शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

मानोरा एमआयडीसीत केवळ एक उद्योग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2020 14:42 IST

अगरबत्ती तयार करण्याचा एकमेव उद्योग एमआयडीसीत सुरू असून जिनींग कारखाना काही दिवसांपूर्वी बंद पडला.

- माणिक डेरे  लोकमत न्यूज नेटवर्कमानोरा : येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या प्रशस्त जागेवर उद्योगांसाठी ३५ भुखंड पाडण्यात आले. त्यातील १५ भुखंड उद्योगांकरिता मागणी करणाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आले; मात्र मुलभूत सुविधांअभावी आजमितीस अगरबत्ती तयार करण्याचा एकमेव उद्योग एमआयडीसीत सुरू असून जिनींग कारखाना काही दिवसांपूर्वी बंद पडला. उद्योगांसंबंधीच्या या बिकट अवस्थेमुळे मानोरा तालुक्यात बेरोजगारीचा आलेख उंचावला असल्याचे दिसून येत आहे.छोट्या-मोठ्या स्वरूपातील उद्योगांना चालना मिळावी, यामाध्यमातून रोजगार निर्माण होऊन सुशिक्षित युवकांच्या हाताला काम मिळावे, यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने अन्य तालुक्यांप्रमाणेच मानोरा तालुक्यातही एमआयडीसीकरिता ठराविक जागा राखून ठेवलेली आहे. त्यावर ३५ भुखंड पाडण्यात आले असून १५ भुखंड उद्योग करू इच्छित नागरिकांच्या ताब्यात देण्यात आले आहेत. असे असले तरी एमआयडीसी परिसरात आजपर्यंत उद्योगांना आवश्यक ठरू पाहणाºया कुठल्याच ठोस सुविधा पुरविण्यात आलेल्या नाहीत. गतवर्षी परिसरात रस्ते तयार करण्यात आले; मात्र पाणी, विज, आवारभिंत यासह अन्य महत्वाच्या सुविधांची अद्याप उणिव भासत आहे. यामुळेच सुस्थितीत सुरू असलेला जिनींग कारखाना काही दिवसांपूर्वी बंद पडला असून सद्य:स्थितीत केवळ अगरबत्ती तयार करण्याचा एकमेव कारखाना एमआयडीसीत सुरू आहे. ‘एमआयडीसी’चे संबंधित अधिकारी अकोला येथील कार्यालयात बसत असल्याने नेमकी कैफीयत कुणाकडे मांडावी, असा प्रश्न नवउद्योजकांसमोर निर्माण झाला आहे. सुविधा नसल्याने भुखंड ताब्यात घेऊनही त्यावर उद्योग सुरू करायला कुणी धजावत नसल्याचे बोलले जात आहे.

मानोरा येथील एमआयडीसीमध्ये एकूण ३५ भुखंड पाडण्यात आले आहेत. त्यापैकी उद्योग करू इच्छित युवक, नागरिकांना १५ भुखंड देण्यात आले आहेत. त्यात अगरबत्ती तयार करण्याचा एक कारखाना सद्या सुरू आहे. कापूस प्रक्रिया करणारा जिनिग कारखाना मात्र बंद पडला. विज, पाणी, रस्ते यासह इतर सुविधा उभारणे सुरू आहे.- दिगंबर वाकोडेट्रेसर, एमआयडीसी, अकोला

टॅग्स :ManoraमानोराwashimवाशिमMIDCएमआयडीसी