शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायत पोटनिवडणूकीसाठी दाखल झाले केवळ दोन उमेदवारी अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2019 12:40 IST

वाशिम आणि मानोरा या दोनच तालुक्यातून प्रत्येक एक याप्रमाणे केवळ दोन अर्ज दाखल झाले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : राज्य निवडणूक आयोगाने जिल्ह्यातील १८८ ग्रामपंचायतींच्या सरपंच, सदस्यपदाच्या रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असून नामनिर्देशनपत्र सादर करण्याची अंतीम मुदत तीन दिवसांवर (२१ नोव्हेंबर) येऊन ठेपली आहे. असे असताना १८ नोव्हेंबरअखेर वाशिम आणि मानोरा या दोनच तालुक्यातून प्रत्येक एक याप्रमाणे केवळ दोन अर्ज दाखल झाले आहेत.पोटनिवडणूक कार्यक्रमानुसार १६ ते २१ नोव्हेंबर या कालावधीत इच्छूक उमेदवारांकडून जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालयांमध्ये नामनिर्देशनपत्र स्विकारले जात आहे. प्राप्त होणाऱ्या नामनिर्देशनपत्रांची छाननी २२ नोव्हेंबर रोजी होणार आहे. २५ नोव्हेंबर रोजी नामनिर्देशनपत्रे मागे घेता येतील. त्याचदिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप होईल व अंतिमरीत्या निवडणूक लढविणाºया उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. आवश्यकता भासल्यास ८ डिसेंबर २०१९ रोजी मतदान घेण्यात येईल. मतमोजणी ९ डिसेंबर २०१९ रोजी होईल व १२ डिसेंबर २०१९ पर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत निवडणुकीच्या निकालाची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात येईल, असा पोटनिवडणूकीचा एकंदरित कार्यक्रम आहे.दरम्यान, वाशिम तालुक्यातील थेट सरपंच निवडीसाठी पोटनिवडणूक होत असलेल्या ग्रामपंचायतींमध्ये गोंडेगाव ग्रामपंचायतीचा समावेश असून सदस्य पदासाठी पोटनिवडणूक होत असलेल्या ग्रामपंचायतींमध्ये तांदळी बु., वारा जहांगीर, सावंगा जहांगीर, ब्रह्मा, किनखेडा, तोरणाळा, अनसिंग, पिंपळगाव, वाळकी जहांगीर, काजळंबा, वारला, अंजनखेडा, सोनखास, घोटा, हिस्सेबोराळा, सावरगावबर्डे, शेलगाव, असोला जहांगीर, चिखली बु. कार्ली, शेलू बु., नागठाणा, फाळेगाव थेट, सोंडा, सुकळी, ढिल्ली, हिवरा रोहिला, उमरा कापसे, टनका, सूपखेला, देवठाणा या ३१ ग्रामपंचायतींचा समावेश आहे.२१ नोव्हेंबर ही नामनिर्देशनपत्र सादर करण्याची अंतीम मुदत असताना १८ नोव्हेंबरपर्यंत मात्र वाशिम आणि मानोरा या दोन तालुक्यांमधून प्रत्येक एकाच उमेदवाराचा अर्ज दाखल झाला होता. हा अपवाद वगळता उर्वरित एकाही ग्रामपंचायतीतून नामनिर्देशनपत्र सादर झाले नसल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली.उमेदवारी अर्जांच्या बाबतीत चार तालुके निरंकग्रामपंचायत पोटनिवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याकरिता २१ नोव्हेंबर ही अंतीम मुदत आहे. असे असताना १८ नोव्हेंबरअखेर केवळ दोनच तालुक्यातून ते ही दोनच अर्ज दाखल झाले. अन्य चार तालुके या प्रक्रियेबाबत निरंकच असल्याचे दिसून येत आहे. रिसोड तालुक्यातील ४१, मंगरूळपीर तालुक्यातील १९, मालेगाव तालुक्यातील २४ आणि कारंजा तालुक्यातील ३५ ग्रामपंचायत क्षेत्रात पोटनिवडणूक होत असताना शनिवार आणि सोमवार या दोन दिवशी एकही अर्ज दाखल झाला नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

 

टॅग्स :washimवाशिमgram panchayatग्राम पंचायत