शहरं
Join us  
Trending Stories
1
Ambernath Accident: अंबरनाथमध्ये निवडणुकीच्या प्रचारादरम्यान शिंदेसेनेच्या उमेदवाराच्या कारला अपघात, ४ ठार!
2
पत्नीही हवाई दलात पायलट, दुबई एअर शोमधील तेजसच्या शहीद पायलटचे लग्नही दुबईलाच झालेले...
3
IT कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! आता दर महिन्याच्या ७ तारखेपर्यंत पगार करावाच लागणार; नव्या कायद्यात काय काय...
4
नवा कामगार कायदा...! आता १ वर्षानंतर मिळणार ग्रॅच्युइटी; ५ वर्षांची अट बदलली...
5
पायलट 'निगेटिव्ह-जी ॲक्रोबॅटिक' युद्धाभ्यास करायला गेला अन्...; दुबई एअर शोमध्ये 'तेजस' विमान अपघाताचे कारण समोर आले...
6
भारतीय ज्युनियर महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकावर लैंगिक छळाचा आरोप; क्रीडा मंत्रालयाने चौकशीचे दिले आदेश
7
“भाजपाच्या रविंद्र चव्हाणांमुळे इथे युती तुटली, कोणता राग आहे माहिती नाही”: निलेश राणे
8
हिडमाचा खात्मा बनावट चकमकीत ? माओवाद्यांचा पत्रकातून गंभीर आरोप
9
वर्षाच्या अखेरीस आणखी एक महामारी येणार! नॉस्ट्राडेमसचे भाकित काय? जाणून घ्या
10
Video: अंबरनाथच्या उड्डाण पुलावर भीषण अपघात; कारने बाईकस्वार तिघांना उडवले, चौघांचा मृत्यू
11
ऐतिहासिक निर्णय! देशात चार नवे कामगार कायदे तात्काळ लागू; २९ जुने कायदे रद्द, श्रम धोरणाला आधुनिक स्वरूप
12
धक्कादायक! पत्नीने प्रियकरासाठी लग्नाच्या सातव्या दिवशी पतीची हत्या केली
13
उद्धव ठाकरेंचा भाजपाला मोठा धक्का; ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत बडा नेत्याच्या हाती शिवबंधन
14
IND A vs BAN A : 'सुपर ओव्हर'मध्ये भारताचा फ्लॉप शो! एकही चेंडू न खेळता बांगलादेशनं गाठली फायनल
15
“मालेगाव प्रकरणी आरोपीला फाशी द्या, राज्यात महिला मुलींची सुरक्षा रामभरोसे”: हर्षवर्धन सपकाळ
16
बिहारमध्ये भाजपाचा डाव! नितीश कुमारांना मुख्यमंत्रीपद दिलं पण, गृहमंत्रीपद स्वतः कडे ठेवले, २० वर्षांनंतर खाते सोडले
17
कर्नाटकच्या राजकारणात खळबळ! "सर्व १४० आमदार माझ्यासोबत", डी. के. शिवकुमार यांचे थेट विधान
18
तुम्हाला तुमची गाडी खूपच प्यारी आहे...! २० वर्षांहून जुन्या वाहनांच्या फिटनेस टेस्ट शुल्कात १५ पट वाढ
19
स्लीपर वंदे भारत देशभर फिरवली, ट्रायलनंतर परत पाठवली; ५ फॉल्ट समोर आले, लोकार्पण लांबणार?
20
फेस्टीव्ह संपला नाही तोच...! फ्लिपकार्ट 'ब्लॅक फ्रायडे सेल २०२५' ची तारीख ठरली, अमेझॉन थांबतेय होय...
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना रुग्णांची संख्या घटली; माध्यमिक शाळांची संख्या वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:44 IST

वाशिम : जिल्ह्यात कोरोना संसर्गाचे प्रमाण कमी होत असताना कोरोनामुक्त गावातील माध्यमिकच्या सुरू होणाऱ्या शाळांची संख्या वाढत आहे. महिनाभरात ...

वाशिम : जिल्ह्यात कोरोना संसर्गाचे प्रमाण कमी होत असताना कोरोनामुक्त गावातील माध्यमिकच्या सुरू होणाऱ्या शाळांची संख्या वाढत आहे. महिनाभरात ६४ शाळा आणखी सुरू झाल्या असून, या शाळांत विद्यार्थ्यांच्या उपस्थितीची संख्याही वाढली आहे. महिनाभरापूर्वी २० जुलै रोजी जिल्ह्यात ८१ शाळा सुरू झाल्या होत्या, तर २७ ऑगस्टच्या अहवालानुसार १४५ शाळा सुरू झाल्या आहेत. विशेष म्हणजे शाळेत विद्यार्थ्यांची संख्याही वाढत आहे.

काेरोनामुक्त गावांत ग्रामपंचायतचे संमतीपत्र प्राप्त झाल्यानंतर शासन निर्देशानुसार माध्यमिकच्या शाळा सुरू करण्याच्या प्रक्रियेला आरंभ झाला. त्यात २० जुलैपर्यंत आठवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी ८१ शाळा सुरू झाल्या, तर १९३ शाळांसाठी स्थानिक प्रशासनाच्या परवानगीअभावी सुरू होऊ शकल्या नव्हत्या. दरम्यान, जिल्ह्यात ४१९ ग्रामपंचायतींपैकी ४८० ग्रामपंचायती कोरोनामुक्त झाल्या असून, आता कोरोना रुग्णांची संख्याही घटू लागल्याने कोरोनामुक्त गावांतील शाळांची संख्या वाढू लागली आहे. जि.प. शिक्षण विभागाच्या अहवालानुसार २७ ऑगस्ट रोजीपर्यंत कोरोनामुक्त गावांतील १४५ शाळा सुरू झाल्या आहेत. दरम्यान, अद्यापही जवळपास ३३६ ग्रामपंचायतीअंतर्गत कोरोनामुक्त गावांत शाळा सुरू होण्याची प्रतीक्षा आहे.

-------

उपस्थित विद्यार्थ्यांची संख्या वाढली

त्यातही २० ऑगस्ट रोजी ८१ शाळांत ७५ हजार ७६० विद्यार्थ्यांपैकी केवळ २२६ विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. हे प्रमाण प्रत्यक्ष संख्येच्या केवळ ३.१९ टक्के होते, तर आता १४५ शाळांत ८८६० विद्यार्थी उपस्थित असून, हे प्रमाण प्रत्यक्ष संख्येच्या १२.६३ टक्के आहे. अर्थात, सुरू झालेल्या शाळांतील विद्यार्थ्यांची संख्या चौपटीने वाढली आहे.

००००००००००

१३० शाळा सुरू होण्याची प्रतीक्षा

जिल्ह्यात माध्यमिकच्या अर्थात आठवी ते बारावीच्या शाळांची संख्या २७५ आहे. जिल्ह्यातील कोरोना संसर्ग नियंत्रणात असल्याने जवळपास ४८० ग्रामपंचायती कोरोनामुक्त झाल्या असून, या ग्रामपंचायतीअंतर्गत आठवी ते बारावीच्या १४५ शाळाच सुरू झालेल्या आहेत, तर अद्यापही १३० शाळा सुरू होण्याची प्रतीक्षा आहे.

०००००००००

कोरोना रुग्ण आढळल्यानंतर २ शाळा बंद

कोरोनामुक्त गावांत ग्रामपंचायतचे संमतीपत्र मिळाल्यानंतरच आठवी ते बारावीच्या शाळा सुरू करण्यात येत असून, या गावांत पुन्हा कोरोना रुग्ण आढळल्यानंतर तेथील शाळा बंद करावी लागत आहे. आजवर मानोरा आणि रिसोड तालुक्यातील प्रत्येकी एका गावात कोरोना रुग्ण आढळल्यानंतर तेथील शाळा बंद करावी लागल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.

०००००००००००००००००००००००

कारंजा तालुक्यात विद्यार्थ्यांची उपस्थिती सर्वाधिक

जिल्ह्यात आठवी ते बारावीपर्यंत ७५,७६० विद्यार्थीसंख्या आहे. २७ ऑगस्टपर्यंत एकूण ८८६० विद्यार्थी शाळेत हजर असल्याचे अहवालावरून दिसत आहे. हे प्रमाण १२.६३ टक्के आहे, त्यात कारंजा तालुक्यात सर्वाधिक २१.५२, मालेगावात १५.७१, मंगरुळपीर तालुक्यात १३.७८, वाशिम तालुक्यात १२.०३, रिसोड तालुक्यात ७. ४०, तर मानोरा तालुक्यात ५.५७ टक्के उपस्थितीचे प्रमाण आहे.

००००००००

- आठवी ते बारावीच्या एकूण शाळा - २७५

- सुरू झालेल्या शाळा - १४५

- विद्यार्थ्यांची एकूण संख्या - ७५,२६०

- उपस्थित विद्यार्थी - ८८६०

००००००००००

सुरू झालेल्या शाळा व उपस्थित विद्यार्थी

तालुका - शाळा - विद्यार्थी

कारंजा - ३७ - १७५०

मालेगाव - ३६ - १९७१

मं.पीर - १२ - ११२०

मानोरा - ११ - ६३०

रिसोड - २७ - १४१२

वाशिम- २२ - १९७७

००००००००००००००००००