शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना रुग्णांची संख्या घटली; माध्यमिक शाळांची संख्या वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:44 IST

वाशिम : जिल्ह्यात कोरोना संसर्गाचे प्रमाण कमी होत असताना कोरोनामुक्त गावातील माध्यमिकच्या सुरू होणाऱ्या शाळांची संख्या वाढत आहे. महिनाभरात ...

वाशिम : जिल्ह्यात कोरोना संसर्गाचे प्रमाण कमी होत असताना कोरोनामुक्त गावातील माध्यमिकच्या सुरू होणाऱ्या शाळांची संख्या वाढत आहे. महिनाभरात ६४ शाळा आणखी सुरू झाल्या असून, या शाळांत विद्यार्थ्यांच्या उपस्थितीची संख्याही वाढली आहे. महिनाभरापूर्वी २० जुलै रोजी जिल्ह्यात ८१ शाळा सुरू झाल्या होत्या, तर २७ ऑगस्टच्या अहवालानुसार १४५ शाळा सुरू झाल्या आहेत. विशेष म्हणजे शाळेत विद्यार्थ्यांची संख्याही वाढत आहे.

काेरोनामुक्त गावांत ग्रामपंचायतचे संमतीपत्र प्राप्त झाल्यानंतर शासन निर्देशानुसार माध्यमिकच्या शाळा सुरू करण्याच्या प्रक्रियेला आरंभ झाला. त्यात २० जुलैपर्यंत आठवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी ८१ शाळा सुरू झाल्या, तर १९३ शाळांसाठी स्थानिक प्रशासनाच्या परवानगीअभावी सुरू होऊ शकल्या नव्हत्या. दरम्यान, जिल्ह्यात ४१९ ग्रामपंचायतींपैकी ४८० ग्रामपंचायती कोरोनामुक्त झाल्या असून, आता कोरोना रुग्णांची संख्याही घटू लागल्याने कोरोनामुक्त गावांतील शाळांची संख्या वाढू लागली आहे. जि.प. शिक्षण विभागाच्या अहवालानुसार २७ ऑगस्ट रोजीपर्यंत कोरोनामुक्त गावांतील १४५ शाळा सुरू झाल्या आहेत. दरम्यान, अद्यापही जवळपास ३३६ ग्रामपंचायतीअंतर्गत कोरोनामुक्त गावांत शाळा सुरू होण्याची प्रतीक्षा आहे.

-------

उपस्थित विद्यार्थ्यांची संख्या वाढली

त्यातही २० ऑगस्ट रोजी ८१ शाळांत ७५ हजार ७६० विद्यार्थ्यांपैकी केवळ २२६ विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. हे प्रमाण प्रत्यक्ष संख्येच्या केवळ ३.१९ टक्के होते, तर आता १४५ शाळांत ८८६० विद्यार्थी उपस्थित असून, हे प्रमाण प्रत्यक्ष संख्येच्या १२.६३ टक्के आहे. अर्थात, सुरू झालेल्या शाळांतील विद्यार्थ्यांची संख्या चौपटीने वाढली आहे.

००००००००००

१३० शाळा सुरू होण्याची प्रतीक्षा

जिल्ह्यात माध्यमिकच्या अर्थात आठवी ते बारावीच्या शाळांची संख्या २७५ आहे. जिल्ह्यातील कोरोना संसर्ग नियंत्रणात असल्याने जवळपास ४८० ग्रामपंचायती कोरोनामुक्त झाल्या असून, या ग्रामपंचायतीअंतर्गत आठवी ते बारावीच्या १४५ शाळाच सुरू झालेल्या आहेत, तर अद्यापही १३० शाळा सुरू होण्याची प्रतीक्षा आहे.

०००००००००

कोरोना रुग्ण आढळल्यानंतर २ शाळा बंद

कोरोनामुक्त गावांत ग्रामपंचायतचे संमतीपत्र मिळाल्यानंतरच आठवी ते बारावीच्या शाळा सुरू करण्यात येत असून, या गावांत पुन्हा कोरोना रुग्ण आढळल्यानंतर तेथील शाळा बंद करावी लागत आहे. आजवर मानोरा आणि रिसोड तालुक्यातील प्रत्येकी एका गावात कोरोना रुग्ण आढळल्यानंतर तेथील शाळा बंद करावी लागल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.

०००००००००००००००००००००००

कारंजा तालुक्यात विद्यार्थ्यांची उपस्थिती सर्वाधिक

जिल्ह्यात आठवी ते बारावीपर्यंत ७५,७६० विद्यार्थीसंख्या आहे. २७ ऑगस्टपर्यंत एकूण ८८६० विद्यार्थी शाळेत हजर असल्याचे अहवालावरून दिसत आहे. हे प्रमाण १२.६३ टक्के आहे, त्यात कारंजा तालुक्यात सर्वाधिक २१.५२, मालेगावात १५.७१, मंगरुळपीर तालुक्यात १३.७८, वाशिम तालुक्यात १२.०३, रिसोड तालुक्यात ७. ४०, तर मानोरा तालुक्यात ५.५७ टक्के उपस्थितीचे प्रमाण आहे.

००००००००

- आठवी ते बारावीच्या एकूण शाळा - २७५

- सुरू झालेल्या शाळा - १४५

- विद्यार्थ्यांची एकूण संख्या - ७५,२६०

- उपस्थित विद्यार्थी - ८८६०

००००००००००

सुरू झालेल्या शाळा व उपस्थित विद्यार्थी

तालुका - शाळा - विद्यार्थी

कारंजा - ३७ - १७५०

मालेगाव - ३६ - १९७१

मं.पीर - १२ - ११२०

मानोरा - ११ - ६३०

रिसोड - २७ - १४१२

वाशिम- २२ - १९७७

००००००००००००००००००