शहरं
Join us  
Trending Stories
1
२०१९ पासून सोशल मीडियावर डॉक्टरांचं ब्रेनवॉश; व्हाइट कॉलर दहशतवादी मॉड्युल तपासात मोठा खुलासा
2
उत्तर प्रदेशमध्ये संशयित ४०० बँक खाती तपासली; जम्मू आणि काश्मीरमधील डॉक्टरांचे  लागेबांधे
3
लग्न पुढे ढकलल्यानंतर स्मृती मंधानाने अचानक इंस्टाग्रामवरून काढून टाकल्या 'या' खास पोस्ट
4
Paytm च्या फाऊंडरचं बिल झालं व्हायरल; ₹४०,००० च्या जेवणावर वाचवले ₹१६,०००, कशी झाली ही कमाल
5
गौरी पालवे मृत्यू प्रकरण: पंकजा मुंडेचे PA अनंत गर्जे यांना अटक, आज कोर्टात हजर करणार !
6
"गोंधळ घालायचा असेल तर येऊ नका...", कार्यक्रमात झालेल्या राड्यानंतर गौतमी पाटीलचं आवाहन
7
IND vs SA : गुवाहाटी कसोटी जिंकण्यासाठी शास्त्रींचा टीम इंडियाला 'अजब-गजब' सल्ला; म्हणाले...
8
अनपेड इंटर्नशिप ते कमी पगाराच्या पहिल्या नोकरीपर्यंत, नवीन लेबर कोडमुळे तरुणांचे बदलणार आयुष्य
9
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex १९५ अंकानी वधारला; Nifty २६,१०० च्या पार, 'या' शेअर्समध्ये तेजी
10
Sangli Accident: नशेत राँग साईडने निघाला, ६ गाड्या उडवल्या, अनेक जखमी; संतप्त लोकांनी स्कोडा कार फोडली
11
"मुंबई महापालिकेची ही शेवटची निवडणूक असेल, त्यानंतर..."; राज ठाकरेंचा 'मराठी माणसा'ला सावध राहण्याचा इशारा
12
म्युच्युअल फंडावर टॅक्स कसा लागतो? इक्विटी आणि डेट फंडसाठीचे नियम काय, टॅक्स वाचवण्याचे मार्ग जाणून घ्या
13
भारताच्या 'दुर्गा' सीमेचं रक्षण करणार, चीन सीमेवर महिला कमांडो; १० चौक्या उभ्या राहणार
14
"उदयपूरमध्येच आमची लव्हस्टोरी...", रणवीर सिंहने दीपिकासोबतच्या आठवणींना दिला उजाळा
15
कोण होणार नवीन पोलिस महासंचालक?; सदानंद दाते यांच्या नावाची चर्चा, केंद्राकडे नावे पाठवली
16
आजचे राशीभविष्य, २४ नोव्हेंबर २०२५: मन आनंदी राहील, आर्थिक लाभ होतील, नोकरीत लाभ होतील !
17
'बिग बॉस मराठी ६' लवकरच? कलर्स मराठीने शेअर केला 'धमाकेदार' प्रोमो, चाहत्यांची उत्सुकता शिगेला
18
अनंतच्या अनैतिक संबंधाची खात्री झाल्याने ‘ती’  खचली; एकदा अचानक आई वडील घरी पोहचले, तेव्हा...
19
१५ दिवसांपूर्वी साखरपुडा झाला होता, २ डिसेंबरला लग्न पण त्याआधीच मयुरेशवर काळाने घाला घातला
20
वयाच्या ४१ व्या वर्षी प्रसिद्ध अभिनेत्रीने केलं लग्न, वृंदावन मंदिरात अभिनेत्यासोबत अडकली विवाहबंधनात
Daily Top 2Weekly Top 5

बॅरेजेस् परिसरात १९०० पैकी केवळ ५० विद्युत रोहित्रांची कामे पूर्ण !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2019 16:27 IST

वाशिम : जिल्ह्यातील पैनगंगा नदीवर उभारण्यात आलेल्या ११ बॅरेजेसच्या परिसरात उपसा सिंचनाकरीता वितरण व्यवस्थेची क्षमता वाढविणे आणि त्या अनुषंगाने अतिभारीत होणाºया उपकेंद्राचा भार कमी करणे याकरीता ९५ कोटी रुपये मंजूर आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यातील पैनगंगा नदीवर उभारण्यात आलेल्या ११ बॅरेजेसच्या परिसरात उपसा सिंचनाकरीता वितरण व्यवस्थेची क्षमता वाढविणे आणि त्या अनुषंगाने अतिभारीत होणाºया उपकेंद्राचा भार कमी करणे याकरीता ९५ कोटी रुपये मंजूर आहेत. यामधून ९ नवीन उपकेंद्रे, १९०० नवीन रोहित्र उभारली जाणार आहेत. आतापर्यंत केवळ तीन उपकेंद्रे आणि ५० विद्युत रोहित्रांची कामे पूर्ण झाली असून, प्रशासकीय यंत्रणेची ही दिरंगाई शेतकºयांसाठी गैरसोयीची ठरत आहे.जिल्ह्यातून वाहणाºया पैनगंगा नदी परिसरातील हजारो शेतकºयांच्या शेतीला सिंचनाची जोड म्हणून जलसंपदा विभागाच्यावतीने ११ बॅरेजेस उभारण्यात आले. यासाठी तब्बल ७०० कोटी रुपयांपेक्षाही अधिक निधी खर्ची पडला. बॅरेजेसची कामेही विहित मुदतीत पूर्ण न झाल्याने अंदाजपत्रकीय किंमतीत भरमसाठ वाढ झाली. बॅरेजेसची कामे पूर्ण झाल्यानंतर उपसा सिंचनाकरीता विद्युत व्यवस्था उभारण्यासाठी साधारणत: सव्वा वर्षांपूर्वीच ९५ कोटी रुपयांचा आराखडा मंजूर झालेला आहे. यापैकी २५ कोटी रुपये एप्रिल २०१८ या महिन्यात जलसंपदा विभागाकडून महावितरणाला प्राप्तही झालेले आहेत. या निधीतून नवीन ९ उपकेंद्रे, उपकेंद्रांमध्ये अतिरिक्त तीन रोहित्र उभारणे, ३३ केव्हीची उच्च दाब वाहिणी १६५ किमी, ११ केव्ही उच्चदाब वाहिणी ३१० किमी, १९०० नवीन रोहित्रे आदी कामे केली जाणार आहेत. मात्र, या कामांची गती पाहता शेतकºयांच्या पदरी निराशाच पडत आहे. १९०० विद्युत रोहित्रांपैकी जवळपास १५० रोहित्रांची कामे सुरू असून, ५० कामे पूर्ण झाली आहेत. ९ नवीन उपकेंद्रांपैकी ३ उपकेंद्रांची कामे पूर्ण झाली असून, उर्वरीत कामे सुरू आहेत. विद्युतविषयक कामांची गती संथ असल्याने शेतकºयांना सिंंचन करण्यात अडथळे निर्माण होत आहेत. बॅरेजेसमुळे  वाशिम जिल्ह्यातील ५ हजार ५५४ हेक्टर आणि नजिकच्या हिंगोली जिल्ह्यातील २ हजार १३६ हेक्टर जमीन सिंचनाखाली आल्याचा दावा जलसंपदा विभागाने केला आहे. अवैध पद्धतीने पाणी उपसा झाल्याने व अन्य कारणांमुळे राजगाव, टनका, जयपूर, अडगाव, गणेशपूर, कोकलगाव या बॅरेजमध्ये ठणठणाट आहे. यामुळे उन्हाळी पीक घेण्याचे शेतकºयांचे स्वप्न भंगले आहे तर उर्वरीत बॅरेजेसमध्ये अत्यल्प जलसाठा असल्याने उन्हाळी पीक घेण्यापासून वंचित राहण्याची दाट शक्यता शेतकºयांमधून वर्तविली जात आहे. 

पैनगंगा नदीवर उभारण्यात आलेल्या ११ बॅरेजेसच्या परिसरात उपसा सिंचनाकरीता प्रस्तावित विद्युतविषयक कामे केली जात आहेत. आतापर्यंत नवीन तीन उपकेंद्रांची कामे पूर्ण झाली तसेच १५० पेक्षा अधिक विद्युत रोहित्रांची कामे अंतिम टप्प्यात असून ५० कामे पूर्णही झाली आहेत.- व्ही.बी. बेथारिया, अधीक्षक अभियंता, महावितरण, वाशिम

टॅग्स :washimवाशिमmahavitaranमहावितरण