शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack : बांदीपोरामध्ये लष्कर-ए-तोयबाच्या ४ दहशतवाद्यांना अटक, पूंछ-अनंतनाग आणि उधमपूरमध्ये चकमक सुरू
2
४८ तासांत पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश; सीमा हैदरचं आता काय होणार?
3
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
4
पहलगाम व्हॅलीचे नाव 'हिंदू व्हॅली' करा! मराठी अभिनेत्याचा सरकारला सल्ला, म्हणाला- "श्रीनगरला भारताची उपराजधानी घोषित करा"
5
Success Story: 'आपली आजी', वय वर्ष ७४, युट्यूबद्वारे महिन्याला ६ लाखांची कमाई; मराठमोळ्या आजींचा कसा आहे प्रवास?
6
FIITJEE चे मालक डीके गोयल यांच्याविरोधात ईडीची कारवाई, १० ठिकाणांवर छापेमारी
7
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
8
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
9
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
10
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
11
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
12
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
13
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
14
"गेल्या महिन्यात काश्मीरला जायचा विचार करत होतो...", पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर प्रसाद खांडेकरची पोस्ट
15
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
16
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
17
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
18
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
19
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
20
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा

वाशिम जिल्ह्यात दीड वर्षांत १९०० पैकी केवळ ९३६ शेततळी पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2017 13:40 IST

वाशिम : मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेतील ‘मागेल त्याला शेततळे’ या योजनेचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे आव्हान प्रशासनाला पेलावे लागणार आहे. दीड वर्षांत १९०० पैकी केवळ ९३६ शेततळ्यांचे काम पूर्ण झाले.

ठळक मुद्देजिल्ह्यासाठी प्रारंभी १८०० शेततळ्यांचे उद्दिष्ट होते, नंतर १९०० शेततळ्यांचे सुधारित उद्दिष्ट देण्यात आले होते. ‘मागेल त्याला शेततळे’ या योजनेचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे आव्हान प्रशासनाला पेलावे लागणार आहे.या योजनेंतर्गतचे अनुदान दीड लाख रुपये केल्यास शेतकºयांसाठी ही बाब सोयीची ठरणारी राहिल.

वाशिम : मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेतील ‘मागेल त्याला शेततळे’ या योजनेचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे आव्हान प्रशासनाला पेलावे लागणार आहे. दीड वर्षांत १९०० पैकी केवळ ९३६ शेततळ्यांचे काम पूर्ण झाले.          महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांत पावसाचे प्रमाण कमी, तसेच अनिश्चित झाले आहे. त्यामुळे कोरडवाहू क्षेत्रातील पूर्णत: पावसावर अवलंबून असलेल्या पिकांवर तसेच उत्पादनावर विपरित परिणाम जाणवतो. शेती उत्पादनात शाश्वतता आणण्यासाठी तसेच दुष्काळावर मात करण्यासाठी राज्य शासनाने फेब्रुवारी २०१६ मध्ये ‘मागेल त्याला शेततळे’ ही योजना अंमलात आणली. यासाठी शेतकऱ्यांना ५० हजार रुपये अनुदान दिले जाते.या योजनेंतर्गत वाशिम जिल्ह्यासाठी प्रारंभी १८०० शेततळ्यांचे उद्दिष्ट निश्चित केले होते. नंतर त्यात वाढ करून १९०० शेततळ्यांचे सुधारित उद्दिष्ट देण्यात आले होते. वाशिम जिल्ह्याचा भूस्तर समान नसून, जिल्ह्यात अनेक ठिकाणी अवघ्या पाच फुट खोलवरच खडक लागतो. त्यामुळे शेतकºयांना निर्धारित अनुदानात शेततळ्यांचे खोदकाम करणे शक्य होत नाही. शासनाने शेततळ्यासाठी ५० हजार रुपये आर्थिक अनुदानाची मर्यादा घालून दिली असताना अनेक शेतकºयांना या रकमेपेक्षा दुपटीहून अधिक खर्च करून शेततळे तयार करावे लागले. या कारणामुळेच अनेक शेतकरी योजनेचा फायदा घेण्यास उत्सूक नसल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. शेतकºयांना योजनेतंर्गत खोदकामाच्या नंतर अनुदान प्राप्त होते. सुरुवातीलाच पैसा खर्च करावा लागत असल्याने अल्पभूधारक  शेतकºयांची इच्छा असताना आणि जमीन शेततळ्यासाठी योग्य असताना पैशाअभावी अडचणी निर्माण होतात, असे मत देऊळगाव बंडा येथील प्रगतशील शेतकरी सोनुबाबा सरनाईक यांनी व्यक्त केले. जिल्ह्यात आतापर्यंत ९३६ शेततळी पूर्ण झाली आहेत. या योजनेंतर्गतचे अनुदान दीड लाख रुपये केल्यास शेतकºयांसाठी ही बाब सोयीची ठरणारी राहिल. शासनाने शेतकºयांची रास्त मागणी विचारात घेऊन या योजनेंतर्गतचे अनुदान दीड लख रुपये करावे, अशी मागणी सोनुबाबा सरनाईक, पंजाबराव अवचार, गजानन अवचार, डॉ. संतोष बाजड यांनी केली.शेततळ्याचे उद्दिष्ट गाठण्याची कसरत !

टॅग्स :washimवाशिमagricultureशेती