शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

केवळ सात महसूल मंडळात पंचनामे; ३९ मंडळ वाऱ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2020 12:02 IST

Washim District, Agriculture जिल्ह्यात ४६ पैकी सात महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद असल्याने पंचनामे सुरू झाले.

- संतोष वानखडे लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : शेतकऱ्याची दाणादाण उडविणाऱ्या परतीच्या पावसाबरोबरच शासन नियमातील जाचक अटीही शेतकऱ्याच्या मूळावर उठल्या आहेत. महसुल विभागाच्या लेखी जिल्ह्यात ४६ पैकी सात महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद असल्याने पंचनामे सुरू झाले  तर उर्वरीत ३९ मंडळात अतिवृष्टी नसल्याने तेथील पंचनाम्याला सुरूवात होऊ शकली नाही.यंदाही नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी पुरता खचून गेला आहे. यावर्षी जिल्ह्यात सोयाबीनची सर्वाधिक अर्थात २ लाख ९३ हजार हेक्टरवर पेरणी झाली. ११ ऑक्टोबर रोजी जिल्ह्यात सर्वदूर परतीच्या पावसाने सोयाबीनसह कपाशी व अन्य पिकांचे अतोनात नुकसान केले. शेतात सोंगून ठेवलेल्या सोयाबीनच्या पेंढ्या पाण्याखाली आल्याने शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळले. नुकसानभरपाई मिळण्यासाठी पंचनामे आवश्यक आहेत. दुसरीकडे ११ ऑक्टोबरला जिल्ह्यातील केवळ सात महसूल मंडळात अतिवृष्टी झाल्याने तेथे पंचनामे सुरू झाले. प्रशासनाच्या लेखी ३९ महसूल मंडळात अतिवृष्टी नसल्याने तेथे पंचनाम्याला सुरूवात होऊ शकली नाही. त्यामुळे या महसूल मंडळातील ज्या शेतकऱ्यांनी पीकविमा उतरविला नाही, अशा शेतकऱ्यांना भरपाईपासून वंचित राहण्याची शक्यता नाकारता येत नाही.

 

टॅग्स :washimवाशिमagricultureशेती