शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
4
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
5
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
6
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
7
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
8
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
11
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
12
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
13
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
14
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
15
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
16
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
17
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
18
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
19
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
20
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत

अपघातात एक ठार; चार जण गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:47 IST

अपघाताची पहिली घटना ३ सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजता घडली. यात विकास भिकासिंग राठोड हे आपल्या एम एच ३७ ...

अपघाताची पहिली घटना ३ सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजता घडली. यात विकास भिकासिंग राठोड हे आपल्या एम एच ३७ झेड ३२०८ क्रमांकाच्या दुचाकीने काजळेश्वरहून कारंजाकडे येत असताना, समृद्धी महामार्गाच्या कामामुळे रस्ता खराब झाल्याने ते दुचाकी घसरल्याने खाली पडले. त्यानंतर, भरधाव वेगाने येणारे अज्ञात वाहन त्यांच्या अंगावरून गेल्याने विकास भिकासिंग राठोड (४५) रा. काजळेश्वर यांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची दुसरी घटना ३ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता कारंजा ते मंगरुळपीर मार्गावरील शेलुवाडा फाट्याजवळ घडली. यात सागर भाऊराव महाजनकर (२५) रा. मंगरूळपीर हे गंभीर जखमी झाले.

००००००

चैाघांचीही प्रकृती गंभीर

अपघाताची तिसरी घटना ४ सप्टेंबर रोजी पहाटे ४ वाजताच्या दरम्यान कारंजा ते अमरावती मार्गाजवळील वाल्हई फाट्याजवळ घडली. यात तिघे एम.एच. ११ सी क्यु ७५२५ क्रमांकाच्या कारने गोंदियाहून साताऱ्याकडे जात होते. दरम्यान, मार्गातील अपघातस्थळी कारला पिकअपची समोरासमोर धडक बसली. यात शिवन सतीश भोसले (२५), विठ्ठल लक्ष्मण भोसले (६५) व विक्रमसिंग विठ्ठलराव भोसले (३०) सर्व रा.राजवडी ता.मान, जि.सातारा यांचा समावेश आहे. तिन्ही अपघातांतील जखमी व्यक्तींना रुग्णवाहिकेच्या मदतीने उपचारासाठी कारंजा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले, परंतु चौघांचीही प्रकृती गंभीर असल्याने, त्यांना पुढील उपचारासाठी अमरावती येथे पाठविण्यात आल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.