शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं
2
भारतीय लष्कराकडून पुन्हा एकदा ड्रोन स्ट्राईक, अनेक अतिरेकी ठार झाल्याचा दावा
3
बिहारच्या मतदार यादीत परदेशी लोकांची नावे; बांगलादेश, म्यानमार, नेपाळचे नागरिक आढळले
4
प्रियकरासोबत पत्नी वारंवार पळून जायची; घटस्फोट घेतला अन् दुधाने अंघोळ करुन आनंद साजरा केला
5
Video: IAS अधिकाऱ्याची परीक्षा हॉलमध्ये विद्यार्थ्याला मारहाण; कॉपी केल्याचा आरोप
6
IND vs ENG : 'गलीतली साडेसाती' संपली; जैस्वालचा 'यशस्वी' झेल! दुसऱ्यांदा रेड्डीच्या जाळ्यात फसला क्रॉउली (VIDEO)
7
पिवळी साडी... शेत... मादक अदा... पाहा, भारतीय क्रिकेटरच्या बहिणीचे ग्लॅमरस PHOTOS
8
वडिलांनीच घेतला मुलाची जीव, हॉटेलमध्ये नेले, बेदम मारहाण केली आणि...  
9
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला
10
"आतापर्यंत आम्ही एकट्याने निवडणुका लढवल्यात, आता…”, मनसे-ठाकरे गट युतीच्या चर्चांदरम्यान बाळा नांदगावकरांचं सूचक विधान 
11
आंद्रे रसेलच्या पत्नीने केला 'हटके' स्टाईल वर्कआऊट; जेसिमचा भन्नाट VIDEO होतोय व्हायरल
12
IND vs ENG : नाद करा, पण आमचा कुठं? DSP सिराजनं असा घेतला बेन डकेटचा बदला (VIDEO)
13
विमान कराचीला जाणार होते पण सौदी अरेबियाला कसे पोहोचले? पाकिस्तान एअरलाइन्सचा निष्काळजीपणा
14
तुमचे १ कोटी रुपये किती दिवसात ५० लाख होतील? महागाईची हे गणित समजून घ्या, अन्यथा निवृत्तीनंतर पश्चात्ताप होईल!
15
लगाव बत्ती: 'राजे'नीती! रॉयल फॅमिली आणि शिवकालीन गनिमी कावा
16
RBI चा मोठा निर्णय! शेतकऱ्यांसह लघु उद्योजकांना होणार थेट फायदा? आता कर्ज मिळणे होणार सोपं
17
IND vs ENG : शतकाचा मोह नडला; स्ट्राइक देण्याच्या नादातच पंत ठरला 'बळीचा बकरा'; KL राहुल म्हणाला...
18
नाशिकमध्ये महिलेने पतीचा झोपेतच दाबला गळा, हत्या करून फेकले जंगलात; गावात खळबळ
19
धबधबे, बोटिंग आणि निसर्ग सौंदर्य; कांडवनला वर्षा पर्यटनासाठी पर्यटकांची गर्दी   
20
'तीन दिवसापूर्वीच कट रचला होता'; राधिका हत्या प्रकरणात मैत्रिणीचा धक्कादायक खुलासा

प्रलंबित सात प्रकल्पांच्या कामाचा मार्ग प्रशस्त!

By admin | Updated: March 15, 2017 02:55 IST

पाच वर्षांपासून थांबली कामे : सुप्रमा देण्याचा शासनाचा निर्णय

वाशिम, दि. १४- जिल्ह्यातील बहुतांश सिंचन प्रकल्प अंदाजित खर्चापेक्षा अधिक रक्कम लागणार असल्याने प्रलंबित होते. या प्रकल्पांसाठी सुधारित प्रशासकीय मान्यतेचा प्रस्ताव संबंधित विभागाने शासनाकडे पाठविला आहे. शासनाने राज्यातील अशा रखडलेल्या प्रकल्पांना मान्यता देऊन ते दोन वर्षात पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, जिल्ह्यातील ७ सिंचन प्रकल्पांच्या कामाचा मार्ग मोकळा झाला आहे. वाशिम जिल्ह्यात लघू पाटबंधारे विभागामार्फ त सन २00५ ते २00९ या कालावधित सात सिंचन प्रकल्पांना मान्यता मिळाली होती. या प्रक ल्पांमुळे जिल्ह्यातील ३ हजार ९४४ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार होते. या सर्व प्रकल्पांच्या खर्चाची मूळ प्रशासकीय मान्यता होती जवळपास शंभर कोटी; परंतु खर्चातील होणारी वाढ लक्षात घेत या कामांसाठी मूळ प्रशासकीय मान्यतेच्या तिप्पट खर्चाच्या सुधारित प्रशासकीय मान्यतेचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला. या सुधारित प्रशासकीय मान्यतेला हिरवी झेंडी न मिळाल्यामुळे सर्वच प्रकल्पांची कामे थांबली होती. दरम्यान, या सर्व प्रकल्पांच्या कामांना नियामक मंडळामार्फत ७ डिसेंबर २0१६ रोजी तांत्रिक मान्यताही दिली; परंतु आदेश निर्गमित केले नव्हते. आता शासनाने राज्यातील सुधारित प्रशासकीय मान्यतेअभावी रखडलेल्या २८२ प्रकल्पांना मान्यता देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्याचे जलसंधारण मंत्री गिरीष महाजन यांनी ७ मार्च रोजी विधानसभेत ही माहिती दिली होती. त्यामुळे जिल्ह्यातील सुधारित प्रशासकीय मान्यतेअभावी प्रलंबित असलेले सात प्रकल्प आता पूर्ण होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. या प्रकल्पांत ४0८ हेक्टर सिंचन क्षमतेचा धामणी (संग्राहक) प्रकल्प, ८१0 हेक्टर सिंचन क्षमतेचा वाडी रायताळ बृहत प्रकल्प, ६१५ हेक्टर सिंचन क्षमतेचा संग्राहक प्रकल्प, ९00 हेक्टर सिंचन क्षमतेचा वाकद प्रकल्प, चाकतीर्थ येथील १ हजार ७१२ हेक्टर सिंचन क्षमतेचा प्रकल्प, पळसखेड येथील ३९0 हेक्टर सिंचन क्षमतेचा प्रकल्प, तसेच मिर्झापूर येथील ६१0 हेक्टर सिंचन क्षमतेच्या प्रकल्पाचा समावेश आहे. हे सिंचन प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर केवळ जिल्ह्यातील सिंचन क्षेत्रातच वाढ होणार नाही, तर पाणीटंचाईच्या समस्येवरही मोठय़ा प्रमाणात नियंत्रण मिळणार आहे.