शहरं
Join us  
Trending Stories
1
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
2
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
3
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
4
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
5
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
6
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
7
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
8
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
9
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
10
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
11
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
12
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
13
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
14
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
15
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
16
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
17
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
18
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
19
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
20
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा

हगणदरीमुक्त न होणार्‍या गावांना निधी मिळणार नाही; वाशिम जिल्हा परिषद अध्यक्षांची स्पष्टोक्ती!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2018 7:24 PM

नवनिर्वाचित सरपंचांनी गाव हगणदरीमुक्त करून दर्जा कायम ठेवावा. कारण यापुढे गाव हगणदरीमुक्त नसेल तर शासनाचा निधी त्या गावात देणे शक्य होणार नाही, असे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा देशमुख यांनी केले.

ठळक मुद्देनवनिर्वाचित सरपंचांची कार्यशाळा उत्साहात

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : गाव हगणदरीमुक्त करणे जेवढे अवघड होते; आता तो दर्जा टिकवून ठेवणे तेवढेच अवघड काम आहे. नवनिर्वाचित सरपंचांनी गाव हगणदरीमुक्त करून दर्जा कायम ठेवावा. कारण यापुढे गाव हगणदरीमुक्त नसेल तर शासनाचा निधी त्या गावात देणे शक्य होणार नाही, असे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा देशमुख यांनी केले. ११ जानेवारी रोजी स्वच्छ भारत मिशनअंतर्गत स्थानिक विठ्ठलवाडी येथे आयोजित नवनिर्वाचित सरपंचांच्या जिल्हास्तरीय कार्यशाळेत त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, स्वच्छ भारत मिशनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुदाम  इस्कापे, पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन माने, संजय मापारी यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष देशमुख यांनी नवनिर्वाचित सरपंचांनी गावाच्या स्वच्छतेकडे अधिक लक्ष द्यावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील यांनी गाव हगणदारीमुक्त करणाºयाना सर्व नागरिकांचे स्वागत केले. नवीन सरपंचांना प्रेरणा देण्यासाठी या कार्यशाळेचे आयोजन केल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मार्च २०१८ पर्यंत जिल्हा हागणदारीमुक्त करण्याचे ध्येय असल्याचे सांगुण पाटील म्हणाले की आतापर्यंत जिल्ह्यातील तीनशे ग्रामपंचायती हागणदारीमुक्त झाल्या आहेत. येणा-या २६ जानेवारी रोजी मंगरूळपीर तालूका हगणदरीमुक्त घोषित करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.  हागणदारीमुक्त झालेल्या गावांमध्ये सांडपाणी आणि घनकचरा व्यवस्थापनाचे कामे करण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.जिल्हा परिषद उपाध्यक्ष ठाकरे म्हणाले की, सरपंचांना प्रशिक्षण देणे गरजेचे असून त्यांना विविध योजनांची माहिती देण्यासोबतच तांत्रिक आणि प्रशासकीय ज्ञान देणे गरजेचे आहे. चांगले काम करताना विरोध होतोच पण विरोधामुळे खचून न जाता नव्या जोमाने कामाला लागा असा सल्ला ठाकरे यांनी नवनिर्वाचित सरपंचांना दिला.या कार्यशाळेत काही सरपंचांचा मान्यवरांच्या हस्ते प्रातिनिधिक  स्वरूपात सत्कार करण्यात आला. उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन माने यांनीही आपले विचार व्यक्त केले. उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुदाम इस्कापे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे संचालन जिल्हा पाणी व स्वच्छता विभागाचे मनुष्यबळ विकास सल्लागार शंकर आंबेकर यांनी केले. क्षमता बांधणी सल्लागार प्रफुल्ल काळे यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सुमेर सानेकर,  विजय नागे,  अभिजीत दुधाटे, पुष्पलता अफुने, अमित घुले, प्रदीप सावळकर, प्रदिप पान्हेरकर, रविचंद्र पडघान, समाधान खरात, आदींनी परिश्रम घेतले. 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतwashimवाशिम