शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
3
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
4
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
5
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
6
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
7
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
8
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
9
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
10
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
11
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
12
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
13
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
14
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
15
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
16
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
17
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
18
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
19
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

प्रलंबित सात प्रकल्पांच्या कामाचा मार्ग प्रशस्त!

By admin | Updated: March 15, 2017 02:55 IST

पाच वर्षांपासून थांबली कामे : सुप्रमा देण्याचा शासनाचा निर्णय

वाशिम, दि. १४- जिल्ह्यातील बहुतांश सिंचन प्रकल्प अंदाजित खर्चापेक्षा अधिक रक्कम लागणार असल्याने प्रलंबित होते. या प्रकल्पांसाठी सुधारित प्रशासकीय मान्यतेचा प्रस्ताव संबंधित विभागाने शासनाकडे पाठविला आहे. शासनाने राज्यातील अशा रखडलेल्या प्रकल्पांना मान्यता देऊन ते दोन वर्षात पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, जिल्ह्यातील ७ सिंचन प्रकल्पांच्या कामाचा मार्ग मोकळा झाला आहे. वाशिम जिल्ह्यात लघू पाटबंधारे विभागामार्फ त सन २00५ ते २00९ या कालावधित सात सिंचन प्रकल्पांना मान्यता मिळाली होती. या प्रक ल्पांमुळे जिल्ह्यातील ३ हजार ९४४ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार होते. या सर्व प्रकल्पांच्या खर्चाची मूळ प्रशासकीय मान्यता होती जवळपास शंभर कोटी; परंतु खर्चातील होणारी वाढ लक्षात घेत या कामांसाठी मूळ प्रशासकीय मान्यतेच्या तिप्पट खर्चाच्या सुधारित प्रशासकीय मान्यतेचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला. या सुधारित प्रशासकीय मान्यतेला हिरवी झेंडी न मिळाल्यामुळे सर्वच प्रकल्पांची कामे थांबली होती. दरम्यान, या सर्व प्रकल्पांच्या कामांना नियामक मंडळामार्फत ७ डिसेंबर २0१६ रोजी तांत्रिक मान्यताही दिली; परंतु आदेश निर्गमित केले नव्हते. आता शासनाने राज्यातील सुधारित प्रशासकीय मान्यतेअभावी रखडलेल्या २८२ प्रकल्पांना मान्यता देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्याचे जलसंधारण मंत्री गिरीष महाजन यांनी ७ मार्च रोजी विधानसभेत ही माहिती दिली होती. त्यामुळे जिल्ह्यातील सुधारित प्रशासकीय मान्यतेअभावी प्रलंबित असलेले सात प्रकल्प आता पूर्ण होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. या प्रकल्पांत ४0८ हेक्टर सिंचन क्षमतेचा धामणी (संग्राहक) प्रकल्प, ८१0 हेक्टर सिंचन क्षमतेचा वाडी रायताळ बृहत प्रकल्प, ६१५ हेक्टर सिंचन क्षमतेचा संग्राहक प्रकल्प, ९00 हेक्टर सिंचन क्षमतेचा वाकद प्रकल्प, चाकतीर्थ येथील १ हजार ७१२ हेक्टर सिंचन क्षमतेचा प्रकल्प, पळसखेड येथील ३९0 हेक्टर सिंचन क्षमतेचा प्रकल्प, तसेच मिर्झापूर येथील ६१0 हेक्टर सिंचन क्षमतेच्या प्रकल्पाचा समावेश आहे. हे सिंचन प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर केवळ जिल्ह्यातील सिंचन क्षेत्रातच वाढ होणार नाही, तर पाणीटंचाईच्या समस्येवरही मोठय़ा प्रमाणात नियंत्रण मिळणार आहे.