सदर अभियानात ३० सप्टेंबरपर्यंत या पोषण अभियानामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. यावेळी १ सप्टेंबर रोजी जनजागृती रॅली काढण्यात आली. सुदृढ व निरोगी आरोग्यासाठी पोषण आहार व पौष्टिक घटकांचे महत्व,परसबाग तयार करणे,स्तनदा व गर्भवती महिलांची तपासणी,कुपोषित बालकांचा शोध आदी उद्देशातून जिल्ह्यात संपूर्ण सप्टेंबर महिन्यात विविध उपक्रम व कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. सदर कार्यक्रमांमध्ये १ सप्टेंबर रोजी शहरातील सर्व अंगणवाडी सेविकांनी पोषण रॅली काढून आरोग्य विषयी विविध घोषवाक्य रॅली देण्यात आली. तसेच यामध्ये वृक्षारोपण,आहार व आरोग्य याविषयी जनजागृती करण्यात आली. गरोदर माता स्तनदा माता ० ते ६ मुले यांना आहार,आरोग्य व त्यांच्या वजनाविषयी, स्वच्छतेविषयी याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. यामुळे आता १ ते ३० सप्टेंबर या एक महिन्याच्या कालावधीत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. गरोदर,स्तनदा माता,सहा वर्षांपर्यंतची बालके यांच्या आहारात पोषणाचे महत्व वाढविण्यासाठी अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन प्रबोधन करणार आहेत.
अंगणवाडी केंद्रांतर्फे पोषण अभियान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:46 IST