शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
4
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
5
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
6
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
7
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
8
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
9
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
10
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
11
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
12
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
13
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
14
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
15
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
16
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
17
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
18
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
19
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यात गारपिटीच्या नुकसानाचे  पंचनामे संथगतीने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2018 13:33 IST

 वाशिम: जिल्ह्यात गत आठवड्यात सतत तीन दिवस अवकाळी पाऊस आणि गारपिट झाल्याने शेतातील उभ्या पिकांना फटका बसला. या नैसर्गिक आपत्तीत जिल्ह्यातील २६ हजार हेक्टरवरील पिकांना फटका बसला. राज्य शासनाने या पिक नुकसानीचे सर्वेक्षण करून तातडीने अहवाल सादर करण्याचे निर्देश कृषी व महसूल विभागाला दिले; परंतु अद्याप कृषी विभागाच्यावतीने सर्वेक्षणच पूर्ण ...

ठळक मुद्देतीन दिवस अवकाळी पाऊस आणि गारपिट झाल्याने शेतातील उभ्या पिकांना फटका बसला. कृषी आणि महसूल विभागाला संयुक्त पाहणी करून पीक नुकसानीचा अहवाल तातडीने सादर करण्याचे आदेशही दिले.आता आठवडा उलटत आला तरी, वाशिम जिल्ह्यातील पिक नुकसानीचे सर्वेक्षणच पूर्ण झाले नाही.

 

वाशिम: जिल्ह्यात गत आठवड्यात सतत तीन दिवस अवकाळी पाऊस आणि गारपिट झाल्याने शेतातील उभ्या पिकांना फटका बसला. या नैसर्गिक आपत्तीत जिल्ह्यातील २६ हजार हेक्टरवरील पिकांना फटका बसला. राज्य शासनाने या पिक नुकसानीचे सर्वेक्षण करून तातडीने अहवाल सादर करण्याचे निर्देश कृषी व महसूल विभागाला दिले; परंतु अद्याप कृषी विभागाच्यावतीने सर्वेक्षणच पूर्ण करण्यात आले नाही.

गत आठवड्यात १३ ते १५ फेब्रुवारीदरम्यान वाशिम जिल्ह्यात जोरदार अवकाळी पावसासह गारपिट झाली. या गारपिटीत एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला, तर रब्बी हंगामातील गहू, हरभरा, करडी या पिकांसह भाजीपाला आणि संत्रा, निंबू, केळी, पपई, द्राक्ष आदि पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. दरम्यान राज्यभरातच ही नैसर्गिक आपत्ती ओढवल्याने राज्य शासनाने शेतकºयांना आर्थिक मदत देण्याची घोषणा केली. यासाठी कृषी आणि महसूल विभागाला संयुक्त पाहणी करून पीक नुकसानीचा अहवाल तातडीने सादर करण्याचे आदेशही दिले; परंतु आता आठवडा उलटत आला तरी, वाशिम जिल्ह्यातील पिक नुकसानीचे सर्वेक्षणच पूर्ण झाले नाही. त्यामुळे प्रत्यक्ष अहवाल तयार करून शासनाकडे पाठविण्यास विलंब लागणार असून, शेतकºयांना शासनाच्या आर्थिक मदतीची प्रतिक्षा करावी लागणार असल्याचे दिसत आहे. 

टॅग्स :washimवाशिमHailstormगारपीट