शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

रिसोडमधील प्रकल्पांत केवळ २४ टक्के साठा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2019 14:37 IST

पाणीटंचाई तीव्र: गुराढोरांचा प्रश्न गंभीर लोकमत न्यूज नेटवर्क रिसोड ( वाशिम ): तालुक्यात गतवेळच्या पावसाळ्यात वार्षिक सरासरीच्या तुलनेत कमी ...

पाणीटंचाई तीव्र: गुराढोरांचा प्रश्न गंभीरलोकमत न्यूज नेटवर्करिसोड (वाशिम): तालुक्यात गतवेळच्या पावसाळ्यात वार्षिक सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस पडल्याने दुष्काळी स्थिती निर्माण झाली असून, तालुक्यातील १८ प्रकल्पांत मिळून केवळ २४ टक्के उपयुक्त साठा उरला आहे.रिसोड तालुक्यात गतवेळच्या पावसाळ्यात अपुरा पाऊस पडल्याने कृषी उत्पादनात प्रचंड घट आली. त्यातच प्रकल्पात पुरेसा जलसंचयही झाला नाही. त्यामुळे शासनाने या तालुक्यात मध्यम स्वरुपाचा दुष्काळ जाहीर केला आहे. आता तालुक्यातील १८ प्रकल्पांतील पातळी वाढते तापमान आणि उपशामुळे झपाट्याने घटत चालली आहे. सद्यस्थितीत तालुक्यातील बॅरेजेस आणि प्रकल्प मिळून १८ प्रकल्पांत केवळ ७.५० दलघमी उपयुक्त पाणीसाठा उरला असून, प्रकल्पातील साठवण क्षमतेच्या तुलनेत हे प्रमाण केवळ २४ टक्के आहे. यामुळे तालुक्यात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली असून, गुराढोरांच्या पाण्याचा प्र्रश्नही गंभीर झाला आहे. ग्रामस्थ पाण्यासाठी वणवण भटकंती करीत असल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे. शासनाने तालुक्यात तीव्र पाणीटंचाई असलेल्या गावांत टँकरने पाणी पुरवठा सुरू करण्याची मागणी ग्रामस्थांच्यावतीने करण्यात येत आहे.  ६ प्रकल्पांची पातळी शुन्य, ५ प्रकल्प कोरडेरिसोड तालुक्यातील १८ प्रकल्पांपैकी ६ प्रकल्पांत शुन्य टक्के उपयुक्त साठा उरला आहे. त्यात बोरखेडी, धोडप, गौंढाळा, हराळ, करडा आणि वरुड बॅरेजचा समावेश असून, गणेशपूर, मांडवा, मोरगव्हाण, पाचंबा आणि जवळा हे ५ प्रकल्प कोरडे पडले आहेत.  त्यामुळे या गावांतील भुजलपातळीत मोठी घट येऊन विहिरी, कूपनलिकाही कोरड्या पडत आहेत, तर गुराढोरांसाठी पाणी मिळेनासे झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

टॅग्स :washimवाशिमRisodरिसोड