शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
2
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
3
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
4
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
5
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
6
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
7
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
8
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
9
शतांक विपरीत राजयोग: ९ राशींना वक्री शनिचे वरदान, सुबत्ता भरभराट; भरघोस लाभ, शुभ कल्याण होईल!
10
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
11
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
12
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
13
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
14
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
15
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
16
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
17
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
18
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
19
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
20
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस

देशाचे संविधान कोणीही बदलू शकत नाही - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले 

By संतोष वानखडे | Updated: January 15, 2024 19:07 IST

वाशिमात भूमि हक्क परिषद.

 वाशिम : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला संविधान दिले. देशाचे संविधान कोणिही बदलू शकत नाही. मात्र संविधान बदलत असल्याबाबत काँग्रेस व विरोधी पक्ष हे जनतेची व समाजाची दिशाभूल करीत असल्याचे टिकास्त्र केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी १५ जानेवारी रोजी वाशिम येथील भूमि हक्क परिषदेत सोडले.

स्थानिक वाटाणे लॉन येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) च्यावतीने आयोजित आयोजित भूमि हक्क परिषदेचे उद्घाटक म्हणून ना. रामदास आठवले होते. या परिषदेच्या अध्यक्षस्थानी रिपाईचे (आ.) जिल्हाध्यक्ष तेजराव वानखेडे होते. पुढे बोलताना ना. आठवले म्हणाले, देशाचे संविधान अबाधित आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशातील सर्वधर्मीय समाजबांधवांना सोबत घेऊन चालत आहेत, सर्वांना न्याय देत आहेत. पंतप्रधान मोदी यांनी खऱ्या अर्थाने डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचा सन्मान केला आहे. यावेळी रिपाईचे जिल्हाध्यक्ष तेजराव वानखेडे यांनीदेखील मनोगत व्यक्त केले. कडूबाई खरात यांनी भीमगितांचा बहारदार कार्यक्रम सादर केला. परिषदेला मोठ्या संख्येने रिपाईचे कार्यकर्ते, पदाधिकारी, जिल्हाभरातून आलेले नागरीक उपस्थित होते. भूमिहीनांना जमिनी देण्याची मागणी रेटणार

भूमि हक्क परिषदेच्या मध्यमातुन आपन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजीत पवार यांची भेट घेवुन कष्टकरी, भूमिहीन दलित समाजातील लोकांना जमिन देण्याची मागणी आपण रेटणार असल्याचे आश्वासन ना. आठवले यांनी दिले. प्रलंबित वाशिम-बडनेरा रेल्वे मार्गाबाबत निधिसाठी पाठपुरावा करणार असल्याचे सांगतानाच, वाशिम-जालना या लोहमार्गासाठी सुद्धा केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची शिष्टमंडळज्ञसोबत लवकरच भेट घेऊ, असेही आठवले यांनी सांगितले.

टॅग्स :washimवाशिम