शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

वाशिम जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये उरला केवळ १० टक्के जलसाठा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 15:13 IST

वाशिम : यावर्षी मार्च महिन्याच्या सुरूवातीलाच जिल्ह्यात भीषण पाणीटंचाई उद्भवली असून १३१ पैकी ७८ प्रकल्प पूर्णत: कोरडे पडले आहेत. उर्वरित प्रकल्पांमध्येही उणापूरा १० टक्के जलसाठा शिल्लक असल्याचे जलसंपदा विभागाकडून ५ मार्च रोजी जाहीर झालेल्या अहवालावरून स्पष्ट झाले.

ठळक मुद्देवाशिम तालुक्यातील एकबुर्जी या मध्यम प्रकल्पात आजरोजी ११.३६ टक्के पाणीसाठा शिल्लक. सोनल या मध्यम प्रकल्पात मृत जलसाठा असून २२ लघुप्रकल्पांची पाणीपातळी ७ टक्क्यांपर्यंत खालावली आहे.कारंजा तालुक्यातील अडाण या मध्यम प्रकल्पात आजमितीस १६.८८ टक्के पाणीसाठा असून १४ लघुप्रकल्पांमध्ये केवळ ८ टक्के पाणीसाठा शिल्लक.

वाशिम : यावर्षी मार्च महिन्याच्या सुरूवातीलाच जिल्ह्यात भीषण पाणीटंचाई उद्भवली असून १३१ पैकी ७८ प्रकल्प पूर्णत: कोरडे पडले आहेत. उर्वरित प्रकल्पांमध्येही उणापूरा १० टक्के जलसाठा शिल्लक असल्याचे जलसंपदा विभागाकडून ५ मार्च रोजी जाहीर झालेल्या अहवालावरून स्पष्ट झाले. दरम्यान, आगामी दोन ते अडीच महिने पाण्याविना कसे भागणार, या चिंतेने जिल्हा प्रशासनासह नागरिकांनाही त्रस्त केले आहे. प्राप्त माहितीनुसार, जिल्ह्यातील वाशिम तालुक्यातील एकबुर्जी या मध्यम प्रकल्पात आजरोजी ११.३६ टक्के पाणीसाठा शिल्लक असून ३१ लघुप्रकल्पांमध्ये ११.०२ टक्के पाणीसाठा आहे. मालेगाव तालुक्यातील सोनल या मध्यम प्रकल्पात मृत जलसाठा असून २२ लघुप्रकल्पांची पाणीपातळी ७ टक्क्यांपर्यंत खालावली आहे. कारंजा तालुक्यातील अडाण या मध्यम प्रकल्पात आजमितीस १६.८८ टक्के पाणीसाठा असून १४ लघुप्रकल्पांमध्ये केवळ ८ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिलेला आहे. याशिवाय मंगरूळपिरातील १५ लघुप्रकल्पांमध्ये केवळ १.३० टक्के पाणीसाठा आहे. रिसोड तालुक्यातील २३ प्रकल्पांची पाणीपातळी १४.३१ टक्क्यांवर स्थिरावली असून मानोरा तालुक्यातील २३ प्रकल्पांमध्ये सद्या ८.४२ टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याची माहिती सूत्रांनी दिली.प्रकल्पांच्या पाणीपातळीत चिंताजनक घट होण्यासोबतच जिल्ह्यातील हातपंप, कुपनलिका, विहिरी यासह इतर जलस्त्रोतही दिवसागणिक कोरडे पडत चालल्याने शेकडो गावांमध्ये भीषण पाणीटंचाई उद्भवली आहे. त्यावर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सक्रीय पुढाकार घेणे अपेक्षित असल्याचे मत सुज्ञ नागरिकांमधून व्यक्त होत आहे. 

टॅग्स :washimवाशिमDamधरण