शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

पांगरी नवघरे पोटनिवडणुकीने वेधले वाशिमा जिल्ह्याचे लक्ष्य; उत्सूकता शिगेला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2017 23:44 IST

१३ डिसेंबर रोजी होणा-या पांगरी नवघरे जिल्हा परिषद सर्कलच्या पोटनिवडणुकीने जिल्ह्याचे लक्ष वेधले असून, प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. तिरंगी लढतीत कोण बाजी मारेल, याची उत्सूकता शिगेला पोहोचली आहे. 

ठळक मुद्देप्रचार अंतिम टप्यात तिरंगी लढतीचे चित्र

लोकमत न्यूज नेटवर्कमालेगाव : १३ डिसेंबर रोजी होणा-या पांगरी नवघरे जिल्हा परिषद सर्कलच्या पोटनिवडणुकीने जिल्ह्याचे लक्ष वेधले असून, प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. तिरंगी लढतीत कोण बाजी मारेल, याची उत्सूकता शिगेला पोहोचली आहे. तत्कालिन जिल्हा परिषद सदस्य उषा जाधव यांचे जात वैधता  प्रमाणपत्र रद्द झाल्याने ही पोटनिवडणूक होत आहे.  संपूर्ण जिल्ह्यात पांगरी नवघरे सर्कलची ही पहिली निवडणूक असावी की ज्या निवडणूकमधे भारिप-बमसं वगळता इतर कोणताही प्रमुख पक्ष निवडणूक रिंगणात उतरला नाही. भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसंग्राम यांचे समर्थन घेऊन मनिषा धनंजय माने या निवडणूक रिंगणात आहेत तर भारिप-बमसंतर्फे लता रमेश अवचार आणि अपक्ष म्हणून संगीता सिद्धार्थ खिल्लारे निवडणूक लढवित आहेत. सध्या राज्य व देशात काँग्रेस व भाजपा या दोन पक्षांत घमासान सुरू आहे. खासदार राजीव सातव यांना गुजरातमध्ये झालेल्या मारहाणीवरून काँग्रेसने भाजपाला लक्ष्य केले आहे तर काँग्रेस नेते मणीशंकर अय्यर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याने भाजपाने काँग्रेसवर निशाणा साधलेला आहे. दुसरीकडे पांगरी नवघरे जिल्हा परिषद सर्कलमध्ये मात्र भाजपा व काँग्रेसचे पदाधिकारी हातात हात मिसळून निवडणुकीच्या प्रचारात उतरल्याने सर्वांच्या भूवया उंचाविल्या आहेत. पांगरी नवघरे जिल्हा परिषद सर्कलमध्ये एकूण १२ हजारांच्या वर मतदार आहेत. तिनही प्रमुख उमेदवारांनी प्रचाराला गती दिल्याने निवडणुक रंगतदार अवस्थेत पोहोचली आहे. कडाक्याच्या थंडीतही निवडणुकीने राजकीय वातावरण चांगलेच तापविले असल्याचे दिसून येते. सुरूवातीला प्रमुख चार पक्ष व शिवसंग्राम एकत्र आल्याने ही निवडणूक सरळ-सरळ होईल, असे वाटत होते. मात्र, इतर दोन्ही उमेदवारांनी प्रचारात आघाडी घेतल्याने ही निवडणूक चुरशीची बनली आहे. एका वर्षाच्या कालावधीसाठी ही पोटनिवडणूक होत असली तरी प्रमुख राजकीय पक्षांच्या नेत्यांनी निवडणूक प्रतिष्ठेची बनविल्याने संपूर्ण तालुक्यासह जिल्ह्याचे लक्ष या पोटनिवडणुकीकडे लागून आहे. तिनही उमेदवारांचा तोडीस तोड प्रचार असल्याने निवडणुकीत बाजी कोण मारेल, याचे चित्र मतमोजणीनंतरच स्पष्ट होईल.  

टॅग्स :washimवाशिम