शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

'खेलो इंडिया'मध्ये निवडीसाठी एक लाख मागितल्याचा आरोप 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2018 15:34 IST

मालेगाव (वाशिम): केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘खेलो इंडिया’ या युवा राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत राज्य कबड्डी संघात निवडीसाठी निवड समितीत मार्गदर्शक असलेल्या सदस्याने खेळाडू निवडीसाठी दोघांकडे एक लाख रुपयांची मागणी केल्याचा आरोप समितीतील सदस्य राजीव आढाव यांनी केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क मालेगाव (वाशिम): केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘खेलो इंडिया’ या युवा राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत राज्य कबड्डी संघात निवडीसाठी निवड समितीत मार्गदर्शक असलेल्या सदस्याने खेळाडू निवडीसाठी दोघांकडे एक लाख रुपयांची मागणी केल्याचा आरोप समितीतील सदस्य राजीव आढाव यांनी केला आहे. याबाबत त्यांनी शिक्षण मंत्रालयासह मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली आहे.  क्रीडा व युवक संचालनालय शिवछत्रपती क्रीडा संकुल पुणे यांच्यावतीने २९ आणि ३० नोव्हेंबर रोजी  निवड चाचणी घेण्यात आली. या निवड चाचणीत निवड करण्यासाठी काही सदस्य घेण्यात आले. त्यामध्ये गीता साखरे पुणे, किशोर बोंडे वाशिम, विदर्भ कबड्डी असोशिएशनचे राजू आढाव वाशिम. विजय खोकले गडचिरोली, संघटनेचे प्रतिनिधी हिराचंद पाटील यांची निवड शासनाच्यावतीने करण्यात आली होती. निवड समिती सदस्य राजू आढाव यांनी केलेल्या तक्रारीनुसार २० नोव्हेंबरला राष्ट्रीय कबड्डी खेळाडूंची निवड चाचणी घेण्यात आली. यात विदभार्तील सहा खेळाडूंचा सहभाग होता. निवड समिती मार्फत घेण्यात आलेल्या चाचणीत राज्यातून विविध ठिकाणाहून आलेल्या खेळाडूंप्रमाणे विदर्भातील खेळाडूंचाही उत्कृष्ट सहभाग होता. मात्र समितीतील एका सदस्याने विदर्भातील दोन खेळाडूंचे नाव राष्ट्रीय कबड्डी संघात समावेश करून त्यांच्या निवडीसाठी एकूण खर्च तसेच कार्यालयीन कर्मचारी सांभाळण्यासाठी प्रत्येकी ५० हजार रुपये पालकांकडून मागून आम्हाला द्यावेत, असे सुचवल्याचा आरोप आढाव यांनी तक्रारीत केला असून, तीन सदस्यांनी नियमात बसत नसतानाही जास्त वजन गटाच्या खेळाडूंना खेळण्याची मुभा दिली असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. शिवाय समितीतील सदस्य हे आपण सुचविलेल्या कोणत्याही मताचा आदर करत नाहीत. त्यामुळे विदर्भातील सर्व खेळाडूंवर वारंवार अन्याय होतोत्यामुळे या समितीतील अन्य सदस्यांची लाचलुचपत विभागातर्फे चौकशी करून विदर्भातील खेळाडूंना न्याय द्यावा. अशी मागणी त्यांनी केली आहे.

टॅग्स :washimवाशिमKhelo Indiaखेलो इंडियाKabaddiकबड्डी