शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

वृक्षलागवडीचा खर्च सामान्य फंडातून करण्याचा फतवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2019 14:24 IST

सामान्य फंडातून एवढा निधी कसा उभारायचा असा प्रश्न अनेक ग्राम पंचायतींसमोर निर्माण झाला आहे.

रिसोड : ग्राम पंचायतींना ३२५० वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट दिले असून, २२५० रोपट्यांच्या लागवडीचा खर्च हा सामान्य फंडातून करण्याचा फतवा रिसोड पंचायत समितीच्या गटविकास अधिकाºयांनी काढला आहे. सामान्य फंडातून २२५० रोपट्यांची लागवड केली तरच नरेगातून १००० रोपट्यांचे हजेरीपत्र काढले जाणार आहे. या प्रकाराला सरपंचांनी विरोध दर्शविला आहे.रिसोड तालुक्यातील प्रत्येक ग्राम पंचायतला यावर्षी ३२५० वृक्ष लागवडीचे उद्दीष्ट देण्यात आले आहे. दमदार पावसाच्या भरवशावर अनेक ग्राम पंचायत प्रशासन हे वृक्षलागवडीचे नियोजन करीत असताना ७ आॅगस्ट रोजी गटविकास अधिकाºयांनी ग्रामसेवक आणि ग्रामरोजगार सेवकांना एक पत्र पाठवून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून (मनरेगा) केवळ १००० वृक्ष लागवड करावी आणि २२५० वृक्षलागवड ही ग्राम पंचायतच्या सामान्य फंडातून करावी, अशा सूचना गटविकास अधिकाºयांनी दिल्या आहेत. सामान्य फंडातून २२५० वृक्षाची लागवड केली तरच १००० वृक्षाचे हजेरीपत्रक काढण्यात येईल अन्यथा काढता येणार नाही, असा इशाराही दिला. ज्या ग्राम पंचायतींनी सामान्य फंडातून खर्चाची तरतूद केली नाही, त्या ग्राम पंचायतच्या हजेरीपत्रकात गैरहजेरी मांडण्याचा धडाका सुरु झाला आहे. या प्रकारामुळे ग्राम पंचायतच्या पदाधिकाºयांमधून रोष व्यक्त होत आहे. १००० वृक्ष लागवडीचे तीन वर्षाचे १२ ते १३ लाख अंदाजपत्रक खर्च आहे. तो ‘मनरेगा’तून होणार आहे तर २२५० वृक्षाची तीन वर्षीय अंदाजपत्रीय खर्च हा जवळपास ३० ते ३२ लाख असणार आहे. एवढा खर्च तालुक्यातील बहुतांश ग्राम पंचायत करू शकणार नाहीत. लागवड केलेली झाडे दिड वर्षे जीवंत ठेवण्याचे हमीपत्र सरपंच, सचिवांकडून भरून घेण्यात आले आहे.सामान्य फंडातून एवढा निधी कसा उभारायचा असा प्रश्न अनेक ग्राम पंचायतींसमोर निर्माण झाला आहे. गटविकास अधिकाºयांच्या त्या पत्रामुळे वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट पूर्ण होणार की नाही, याबाबत ग्राम पंचायत पदाधिकाºयांमधून साशंकता वर्तविली जात आहे. याबाबत गटविकास अधिकाºयांना विचारणा केली,  ग्राम पंचायतजवळ पैसे नसतील तर मनरेगाअंतर्गतही वृक्षलागवड करू नका, असे त्यांनी स्पष्ट केले.

 आमच्या ग्राम पंचायतची वार्षिक कर वसुली ५० हजाराच्या आत आहे. त्यातुन वृक्षलागवडीवर लाखो रुपये कसे खर्च करावे हा प्रश्न या आदेशामुळे पडला आहे. - शोभाताई विजयराव अवचार उपसरपंच, ग्रा.प. किनखेडा ता. रिसोड

टॅग्स :washimवाशिमgram panchayatग्राम पंचायतRisodरिसोड