शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

‘माझी कन्या भाग्यश्री’ योजनेच्या अंमलबजावणीस ब्रेक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2019 18:53 IST

योजनेच्या अंमलबजावणीची जबाबदारी सोपविण्यात आलेली संबंधित यंत्रणा पात्र तथा गरजू लाभार्थ्यांपर्यंत पोहचतच नसल्याची वस्तूस्थती आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : मुलींचा जन्मदर वाढविणे, लिंग निवडीस प्रतिबंध करणे, मुलींच्या शिक्षणास प्रोत्साहन देणे, त्यांच्यासाठी आरोग्यविषयक सुविधांमध्ये वाढ करणे, आदी उद्देश समोर ठेवून शासनाने १ आॅगस्ट २०१७ पासून सुधारित पद्धतीने महाराष्ट्रात ‘माझी कन्या भाग्यश्री’ ही योजना अंमलात आणली; मात्र पश्चिम वºहाडातील तीनही जिल्ह्यांमध्ये या योजनेच्या अंमलबजावणीस बहुतांशी ‘ब्रेक’ लागला असून अनेक गरजू लाभार्थी योजनेपासून अनभिज्ञ असल्याची माहिती सूत्रांनी बुधवारी दिली.ज्या कुटूंबांचे वार्षिक उत्पन्न ७ लाख ५० हजार रुपयांपर्यंत आहे, अशा सर्व कुटूंबांकरिता ही योजना लागू असून याअंतर्गत शासनाकडून विविध स्वरूपात लाभ दिले जातात; मात्र योजनेच्या अंमलबजावणीची जबाबदारी सोपविण्यात आलेली संबंधित यंत्रणा पात्र तथा गरजू लाभार्थ्यांपर्यंत पोहचतच नसल्याची वस्तूस्थती आहे. या योजनेचे अर्ज ग्रामीण व नागरी बाल विकास प्रकल्प अधिकारी, महिला व बालविकास अधिकारी, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, विभागीय उपायुक्त आदिंच्या कार्यालयात विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आले आहेत. अंगणवाडी सेविकेने सदर अर्ज लाभार्थ्यांकडून भरून घेतल्यानंतर अंगणवाडी पर्यवेक्षिका अथवा मुख्य सेविकेकडे सादर करणे आवश्यक आहे. प्रत्यक्षात मात्र ही यंत्रणाच कामाकडे दुर्लक्ष करित असल्याने योजनेच्या अंमलबजावणीस ब्रेक लागल्याची माहिती सूत्रांनी दिली.

माझी कन्या भाग्यश्री योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबत तद्वतच प्रत्येक अंगणवाडी सेविकेने पाच प्रस्ताव सादर करण्यासंबंधीचे निर्देश मध्यंतरी देण्यात आले होते. त्याचा पाठपुरावा करण्यात येईल.- नितीन मोहुर्लेउपमुख्य कार्यकारी अधिकारी,महिला व बालकल्याण विभाग, जिल्हा परिषद, वाशिम

टॅग्स :washimवाशिमgovernment schemeसरकारी योजना