शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

पावणे दोन लाख कुटुंबांना नळजोडणी, १०१ गावांत हर घर जल; जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा

By दिनेश पठाडे | Updated: November 7, 2023 18:25 IST

Washim News: जल जीवन मिशन अंतर्गत ग्रामीण कुटुंबांना नळजोडणी देण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. आतापर्यंत १ लाख ७८ हजार २८० कुटुंबांना नळजोडणी देण्यात आली असून १०१ गावात हर घर जल पोहचले आहे.

- दिनेश पठाडे वाशिम - जल जीवन मिशन अंतर्गत ग्रामीण कुटुंबांना नळजोडणी देण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. आतापर्यंत १ लाख ७८ हजार २८० कुटुंबांना नळजोडणी देण्यात आली असून १०१ गावात हर घर जल पोहचले आहे.  जानेवारी २०२४ पर्यंत जास्तीत जास्त कामे पूर्ण करण्याच्या सूचना   जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. यांनी आढावा बैठकीत मंगळवारी दिल्या. 

जिल्ह्यात २ लाख १९ हजार ५५४  ग्रामीण कुटुंब आहे. त्यातील १ लाख ७८ हजार २८० कुटुंबाना जल जीवन मिशनच्या माध्यमातून नळजोडणी देण्यात आली आहे. ४१ हजार २७४ कुटुंबांना नळजोडणी देण्याचे काम प्रगतीपथावर आहे.  जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागामार्फत ५६० गावात ५२१ योजना तर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या २२ गावात ५० योजना आहे. ५२ गावातील ५१ योजना ह्या निविदा प्रक्रियेमध्ये असून १०१ गांवे हर घर जल घोषित झाले असल्याची माहिती ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अजिंक्य वानखेडे यांनी बैठकीत दिली.

बुवनेश्वरी म्हणाल्या की,  ज्या ठिकाणी जल जीवन मिशनची कामे अद्याप सुरु झालेली नाही, ती कामे तातडीने सुरु करावी. मालेगांव हा आकांक्षित तालुका असल्याने या तालुक्यातील जल जीवनची कामे प्राधान्याने पुर्ण करण्यात यावी, गावातील कोणतेही कुटुंब नळजोडणीपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी, आगामी निवडणूकीची आचारसंहिता लक्षात घेता सर्व कामे तातडीने पूर्ण करावी, जिल्हयात पाण्याचा सिंचनासाठी अवैधपणे वापर होत असेल तर वीज वितरण कंपनीने संबंधितांवर कारवाई करावी, असे निर्देश त्यांनी दिले.

टॅग्स :washimवाशिम