शहरं
Join us  
Trending Stories
1
बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
2
भारताने रोखले चिनाबचे पाणी, लवकरच झेलमचेही थांबवणार
3
राज्यातील २,९९७ प्रकल्पांत ३३ टक्के पाणी शिल्लक; पातळी आणखी खालावणार
4
कर्नाळा येथे खाजगी प्रवासी बस उलटली; दोन प्रवाशांचा मृत्यू 
5
‘भारताबरोबर युद्ध झाले तर मी इंग्लंडला पळून जाईन’; पाकिस्तानी खासदार शेर मारवत यांचे अजब विधान 
6
निवडणूक आयोगाचे ४० मोबाइल ॲप्स एकाच प्लॅटफॉर्मवर; नाव शोधणे, तक्रार करणे सोयीचे
7
बँक, विमा, म्युच्युअल फंड असाे की शेअर बाजार; एकाच ठिकाणी होणार ‘केवायसी’ 
8
२७,८३७ विद्यार्थी आज देणार एमएचटी सीईटीची फेरपरीक्षा 
9
पाऊस पडायला अजून दीड महिना, अन् मे महिन्याच्या प्रारंभीच मुंबईचा पाणीसाठा २३ टक्क्यांवर
10
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
11
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
12
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
13
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
14
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

वाढत्या कोरोना संसर्गामुळे एसटी प्रवासाकडे प्रवाशांची पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2021 04:30 IST

वाशिम जिल्ह्यात सहा तालुके असले तरी एसटी महामंडळाचे आगार मात्र चारच आहेत. मंगरुळपीर, कारंजा, वाशिम आणि रिसोड असे हे ...

वाशिम जिल्ह्यात सहा तालुके असले तरी एसटी महामंडळाचे आगार मात्र चारच आहेत. मंगरुळपीर, कारंजा, वाशिम आणि रिसोड असे हे चार आगार आहेत. या चार आगारांतून पुणे, औरंगाबाद, नागपूर ते मुंबई या महानगराकडे दरदिवशी हजारो प्रवासी एसटीने प्रवास करतात. कोरोना संसर्गकाळात लॉकडाऊन जारी होण्यापूर्वीच एसटीच्या प्रवासी संख्येत घट झाली होती, तर लॉकडाऊन काढल्यानंतरही जवळपास दोन महिने एसटीच्या प्रवासीसंख्येला प्रतिसाद न मिळाल्याने एसटी महामंडळ डबघाईस आले होते. त्यानंतर मात्र एसटीच्या प्रवासी वाहतुकीला मोठा प्रतिसाद लाभू लागला. जिल्ह्यात ७ हजारांहून अधिक प्रवासी दरदिवशी एसटीने प्रवास करू लागले. आता मात्र कोरोना संसर्ग वाढत असल्याने प्रवासीसंख्येत मोठ्या प्रमाणात घट होत असल्याचे दिसत आहे. प्रत्यक्षात वाशिम जिल्ह्यात गेल्या दोनच दिवसांत प्रवाशांच्या संख्येत जवळपास ४० टक्के घट झाल्याने आगारप्रमुखांना काही फेऱ्या रद्दही कराव्या लागल्या आहेत.

----------------

औरंगाबाद मार्गावर प्रवासीसंख्येत मोठी घट

* वाशिम जिल्ह्यातील चारही आगारांतून नागपूर, औरंगाबाद, पुणे, जळगाव, नाशिक, मुंबई आदी महानगरांत मोठ्या संख्येने प्रवासी एसटीने प्रवास करतात.

* कोरोना संसर्ग वाढू लागल्याने जवळपासच्या जिल्ह्यांत एसटी प्रवाशांच्या संख्येवर परिणाम झाला असतानाच औरंगाबाद, मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या घटल्याचे चित्र आहे. महानगरातील कोरोना संसर्गाची स्थिती गंभीर असल्याने या महानगरांत जाण्यास जिल्ह्यातील लोक मागेपुढे पाहत आहेत.

----------------

८ मार्गावर एसटी बंद

* जिल्ह्यातील सर्वच प्रमुख मार्गावर एसटीच्या बसफेऱ्या धावत असल्या तरी ग्रामीण भागांतील ८ मार्गावर एसटीच्या बसफेऱ्या बंद आहेत.

* * * * * * *जिल्ह्यातील आगारात बसगाड्यांची संख्या कमी असल्याने उपलब्ध गाड्यांतून नियोजन केले जात असल्याने कमी प्रवासी असलेल्या ८ ग्रामीण मार्गावरील बसफेऱ्या बंद आहेत.

---------------

ना मास्क, ना डिस्टन्सिंग

जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्ग वाढत असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणे बंधनकारक केले आहे. तथापि, एसटीचे काही वाहक, चालक आणि अनेक प्रवासी मास्क वापरत नसून, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालनही होत नसल्याचे चित्र बसस्थानक आणि एसटीत दिसत आहे.

------------

जिल्ह्यातून एसटीने रोज प्रवास करणाऱ्यांची संख्या

३२०००

लॉकडाऊन खुला केल्यानंतरची संख्या

५०००

एसटी सध्या प्रवास करणाऱ्यांची संख्या

२००००