शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रेमभंग झालेल्या युवतीनं १२ राज्यातील पोलिसांची झोप उडवली; समोर आली कहाणी, कोण आहे 'ती'?
2
पतीने 'ती' गोष्ट लपवली; पत्नीला कळताच सरळ पोलीस स्टेशनला गेली! तक्रार करत म्हणाली... 
3
६००० कर्मचाऱ्यांना काढूनही 'या' कंपनीचं मन भरलं नाही, आता पुन्हा एकदा कपातीची टांगती तलवार
4
"राज-उद्धव ठाकरे बंधूंनी कितीही कार्यक्रम घ्या, मुंबईचा महापौर उत्तर भारतीयच होणार"
5
"मला विश्वास बसत नाहीये...", शेफाली जरीवालाच्या निधनाने श्रेयस तळपदेला बसला मोठा धक्का
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
"त्यावेळी आम्ही मनात आणलं असतं तर..."; महापौरपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा पहिल्यांदाच खुलासा
8
Ashadhi Ekadashi 2025: तुकाराम महाराजांना बाप्पाच्या मूर्तीत दिसले पांडुरंगाचे रूप; तेव्हा...
9
ओमानचा ऐतिहासिक निर्णय; ७ लाख भारतीयांवर थेट परिणाम होणार!
10
रिक्षाचालकाने शेअर केला असा व्हिडीओ, थेट अमेरिकेतून भारतात पोलिसांकडे आली तक्रार, त्यानंतर...  
11
ENG W vs IND W : स्मृती मानधना सगळ्यात भारी! जाणून घ्या भारत-इंग्लंड यांच्यातील खास रेकॉर्ड
12
कोल्हापुरी चप्पलेतून कर्रकर्र आवाज का येतो, तुम्हाला माहितेय का? ९९ टक्के लोक फेल!
13
९४ वर्षीय अब्जाधीश वॉरेन बफेंचा मोठा निर्णय, दान केले ६ बिलियन डॉलर्सचे शेअर्स
14
"हे मराठीचं प्रेम नाही, तर महापालिका निवडणुका..."; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
15
शेतीच्या वादातून रक्तरंजित संघर्ष, पुतण्यानं माय-लेकाची केली हत्या; आरोपीनेही आयुष्य संपवलं
16
"ठेच लागल्यावर 'आई गं' म्हणायचं की 'ओ मेरी माँ'...", पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीला केदार शिंदेंचा तीव्र विरोध
17
डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल मिळेल का, काय वाटतं? यापूर्वी कोणत्या राष्ट्राध्यक्षांना मिळाले नोबेल?
18
मुंबई: मृत मुलाच्या वीर्यासाठी आईची धडपड, सेंटरने वीर्य देण्यास नकार दिल्यानंतर न्यायालयात धाव
19
SL vs BAN : मॅचसह मालिका गमावली अन् लगेच कॅप्टन्सी सोडली! पहिल्या टेस्टमध्ये बेस्ट खेळीसह रचला होता इतिहास
20
भांडूपमधील जादूटोणा प्रकरण: अटकेनंतर पोलीस ठाण्यातच दाम्पत्याकडून मंत्रोच्चार, वैभव आणि हर्षदाला पोलिसांनी घडवली अद्दल

‘समृद्धी’साठीच्या गौणखनिज रक्कम वसुलीला स्थगिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2019 15:10 IST

आमदार राजेंद्र पाटणी यांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे केलेल्या पाठपुराव्यास यश मिळत रक्कम वसुलीला स्थगिती देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी सोमवारी दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यातील ५२ गावांमधून जात असलेल्या नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग निर्मितीसाठी धरणांमधून घेतल्या जाणाऱ्या गौणखनिजाची रक्कम संबंधित कंत्राटदाराकडून वसूल करण्याचे निर्देश जलसंपदा विभागाच्या उपसचिवांनी मुख्य अभियंत्यांसह अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंत्यांना २४ एप्रिलच्या पत्रान्वये दिले होते. यामुळे विनामुल्य होत असलेल्या धरणांच्या खोलीकरण प्रक्रियेला बाधा पोहचणार होती. यासंदर्भात ‘लोकमत’ने ५ मेच्या अंकात ‘धरणांमधील गौणखनिजासाठी मोजावी लागणार रक्कम!’, या मथळख्याखाली प्रकाशित केलेले वृत्त आणि आमदार राजेंद्र पाटणी यांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे केलेल्या पाठपुराव्यास यश मिळत रक्कम वसुलीला स्थगिती देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी सोमवारी दिली.मुंबई-नागपूर शीघ्र संचार द्रुतगती मार्गाचे (महाराष्ट्र समृद्धी महामार्ग) काम सद्या सुरू आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणात माती, मुरूम आणि दगड या गौणखनिजाची गरज भासत आहे. ती भागविण्यासाठी महामार्गानजिकच्या धरणांमधून गौणखनिजाची उचल सुरू करण्यात आली. यायोगे धरणांचे विनामुल्य खोलीकरण शक्य झाले आहे. दुहेरी उद्देश साध्य होत असल्याने या गौणखनिजाकरिता महसूल विभागाने कुठल्याही प्रकारचे स्वामित्व धन (रॉयल्टी) आकारू नये, असे आदेश शासनस्तरावरून देण्यात आले होते. मात्र, २४ एप्रिल रोजी धरणांमधून उचलल्या जाणाºया गौणखनिजाची रक्कम संबंधित कंत्राटदारांकडून वसूल करण्याचे निर्देश जलसंपदा विभागाच्या उपसचिवांनी मुख्य अभियंत्यांसह अधीक्षक अभियंता आणि कार्यकारी अभियंत्यांना दिले. त्याचे पालन करित जिल्हास्तरावरील यंत्रणेकडून रक्कम वसूलीसंदर्भात संबंधित कार्यकारी अभियंत्यांकडे पत्रव्यवहार करण्यात आला.दरम्यान, अचानक झालेल्या या निर्णयामुळे विनामुल्य सुरू असलेल्या धरणांच्या खोलीकरण कामांवर परिणाम होवून कामे थांबली होती. याशिवाय समृद्धी महामार्गाचे कामही बंद पडले होते. यासंदर्भात ‘लोकमत’ने ५ मे रोजीच्या अंकात सविस्तर वृत्त प्रकाशित केले. तसेच आमदार राजेंद्र पाटणी यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करून वस्तुस्थिती त्यांच्या निदर्शनास आणून दिली. त्याचा अपेक्षित फायदा झाला असून जलसंपदा विभागाच्या उपसचिवांनी २४ एप्रिल रोजी घेतलेल्या निर्णयास स्थगिती देण्यात येत असल्याचे पत्र मुख्य अभियंता, अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंत्यांना पाठविले आहे. त्यामुळे हा प्रश्न विनाविलंब निकाली निघाल्याची माहिती आमदार पाटणी यांनी दिली.

समृद्धी महामार्ग हा राज्यशासनाचा ‘ड्रीम प्रोजेक्ट’ आहे. त्यासाठी जलसंपदा विभागाच्या धरणांमधून गौणखनिज वापरल्याने धरणांचे खोलीकरण विनामुल्य होणे शक्य झाले आहे. त्यामुळे कंत्राटदारांकडून रक्कम वसूल करणे संयुक्तीक नसल्याची बाब मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली. मुख्यमंत्र्यांनीही त्याची तत्काळ दखल घेतली.- राजेंद्र पाटणी, आमदार, कारंजा

टॅग्स :washimवाशिमSamruddhi Mahamargसमृद्धी महामार्ग