शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या 'आयटी'वर नवे संकट! 'या' कंपन्यांवर २५ टक्के कर लावण्याचा अमेरिकी खासदाराचा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५: जिभेवर ताबा ठेवावा लागेल, वरिष्ठांशी वाद होण्याची शक्यता
3
अग्रलेख: भडकलेली 'जेन-झी'! भारताला अधिक सजग राहावे लागणार
4
धुमसते नेपाळ : संसद पेटविली; सर्वोच्च न्यायालय आणि अॅटर्नी जनरल कार्यालयात तोडफोड
5
मालेगाव २००८ बॉम्बस्फोट: प्रज्ञा ठाकूर, पुरोहितसह ६ जणांच्या मुक्ततेला उच्च न्यायालयात आव्हान
6
विशेष लेख: उपराष्ट्रपतिपदाच्या खुर्चीत 'खेळात न उतरणारा खेळाडू'
7
Apple Awe Dropping Event : Apple नं लाँच केला सर्वात स्लीम iPhone 17 Air! जाणून घ्या, किंमत अन् संपूर्ण स्पेसिफिकेशंस
8
Asia Cup 2025: कधी अन् कुठं पाहता येईल IND vs UAE मॅच? कसा आहे दोन्ही संघांमधील हेड-टू-हेड रेकॉर्ड?
9
iPhone 17, iPhone 17 Air, Pro आणि Pro Max ची किंमत किती? जाणून घ्या सविस्तर
10
अफगाणिस्तानची विजयी सलामी; हाँगकाँगची पाटी पुन्हा कोरीच! Asia Cup स्पर्धेतील सलग १२ वा पराभव
11
Apple Event 2025 : iPhone 17 Pro आणि 17 Pro Max लाँच, नवीन डिझाइन, अपग्रेड कॅमेरा अन्...; जाणून घ्या किंमत
12
Apple Event 2025 : iPhone 17 सीरीज लाँच, Pro Motion डिस्प्ले, 20 मिनिटांत चार्ज, आणखी काय-काय आहे खास? जाणून घ्या
13
ठाण्यात सत्ता आणायची असेल तर रावणाच्या...; गणेश नाईकांनी फुंकलं ठाणे महापालिका निवडणुकीचं रणशिंग
14
Apple Awe Dropping Event : Apple Watch 11 लाँच, '5G'सह मिळणार 'हे' ढासू फीचर्स; आतापर्यंतची 'बेस्ट स्मार्ट वॉच', कंपनीचा दावा
15
Apple चे नवे AirPods Pro 3 लाँच; किंमत मोठी, पण फीचर्स खुश करणारे!
16
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
17
ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू
18
Asia Cup T20 Fastest Fifty : वादळी खेळीसह ओमरझाईचं विक्रमी अर्धशतक; सूर्यकुमार यादवचा विक्रम मोडला
19
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
20
इस्रायलनं संपूर्ण मध्यपूर्वेलाच बनवलं युद्धभूमी, आता 'या' देशावर केली बॉम्बिंग...! कारण काय?

कोरोना रुग्णांची संख्या घटली; माध्यमिक शाळांची संख्या वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:44 IST

वाशिम : जिल्ह्यात कोरोना संसर्गाचे प्रमाण कमी होत असताना कोरोनामुक्त गावातील माध्यमिकच्या सुरू होणाऱ्या शाळांची संख्या वाढत आहे. महिनाभरात ...

वाशिम : जिल्ह्यात कोरोना संसर्गाचे प्रमाण कमी होत असताना कोरोनामुक्त गावातील माध्यमिकच्या सुरू होणाऱ्या शाळांची संख्या वाढत आहे. महिनाभरात ६४ शाळा आणखी सुरू झाल्या असून, या शाळांत विद्यार्थ्यांच्या उपस्थितीची संख्याही वाढली आहे. महिनाभरापूर्वी २० जुलै रोजी जिल्ह्यात ८१ शाळा सुरू झाल्या होत्या, तर २७ ऑगस्टच्या अहवालानुसार १४५ शाळा सुरू झाल्या आहेत. विशेष म्हणजे शाळेत विद्यार्थ्यांची संख्याही वाढत आहे.

काेरोनामुक्त गावांत ग्रामपंचायतचे संमतीपत्र प्राप्त झाल्यानंतर शासन निर्देशानुसार माध्यमिकच्या शाळा सुरू करण्याच्या प्रक्रियेला आरंभ झाला. त्यात २० जुलैपर्यंत आठवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी ८१ शाळा सुरू झाल्या, तर १९३ शाळांसाठी स्थानिक प्रशासनाच्या परवानगीअभावी सुरू होऊ शकल्या नव्हत्या. दरम्यान, जिल्ह्यात ४१९ ग्रामपंचायतींपैकी ४८० ग्रामपंचायती कोरोनामुक्त झाल्या असून, आता कोरोना रुग्णांची संख्याही घटू लागल्याने कोरोनामुक्त गावांतील शाळांची संख्या वाढू लागली आहे. जि.प. शिक्षण विभागाच्या अहवालानुसार २७ ऑगस्ट रोजीपर्यंत कोरोनामुक्त गावांतील १४५ शाळा सुरू झाल्या आहेत. दरम्यान, अद्यापही जवळपास ३३६ ग्रामपंचायतीअंतर्गत कोरोनामुक्त गावांत शाळा सुरू होण्याची प्रतीक्षा आहे.

-------

उपस्थित विद्यार्थ्यांची संख्या वाढली

त्यातही २० ऑगस्ट रोजी ८१ शाळांत ७५ हजार ७६० विद्यार्थ्यांपैकी केवळ २२६ विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. हे प्रमाण प्रत्यक्ष संख्येच्या केवळ ३.१९ टक्के होते, तर आता १४५ शाळांत ८८६० विद्यार्थी उपस्थित असून, हे प्रमाण प्रत्यक्ष संख्येच्या १२.६३ टक्के आहे. अर्थात, सुरू झालेल्या शाळांतील विद्यार्थ्यांची संख्या चौपटीने वाढली आहे.

००००००००००

१३० शाळा सुरू होण्याची प्रतीक्षा

जिल्ह्यात माध्यमिकच्या अर्थात आठवी ते बारावीच्या शाळांची संख्या २७५ आहे. जिल्ह्यातील कोरोना संसर्ग नियंत्रणात असल्याने जवळपास ४८० ग्रामपंचायती कोरोनामुक्त झाल्या असून, या ग्रामपंचायतीअंतर्गत आठवी ते बारावीच्या १४५ शाळाच सुरू झालेल्या आहेत, तर अद्यापही १३० शाळा सुरू होण्याची प्रतीक्षा आहे.

०००००००००

कोरोना रुग्ण आढळल्यानंतर २ शाळा बंद

कोरोनामुक्त गावांत ग्रामपंचायतचे संमतीपत्र मिळाल्यानंतरच आठवी ते बारावीच्या शाळा सुरू करण्यात येत असून, या गावांत पुन्हा कोरोना रुग्ण आढळल्यानंतर तेथील शाळा बंद करावी लागत आहे. आजवर मानोरा आणि रिसोड तालुक्यातील प्रत्येकी एका गावात कोरोना रुग्ण आढळल्यानंतर तेथील शाळा बंद करावी लागल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.

०००००००००००००००००००००००

कारंजा तालुक्यात विद्यार्थ्यांची उपस्थिती सर्वाधिक

जिल्ह्यात आठवी ते बारावीपर्यंत ७५,७६० विद्यार्थीसंख्या आहे. २७ ऑगस्टपर्यंत एकूण ८८६० विद्यार्थी शाळेत हजर असल्याचे अहवालावरून दिसत आहे. हे प्रमाण १२.६३ टक्के आहे, त्यात कारंजा तालुक्यात सर्वाधिक २१.५२, मालेगावात १५.७१, मंगरुळपीर तालुक्यात १३.७८, वाशिम तालुक्यात १२.०३, रिसोड तालुक्यात ७. ४०, तर मानोरा तालुक्यात ५.५७ टक्के उपस्थितीचे प्रमाण आहे.

००००००००

- आठवी ते बारावीच्या एकूण शाळा - २७५

- सुरू झालेल्या शाळा - १४५

- विद्यार्थ्यांची एकूण संख्या - ७५,२६०

- उपस्थित विद्यार्थी - ८८६०

००००००००००

सुरू झालेल्या शाळा व उपस्थित विद्यार्थी

तालुका - शाळा - विद्यार्थी

कारंजा - ३७ - १७५०

मालेगाव - ३६ - १९७१

मं.पीर - १२ - ११२०

मानोरा - ११ - ६३०

रिसोड - २७ - १४१२

वाशिम- २२ - १९७७

००००००००००००००००००