतकºयांना पीकविम्याच्या निकषानुसार मदत देण्यासाठी कृषी विभागाच्यावतीने एक सर्वकष अहवाल तयार करून तो कृषी आयुक्तालय पुणे यांच्याकडे पाठविण्यात आला. या अहवालात बाधित शेतकºयांची नावे, गावे, पेरणीचे क्षेत्र, बाधित क्षेत्र ही अचूक माहिती नमूद करण्यात आली आहे. तथापि, या अहवालाची पडताळणी सुरू असतानाच आता कृषी आयुक्तालयाने पीकविमाधारक शेतकºयांच्या नुकसानाची प्रशासनाने काढलेली छायाचित्रे मागविली आहेत. अर्थात आता कृषी विभागाला २ लाख ३ हजार ४०० शेतकºयांच्या शेतातील नुकसानाची स्थिती दर्शविणारी छायाचित्रे पाठवावी लागत आहेत. कृषी विभागाकडून ही छायाचित्रे पाठविण्यातही येत आहेत.(प्रतिनिधी)शेतकºयाच्या नावासह छायाचित्राची होणार पडताळणीजिल्ह्यात आॅक्टोबरच्या अखेरीस आणि नोव्हेंबरच्या सुरुवातीला झालेल्या पावसामुळे उभ्या आणि काढणी पश्चात पिकांचे जे नुकसान झाले. त्याचा सचित्र अहवाल तयार करण्याच्या सुचना प्रशासनाला देण्यात आल्या होत्या. प्रशासनाने ही प्रक्रिया पूर्ण केली आणि त्यानंतर केंद्रीय पथकानेही नुकसानग्रस्त भागांची पाहणी केली. त्यानंतर कृषी विभागाने पीकविमाधारकांच्या नुकसानाचा अहवालही कृषी आयुक्तालयाकडे पाठविला. आता या अहवालासोबत प्रत्यक्ष शेतकºयाचे नाव असलेले नुकसानाचे छायाचित्र मागविण्यात आले असून, अहवालानुसार शेतकºयाच्या नावासह छायिाचत्रातील नुकसानाची पडताळणी कृषी आयुक्तालयाकडून करण्यात येणार आहे.पीकविमाधारक शेतकºयांच्या नुकसानाचा अहवाल कृषी आयुक्तालयाकडे पाठविण्यात आल्यानंतर आता नुकसानाची स्थिती दर्शविणारी छायाचित्रे त्यांच्याकडून मागविण्यात आली आहेत. अहवालानुसार शेतकºयांचे नुकसान दर्शविणाºया छायाचित्रांची पडताळणी त्यांच्याकडून करण्यात येणार आहे.-एस. एम. तोटावारजिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वाशिम

टॅग्स :washimवाशिमagricultureशेतीFarmerशेतकरी