शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
5
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
6
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
7
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
8
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
9
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
10
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
11
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
12
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
13
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
14
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
15
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
16
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
17
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
18
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
19
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
20
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या

‘समृद्धी’साठीच्या गौणखनिज रक्कम वसुलीला स्थगिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2019 15:10 IST

आमदार राजेंद्र पाटणी यांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे केलेल्या पाठपुराव्यास यश मिळत रक्कम वसुलीला स्थगिती देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी सोमवारी दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यातील ५२ गावांमधून जात असलेल्या नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग निर्मितीसाठी धरणांमधून घेतल्या जाणाऱ्या गौणखनिजाची रक्कम संबंधित कंत्राटदाराकडून वसूल करण्याचे निर्देश जलसंपदा विभागाच्या उपसचिवांनी मुख्य अभियंत्यांसह अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंत्यांना २४ एप्रिलच्या पत्रान्वये दिले होते. यामुळे विनामुल्य होत असलेल्या धरणांच्या खोलीकरण प्रक्रियेला बाधा पोहचणार होती. यासंदर्भात ‘लोकमत’ने ५ मेच्या अंकात ‘धरणांमधील गौणखनिजासाठी मोजावी लागणार रक्कम!’, या मथळख्याखाली प्रकाशित केलेले वृत्त आणि आमदार राजेंद्र पाटणी यांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे केलेल्या पाठपुराव्यास यश मिळत रक्कम वसुलीला स्थगिती देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी सोमवारी दिली.मुंबई-नागपूर शीघ्र संचार द्रुतगती मार्गाचे (महाराष्ट्र समृद्धी महामार्ग) काम सद्या सुरू आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणात माती, मुरूम आणि दगड या गौणखनिजाची गरज भासत आहे. ती भागविण्यासाठी महामार्गानजिकच्या धरणांमधून गौणखनिजाची उचल सुरू करण्यात आली. यायोगे धरणांचे विनामुल्य खोलीकरण शक्य झाले आहे. दुहेरी उद्देश साध्य होत असल्याने या गौणखनिजाकरिता महसूल विभागाने कुठल्याही प्रकारचे स्वामित्व धन (रॉयल्टी) आकारू नये, असे आदेश शासनस्तरावरून देण्यात आले होते. मात्र, २४ एप्रिल रोजी धरणांमधून उचलल्या जाणाºया गौणखनिजाची रक्कम संबंधित कंत्राटदारांकडून वसूल करण्याचे निर्देश जलसंपदा विभागाच्या उपसचिवांनी मुख्य अभियंत्यांसह अधीक्षक अभियंता आणि कार्यकारी अभियंत्यांना दिले. त्याचे पालन करित जिल्हास्तरावरील यंत्रणेकडून रक्कम वसूलीसंदर्भात संबंधित कार्यकारी अभियंत्यांकडे पत्रव्यवहार करण्यात आला.दरम्यान, अचानक झालेल्या या निर्णयामुळे विनामुल्य सुरू असलेल्या धरणांच्या खोलीकरण कामांवर परिणाम होवून कामे थांबली होती. याशिवाय समृद्धी महामार्गाचे कामही बंद पडले होते. यासंदर्भात ‘लोकमत’ने ५ मे रोजीच्या अंकात सविस्तर वृत्त प्रकाशित केले. तसेच आमदार राजेंद्र पाटणी यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करून वस्तुस्थिती त्यांच्या निदर्शनास आणून दिली. त्याचा अपेक्षित फायदा झाला असून जलसंपदा विभागाच्या उपसचिवांनी २४ एप्रिल रोजी घेतलेल्या निर्णयास स्थगिती देण्यात येत असल्याचे पत्र मुख्य अभियंता, अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंत्यांना पाठविले आहे. त्यामुळे हा प्रश्न विनाविलंब निकाली निघाल्याची माहिती आमदार पाटणी यांनी दिली.

समृद्धी महामार्ग हा राज्यशासनाचा ‘ड्रीम प्रोजेक्ट’ आहे. त्यासाठी जलसंपदा विभागाच्या धरणांमधून गौणखनिज वापरल्याने धरणांचे खोलीकरण विनामुल्य होणे शक्य झाले आहे. त्यामुळे कंत्राटदारांकडून रक्कम वसूल करणे संयुक्तीक नसल्याची बाब मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली. मुख्यमंत्र्यांनीही त्याची तत्काळ दखल घेतली.- राजेंद्र पाटणी, आमदार, कारंजा

टॅग्स :washimवाशिमSamruddhi Mahamargसमृद्धी महामार्ग