शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

वाशिम जिल्ह्यात गारपिटीच्या नुकसानाचे  पंचनामे संथगतीने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2018 13:33 IST

 वाशिम: जिल्ह्यात गत आठवड्यात सतत तीन दिवस अवकाळी पाऊस आणि गारपिट झाल्याने शेतातील उभ्या पिकांना फटका बसला. या नैसर्गिक आपत्तीत जिल्ह्यातील २६ हजार हेक्टरवरील पिकांना फटका बसला. राज्य शासनाने या पिक नुकसानीचे सर्वेक्षण करून तातडीने अहवाल सादर करण्याचे निर्देश कृषी व महसूल विभागाला दिले; परंतु अद्याप कृषी विभागाच्यावतीने सर्वेक्षणच पूर्ण ...

ठळक मुद्देतीन दिवस अवकाळी पाऊस आणि गारपिट झाल्याने शेतातील उभ्या पिकांना फटका बसला. कृषी आणि महसूल विभागाला संयुक्त पाहणी करून पीक नुकसानीचा अहवाल तातडीने सादर करण्याचे आदेशही दिले.आता आठवडा उलटत आला तरी, वाशिम जिल्ह्यातील पिक नुकसानीचे सर्वेक्षणच पूर्ण झाले नाही.

 

वाशिम: जिल्ह्यात गत आठवड्यात सतत तीन दिवस अवकाळी पाऊस आणि गारपिट झाल्याने शेतातील उभ्या पिकांना फटका बसला. या नैसर्गिक आपत्तीत जिल्ह्यातील २६ हजार हेक्टरवरील पिकांना फटका बसला. राज्य शासनाने या पिक नुकसानीचे सर्वेक्षण करून तातडीने अहवाल सादर करण्याचे निर्देश कृषी व महसूल विभागाला दिले; परंतु अद्याप कृषी विभागाच्यावतीने सर्वेक्षणच पूर्ण करण्यात आले नाही.

गत आठवड्यात १३ ते १५ फेब्रुवारीदरम्यान वाशिम जिल्ह्यात जोरदार अवकाळी पावसासह गारपिट झाली. या गारपिटीत एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला, तर रब्बी हंगामातील गहू, हरभरा, करडी या पिकांसह भाजीपाला आणि संत्रा, निंबू, केळी, पपई, द्राक्ष आदि पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. दरम्यान राज्यभरातच ही नैसर्गिक आपत्ती ओढवल्याने राज्य शासनाने शेतकºयांना आर्थिक मदत देण्याची घोषणा केली. यासाठी कृषी आणि महसूल विभागाला संयुक्त पाहणी करून पीक नुकसानीचा अहवाल तातडीने सादर करण्याचे आदेशही दिले; परंतु आता आठवडा उलटत आला तरी, वाशिम जिल्ह्यातील पिक नुकसानीचे सर्वेक्षणच पूर्ण झाले नाही. त्यामुळे प्रत्यक्ष अहवाल तयार करून शासनाकडे पाठविण्यास विलंब लागणार असून, शेतकºयांना शासनाच्या आर्थिक मदतीची प्रतिक्षा करावी लागणार असल्याचे दिसत आहे. 

टॅग्स :washimवाशिमHailstormगारपीट