शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
4
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
5
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
6
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
7
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
8
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
9
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
10
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
11
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
12
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
13
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
15
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
16
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
17
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
18
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
19
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
20
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर

केवळ सात महसूल मंडळात पंचनामे; ३९ मंडळ वाऱ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2020 12:02 IST

Washim District, Agriculture जिल्ह्यात ४६ पैकी सात महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद असल्याने पंचनामे सुरू झाले.

- संतोष वानखडे लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : शेतकऱ्याची दाणादाण उडविणाऱ्या परतीच्या पावसाबरोबरच शासन नियमातील जाचक अटीही शेतकऱ्याच्या मूळावर उठल्या आहेत. महसुल विभागाच्या लेखी जिल्ह्यात ४६ पैकी सात महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद असल्याने पंचनामे सुरू झाले  तर उर्वरीत ३९ मंडळात अतिवृष्टी नसल्याने तेथील पंचनाम्याला सुरूवात होऊ शकली नाही.यंदाही नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी पुरता खचून गेला आहे. यावर्षी जिल्ह्यात सोयाबीनची सर्वाधिक अर्थात २ लाख ९३ हजार हेक्टरवर पेरणी झाली. ११ ऑक्टोबर रोजी जिल्ह्यात सर्वदूर परतीच्या पावसाने सोयाबीनसह कपाशी व अन्य पिकांचे अतोनात नुकसान केले. शेतात सोंगून ठेवलेल्या सोयाबीनच्या पेंढ्या पाण्याखाली आल्याने शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळले. नुकसानभरपाई मिळण्यासाठी पंचनामे आवश्यक आहेत. दुसरीकडे ११ ऑक्टोबरला जिल्ह्यातील केवळ सात महसूल मंडळात अतिवृष्टी झाल्याने तेथे पंचनामे सुरू झाले. प्रशासनाच्या लेखी ३९ महसूल मंडळात अतिवृष्टी नसल्याने तेथे पंचनाम्याला सुरूवात होऊ शकली नाही. त्यामुळे या महसूल मंडळातील ज्या शेतकऱ्यांनी पीकविमा उतरविला नाही, अशा शेतकऱ्यांना भरपाईपासून वंचित राहण्याची शक्यता नाकारता येत नाही.

 

टॅग्स :washimवाशिमagricultureशेती