शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

वाशिम जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये उरला केवळ १० टक्के जलसाठा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 15:13 IST

वाशिम : यावर्षी मार्च महिन्याच्या सुरूवातीलाच जिल्ह्यात भीषण पाणीटंचाई उद्भवली असून १३१ पैकी ७८ प्रकल्प पूर्णत: कोरडे पडले आहेत. उर्वरित प्रकल्पांमध्येही उणापूरा १० टक्के जलसाठा शिल्लक असल्याचे जलसंपदा विभागाकडून ५ मार्च रोजी जाहीर झालेल्या अहवालावरून स्पष्ट झाले.

ठळक मुद्देवाशिम तालुक्यातील एकबुर्जी या मध्यम प्रकल्पात आजरोजी ११.३६ टक्के पाणीसाठा शिल्लक. सोनल या मध्यम प्रकल्पात मृत जलसाठा असून २२ लघुप्रकल्पांची पाणीपातळी ७ टक्क्यांपर्यंत खालावली आहे.कारंजा तालुक्यातील अडाण या मध्यम प्रकल्पात आजमितीस १६.८८ टक्के पाणीसाठा असून १४ लघुप्रकल्पांमध्ये केवळ ८ टक्के पाणीसाठा शिल्लक.

वाशिम : यावर्षी मार्च महिन्याच्या सुरूवातीलाच जिल्ह्यात भीषण पाणीटंचाई उद्भवली असून १३१ पैकी ७८ प्रकल्प पूर्णत: कोरडे पडले आहेत. उर्वरित प्रकल्पांमध्येही उणापूरा १० टक्के जलसाठा शिल्लक असल्याचे जलसंपदा विभागाकडून ५ मार्च रोजी जाहीर झालेल्या अहवालावरून स्पष्ट झाले. दरम्यान, आगामी दोन ते अडीच महिने पाण्याविना कसे भागणार, या चिंतेने जिल्हा प्रशासनासह नागरिकांनाही त्रस्त केले आहे. प्राप्त माहितीनुसार, जिल्ह्यातील वाशिम तालुक्यातील एकबुर्जी या मध्यम प्रकल्पात आजरोजी ११.३६ टक्के पाणीसाठा शिल्लक असून ३१ लघुप्रकल्पांमध्ये ११.०२ टक्के पाणीसाठा आहे. मालेगाव तालुक्यातील सोनल या मध्यम प्रकल्पात मृत जलसाठा असून २२ लघुप्रकल्पांची पाणीपातळी ७ टक्क्यांपर्यंत खालावली आहे. कारंजा तालुक्यातील अडाण या मध्यम प्रकल्पात आजमितीस १६.८८ टक्के पाणीसाठा असून १४ लघुप्रकल्पांमध्ये केवळ ८ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिलेला आहे. याशिवाय मंगरूळपिरातील १५ लघुप्रकल्पांमध्ये केवळ १.३० टक्के पाणीसाठा आहे. रिसोड तालुक्यातील २३ प्रकल्पांची पाणीपातळी १४.३१ टक्क्यांवर स्थिरावली असून मानोरा तालुक्यातील २३ प्रकल्पांमध्ये सद्या ८.४२ टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याची माहिती सूत्रांनी दिली.प्रकल्पांच्या पाणीपातळीत चिंताजनक घट होण्यासोबतच जिल्ह्यातील हातपंप, कुपनलिका, विहिरी यासह इतर जलस्त्रोतही दिवसागणिक कोरडे पडत चालल्याने शेकडो गावांमध्ये भीषण पाणीटंचाई उद्भवली आहे. त्यावर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सक्रीय पुढाकार घेणे अपेक्षित असल्याचे मत सुज्ञ नागरिकांमधून व्यक्त होत आहे. 

टॅग्स :washimवाशिमDamधरण