शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
3
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
4
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
5
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
6
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
7
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
8
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
9
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
10
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
11
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
12
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
13
हा सदोष मनुष्यवधच!
14
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
15
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
16
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
17
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
18
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
19
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?

गावतलावांच्या देखभाल, दुरूस्तीसाठी शासनाकडून निधीच मिळेना !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2020 12:12 IST

१०० पेक्षा जास्त प्रकल्पांची आयुर्मर्यादा संपलेली असतानाही, नियमित देखभाल दुरूस्तीसाठी शासनाकडून पुरेशा प्रमाणात निधीच प्राप्त होत नाही.

- संतोष वानखडेलोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्हा परिषदेच्या जलसंधारण विभागांतर्गत जवळपास ४५० जलसाठ्याचे प्रकल्प असून, यापैकी १०० पेक्षा जास्त प्रकल्पांची आयुर्मर्यादा संपलेली असतानाही, नियमित देखभाल दुरूस्तीसाठी शासनाकडून पुरेशा प्रमाणात निधीच प्राप्त होत नाही. मार्च २०२० मध्ये पाठविलेला २९.९९ कोटींचा निधी प्रस्तावही शासनस्तरावर लालफितशाहीत अडकला आहे. दरम्यान, १० सप्टेंबर रोजी कवठळ परिसरातील दोन गाव फुटल्यानंतर, प्रशासकीय यंत्रणेतर्फे सर्वेक्षण सुरू करण्यात आले.जि.प.जलसंधारण विभागांतर्गत गावतलाव, कोल्हापूरी बंधारे, लघु प्रकल्प आदी प्रकारातील जवळपास ४५० जलसाठे प्रकल्प आहेत. पावसाळ्याच्या दिवसात अतिवृष्टी, मुसळधार पावसामुळे तलाव फुटून नुकसान होऊ नये म्हणून उन्हाळयातच आवश्यक त्या तलावांची देखभाल, दुरूस्ती होणे आवश्यक आहे. प्रकल्पाची आयुर्मर्यादा साधारणत: ५० वर्षांची असते. जिल्ह्यातील १०० पेक्षा अधिक प्रकल्पांची आयुर्मर्यादा संपलेली आहे. याशिवाय जिल्ह्यातील विविध प्रकल्पांच्या विशेष दुरुस्तीसह बळकटीकरण आणि इतर १२८ कामांसाठी २९ कोटी ९९ लाख ५५ हजार रुपयांचा निधी आवश्यक असून, तसा प्रस्तावही जि.प. प्रशासनाने मार्च २०२० मध्ये शासनाकडे पाठविला. सध्या हा प्रस्ताव शासनस्तरावर लालफितशाहीत अडकला आहे. जिल्ह्यात १० आॅगस्ट रोजी कवठळ परिसरातील दोन गावतलाव फुटल्याने संभाव्य अनर्थ टाळण्यासाठी निधी प्रस्ताव निकाली निघणे आवश्यक आहे.

कवठळ परिसरात पंचनामे सुरूमंगरूळपीर : तालुक्यातील कवठळ येथे १० आॅगस्ट रोजी अतिवृष्टीमुळे दोन गावतलाव फुटल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. १२ सप्टेंबरपासून प्रशासनातर्फे नुकसानग्रस्त शेतजमिनीच्या पंचनाम्याचे काम सुरू करण्यात आले. दोन्ही तलाव हे २८ वर्षे जुने असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. पिकांचे नुकसान झाले तसेच जमीनीसुद्धा खरडून गेल्याने रब्बी हंगामसुद्धा धोक्यात आला आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने मदत करावी, अशी मागणी शेतकºयांनी केली. पंचनामे पूर्ण झाल्यानंतर नुकसानभरपाईचा प्रस्ताव वरिष्ठांकडे सादर केला जाणार आहे.वरिष्ठांच्या सुचनेनुसार जिल्ह्यातील विविध प्रकल्पांच्या विशेष दुरुस्तीसह बळकटीकरण व इतर १०५ कामांसाठी २९ कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार करून जिल्हा परिषद प्रशासनाच्या माध्यमातून वरिष्ठांकडे यापूर्वीच सादर केला.- ए.एम. खानजिल्हा जलसंधारण अधिकारी, जि.प.

 

टॅग्स :washimवाशिमMangrulpirमंगरूळपीर