शहरं
Join us  
Trending Stories
1
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
2
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
3
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
4
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
5
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
6
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
7
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
8
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
9
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
10
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
11
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
12
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
13
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
14
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
15
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
16
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
17
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

कारंजात रुग्णसंख्येचा आलेख खालावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:31 IST

कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत जिल्ह्यातील कारंजा शहर व परिसरात सुरुवातीच्या टप्प्यात सर्वाधिक रुग्ण आढळून आले होते. पुढील अनेक दिवस ...

कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत जिल्ह्यातील कारंजा शहर व परिसरात सुरुवातीच्या टप्प्यात सर्वाधिक रुग्ण आढळून आले होते. पुढील अनेक दिवस हे चित्र कायम राहिले. आता मात्र रुग्णसंख्या हळूहळू कमी होत चालली असून संकट ओसरत असल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.

.................

कोरोनाविषयक नियम पाळण्याचे आवाहन

वाशिम : कोरोना संसर्गाचे संकट अद्याप पूर्णत: निवळलेले नाही. त्यामुळे नागरिकांनी कुठलीच बेफिकिरी न बाळगता कोरोनाविषयक नियमांचे पालन करावे, असे आवाहन तहसीलदार विजय साळवे यांनी केले आहे.

.................

पाणीप्रश्न निकाली काढण्याची ग्वाही

वाशिम : स्थानिक जिल्हा सामान्य रुग्णालयात पिण्याच्या पाण्याचा अभाव आहे. यामुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांची गैरसोय होत असून हा प्रश्न विनाविलंब निकाली काढू, अशी ग्वाही जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ. मधुकर राठोड यांनी दिली.

..................

प्रवासी निवाऱ्यांमुळे ग्रामस्थांची सोय

वाशिम : वाशिम ते शेलुबाजार हा रस्ता नव्याने तयार करण्यात आला आहे. या रस्त्यावर विविध ठिकाणी प्रवासी निवारे उभारण्यात आले असून यामुळे आसपासच्या गावातील ग्रामस्थांची सोय झाली आहे.

..............

घरकूल कामांना वेग देण्याची मागणी

वाशिम : कोरोना विषाणू संसर्गाचे संकट तीव्र होण्यासोबतच रेतीही मिळत नसल्याने घरकुलांची कामे अर्धवट अवस्थेत रखडली आहेत. हा प्रश्न निकाली काढून घरकूल कामांना वेग देण्याची मागणी होत आहे.

.................

पूल नादुरुस्त; अडचण जाणवणार

वाशिम : कारंजा तालुक्यातील हिंगणवाडी ते रामटेक या चार किलोमीटर अंतराच्या रस्त्याचे काम रखडले असून पुलाची दुरुस्तीही प्रलंबित आहे. यामुळे पावसाळ्यात विशेष अडचण जाणवणार असल्याचे बोलले जात आहे.

................

बँकांमध्ये गर्दी; नियमांचे उल्लंघन

वाशिम : शहरातील विविध बँकांमध्ये ग्राहकांची गर्दी होत असून फिजिकल डिस्टन्सिंगच्या नियमाचे उल्लंघन केले जात आहे. याकडे प्रशासनाने लक्ष पुरविण्याची मागणी होत आहे.

कोरोनाचे संकट लक्षात घेता नागरिकांनी बँकांमध्ये गर्दी करू नये, कामानिमित्त आलेल्या नागरिकांनी ‘फिजिकल डिस्टन्सिंग’चा नियम पाळण्यासह तोंडाला मास्क लावावे, सॅनिटायझरचा वापर करावा, असे आवाहन वारंवार करण्यात येत आहे; मात्र अनेकांकडून त्याचे उल्लंघन केले जात असल्याचे दिसून येत आहे. याकडे प्रशासनाने लक्ष पुरवून नियम तोडणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.