शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यात विहिर अधिग्रहणाचे केवळ आठच प्रस्ताव !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2018 15:06 IST

वाशिम: गतवर्षी अल्प प्रमाणात पाऊस झाल्याने यावर्षी ५१० गावांत पाणीटंचाईचे संकट घोंघावत आहे. दरम्यान पाणीटंचाईची तिव्रता कमी करण्यासाठी ४९१ विहिरींचे अधिग्रहण प्रस्तावित असतानाही, अद्याप केवळ आठ प्रस्ताव दाखल झाल्याने गावपातळीवरील प्रशासनाची उदासिनता चव्हाट्यावर आली आहे. 

ठळक मुद्देजिल्ह्यातील एकूण ५१० गावांत पाणीटंचाई गृहित धरून जिल्हा प्रशासनाने विविध उपाययोजना प्रस्तावित केल्या आहेत. यामध्ये ४९१ विहिरींचे अधिग्रहण ही उपाययोजना असून, पाणीटंचाईग्रस्त गावात विहिरींचे अधिग्रहण केले जाणार आहे. पाणीटंचाई गावांनी विहिर अधिग्रहणासाठी तालुका प्रशासनाच्या माध्यमातून जिल्हा प्रशासनाकडे प्रस्ताव सादर करणे अपेक्षीत आहे.

वाशिम: गतवर्षी अल्प प्रमाणात पाऊस झाल्याने यावर्षी ५१० गावांत पाणीटंचाईचे संकट घोंघावत आहे. दरम्यान पाणीटंचाईची तिव्रता कमी करण्यासाठी ४९१ विहिरींचे अधिग्रहण प्रस्तावित असतानाही, अद्याप केवळ आठ प्रस्ताव दाखल झाल्याने गावपातळीवरील प्रशासनाची उदासिनता चव्हाट्यावर आली आहे. 

गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी पावसाने सरासरी गाठली नाही. पावसात सातत्य नसल्याने जलप्रकल्पांतदेखील समाधानकारक जलसाठा होऊ शकला नाही. उन्हाळ्यात किती गावांत पाणीटंचाई निवारणार्थ उपाययोजना राबवायच्या, जलस्रोतांची स्थिती, तात्पुरत्या पाणी पुरवठा योजना, किती गावांत विहीर अधिग्रहणाची गरज आहे,  बोअरवेलची परिस्थिती कशी आहे, हातपंप दुरुस्ती, वीज देयकाचा भरणा न केल्याने बंद असलेल्या पाणीपुरवठा योजना, किती गावांत टँकरची गरज आहे, आदींसंदर्भात वाशिम जिल्हा प्रशासनाने ग्रामपंचायतींच्या माध्यमातून चाचपणी केली होती. चाचपणीअंती जिल्ह्यातील एकूण ५१० गावांत पाणीटंचाई गृहित धरून जिल्हा प्रशासनाने विविध उपाययोजना प्रस्तावित केल्या आहेत. यामध्ये ४९१ विहिरींचे अधिग्रहण ही उपाययोजना असून, पाणीटंचाईग्रस्त गावात विहिरींचे अधिग्रहण केले जाणार आहे. पाणीटंचाई गावांनी विहिर अधिग्रहणासाठी तालुका प्रशासनाच्या माध्यमातून जिल्हा प्रशासनाकडे प्रस्ताव सादर करणे अपेक्षीत आहे. अद्याप केवळ आठ गावांचा अपवाद वगळता कुणीही प्रस्ताव सादर केले नाहीत. त्यामुळे उपाययोजनांच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह लागत आहे. विहिर अधिग्रहण केल्यानंतर संबंधित विहिर किंवा बोअरवेलच्या ठिकाणी ‘अधिग्रहित’ असा फलकही लावण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाने दिलेल्या आहेत. 

टॅग्स :washimवाशिमWaterपाणी