शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

वाशिम जिल्ह्यात विहिर अधिग्रहणाचे केवळ आठच प्रस्ताव !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2018 15:06 IST

वाशिम: गतवर्षी अल्प प्रमाणात पाऊस झाल्याने यावर्षी ५१० गावांत पाणीटंचाईचे संकट घोंघावत आहे. दरम्यान पाणीटंचाईची तिव्रता कमी करण्यासाठी ४९१ विहिरींचे अधिग्रहण प्रस्तावित असतानाही, अद्याप केवळ आठ प्रस्ताव दाखल झाल्याने गावपातळीवरील प्रशासनाची उदासिनता चव्हाट्यावर आली आहे. 

ठळक मुद्देजिल्ह्यातील एकूण ५१० गावांत पाणीटंचाई गृहित धरून जिल्हा प्रशासनाने विविध उपाययोजना प्रस्तावित केल्या आहेत. यामध्ये ४९१ विहिरींचे अधिग्रहण ही उपाययोजना असून, पाणीटंचाईग्रस्त गावात विहिरींचे अधिग्रहण केले जाणार आहे. पाणीटंचाई गावांनी विहिर अधिग्रहणासाठी तालुका प्रशासनाच्या माध्यमातून जिल्हा प्रशासनाकडे प्रस्ताव सादर करणे अपेक्षीत आहे.

वाशिम: गतवर्षी अल्प प्रमाणात पाऊस झाल्याने यावर्षी ५१० गावांत पाणीटंचाईचे संकट घोंघावत आहे. दरम्यान पाणीटंचाईची तिव्रता कमी करण्यासाठी ४९१ विहिरींचे अधिग्रहण प्रस्तावित असतानाही, अद्याप केवळ आठ प्रस्ताव दाखल झाल्याने गावपातळीवरील प्रशासनाची उदासिनता चव्हाट्यावर आली आहे. 

गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी पावसाने सरासरी गाठली नाही. पावसात सातत्य नसल्याने जलप्रकल्पांतदेखील समाधानकारक जलसाठा होऊ शकला नाही. उन्हाळ्यात किती गावांत पाणीटंचाई निवारणार्थ उपाययोजना राबवायच्या, जलस्रोतांची स्थिती, तात्पुरत्या पाणी पुरवठा योजना, किती गावांत विहीर अधिग्रहणाची गरज आहे,  बोअरवेलची परिस्थिती कशी आहे, हातपंप दुरुस्ती, वीज देयकाचा भरणा न केल्याने बंद असलेल्या पाणीपुरवठा योजना, किती गावांत टँकरची गरज आहे, आदींसंदर्भात वाशिम जिल्हा प्रशासनाने ग्रामपंचायतींच्या माध्यमातून चाचपणी केली होती. चाचपणीअंती जिल्ह्यातील एकूण ५१० गावांत पाणीटंचाई गृहित धरून जिल्हा प्रशासनाने विविध उपाययोजना प्रस्तावित केल्या आहेत. यामध्ये ४९१ विहिरींचे अधिग्रहण ही उपाययोजना असून, पाणीटंचाईग्रस्त गावात विहिरींचे अधिग्रहण केले जाणार आहे. पाणीटंचाई गावांनी विहिर अधिग्रहणासाठी तालुका प्रशासनाच्या माध्यमातून जिल्हा प्रशासनाकडे प्रस्ताव सादर करणे अपेक्षीत आहे. अद्याप केवळ आठ गावांचा अपवाद वगळता कुणीही प्रस्ताव सादर केले नाहीत. त्यामुळे उपाययोजनांच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह लागत आहे. विहिर अधिग्रहण केल्यानंतर संबंधित विहिर किंवा बोअरवेलच्या ठिकाणी ‘अधिग्रहित’ असा फलकही लावण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाने दिलेल्या आहेत. 

टॅग्स :washimवाशिमWaterपाणी