शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
2
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
3
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
4
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
5
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
6
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
7
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
8
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
9
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
10
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
11
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
12
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
13
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
14
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
15
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
16
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
17
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
18
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!
19
१४ लाखांचं पॅकेज असलेला तरुण भररस्त्यात मॉडेलसमोर अचानक उभा राहिला, पॅन्टची चेन उघडली अन्...
20
E10 च्या वाहनांमध्ये E20 पेट्रोल वापरू नका, नाहीतर...; टोयोटाचा वाहन मालकांना इशारा...

बॅरेजेस् परिसरात १९०० पैकी केवळ ५० विद्युत रोहित्रांची कामे पूर्ण !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2019 16:27 IST

वाशिम : जिल्ह्यातील पैनगंगा नदीवर उभारण्यात आलेल्या ११ बॅरेजेसच्या परिसरात उपसा सिंचनाकरीता वितरण व्यवस्थेची क्षमता वाढविणे आणि त्या अनुषंगाने अतिभारीत होणाºया उपकेंद्राचा भार कमी करणे याकरीता ९५ कोटी रुपये मंजूर आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यातील पैनगंगा नदीवर उभारण्यात आलेल्या ११ बॅरेजेसच्या परिसरात उपसा सिंचनाकरीता वितरण व्यवस्थेची क्षमता वाढविणे आणि त्या अनुषंगाने अतिभारीत होणाºया उपकेंद्राचा भार कमी करणे याकरीता ९५ कोटी रुपये मंजूर आहेत. यामधून ९ नवीन उपकेंद्रे, १९०० नवीन रोहित्र उभारली जाणार आहेत. आतापर्यंत केवळ तीन उपकेंद्रे आणि ५० विद्युत रोहित्रांची कामे पूर्ण झाली असून, प्रशासकीय यंत्रणेची ही दिरंगाई शेतकºयांसाठी गैरसोयीची ठरत आहे.जिल्ह्यातून वाहणाºया पैनगंगा नदी परिसरातील हजारो शेतकºयांच्या शेतीला सिंचनाची जोड म्हणून जलसंपदा विभागाच्यावतीने ११ बॅरेजेस उभारण्यात आले. यासाठी तब्बल ७०० कोटी रुपयांपेक्षाही अधिक निधी खर्ची पडला. बॅरेजेसची कामेही विहित मुदतीत पूर्ण न झाल्याने अंदाजपत्रकीय किंमतीत भरमसाठ वाढ झाली. बॅरेजेसची कामे पूर्ण झाल्यानंतर उपसा सिंचनाकरीता विद्युत व्यवस्था उभारण्यासाठी साधारणत: सव्वा वर्षांपूर्वीच ९५ कोटी रुपयांचा आराखडा मंजूर झालेला आहे. यापैकी २५ कोटी रुपये एप्रिल २०१८ या महिन्यात जलसंपदा विभागाकडून महावितरणाला प्राप्तही झालेले आहेत. या निधीतून नवीन ९ उपकेंद्रे, उपकेंद्रांमध्ये अतिरिक्त तीन रोहित्र उभारणे, ३३ केव्हीची उच्च दाब वाहिणी १६५ किमी, ११ केव्ही उच्चदाब वाहिणी ३१० किमी, १९०० नवीन रोहित्रे आदी कामे केली जाणार आहेत. मात्र, या कामांची गती पाहता शेतकºयांच्या पदरी निराशाच पडत आहे. १९०० विद्युत रोहित्रांपैकी जवळपास १५० रोहित्रांची कामे सुरू असून, ५० कामे पूर्ण झाली आहेत. ९ नवीन उपकेंद्रांपैकी ३ उपकेंद्रांची कामे पूर्ण झाली असून, उर्वरीत कामे सुरू आहेत. विद्युतविषयक कामांची गती संथ असल्याने शेतकºयांना सिंंचन करण्यात अडथळे निर्माण होत आहेत. बॅरेजेसमुळे  वाशिम जिल्ह्यातील ५ हजार ५५४ हेक्टर आणि नजिकच्या हिंगोली जिल्ह्यातील २ हजार १३६ हेक्टर जमीन सिंचनाखाली आल्याचा दावा जलसंपदा विभागाने केला आहे. अवैध पद्धतीने पाणी उपसा झाल्याने व अन्य कारणांमुळे राजगाव, टनका, जयपूर, अडगाव, गणेशपूर, कोकलगाव या बॅरेजमध्ये ठणठणाट आहे. यामुळे उन्हाळी पीक घेण्याचे शेतकºयांचे स्वप्न भंगले आहे तर उर्वरीत बॅरेजेसमध्ये अत्यल्प जलसाठा असल्याने उन्हाळी पीक घेण्यापासून वंचित राहण्याची दाट शक्यता शेतकºयांमधून वर्तविली जात आहे. 

पैनगंगा नदीवर उभारण्यात आलेल्या ११ बॅरेजेसच्या परिसरात उपसा सिंचनाकरीता प्रस्तावित विद्युतविषयक कामे केली जात आहेत. आतापर्यंत नवीन तीन उपकेंद्रांची कामे पूर्ण झाली तसेच १५० पेक्षा अधिक विद्युत रोहित्रांची कामे अंतिम टप्प्यात असून ५० कामे पूर्णही झाली आहेत.- व्ही.बी. बेथारिया, अधीक्षक अभियंता, महावितरण, वाशिम

टॅग्स :washimवाशिमmahavitaranमहावितरण