शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
5
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
6
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
7
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
8
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
9
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
10
आयोग नव्हे, मतदारच राजा !
11
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
12
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
13
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
14
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
15
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
16
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
17
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
18
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
19
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
20
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज

नुकसानभरपाई मिळाली नाही; शेतकरी तहसिलवर धडकले!

By संतोष वानखडे | Updated: September 14, 2023 17:16 IST

मानोरा तालुक्यात २२ जुलै रोजी अतिवृष्टी झाल्याने पिकांचे अतोनात नुकसान झाले.

वाशिम : मानोरा तालुक्यातील शेतकऱ्यांना यंदाच्या पावसाळ्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांची नुकसानभरपाई मिळण्यास विलंब होत असल्याचे पाहून, १४ सप्टेंबर रोजी ऐन पोळ्याच्या दिवशी शेतकऱ्यांनी मानोरा तहसिल कार्यालयावर धडक देत रोष व्यक्त केला. याची दखल घेत दुपारी दीड वाजता तहसीलदारांनी उपोषणस्थळी भेट दिली आणि बँकेत जाऊन निधी वाटपाची यादी अपडेट केली. त्यामुळे १४ सप्टेंबर रोजीच नुकसानग्रस्तांच्या खात्यात निधी जमा होण्यास प्रारंभ झाल्याने उपोषण मागे घेण्यात आले.

मानोरा तालुक्यात २२ जुलै रोजी अतिवृष्टी झाल्याने पिकांचे अतोनात नुकसान झाले. पोहरादेवी, वसंतनगर, वाई परिसरातील शेकडो हेक्टर शेतातील पिके जमिनदोस्त झाले. काही शेतकऱ्यांची जमिन खरडून गेली तर काही नागरिकांच्या घरात पुराचे पाणी शिरले होते. यामुळे नुकसानग्रस्तांना शासनाकडून भरपाई मिळणे अपेक्षीत होते. नुकसानभरपाईचा अहवाल शासनाकडे पाठविण्यात आल्याने शासनाकडून निधीही मंजूर झालेला आहे. मात्र, शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात रक्कम जमा झाली नव्हती.

याविरोधात गुरुवार, दि. १४ सप्टेंबर रोजी पोळ्याच्या दिवशीच शेकडो महिला, शेतकरी, नागरिकांनी तहसील कार्यालयावर उपोषण सुरू केले. त्याची दखल घेत दुपारी दीड वाजता तहसीलदारांनी उपोषणस्थळी भेट दिली आणि बँकेत जाऊन निधी वाटपाची यादी अपडेट केली. या आंदोलनात सरपंच विनोद राठोड, अनिल नाईक, उमेश राठोड, गणेश जाधव, श्याम राठोड, गजानन भालेराव, रमेश पवार, राजाराम राठोड, राजू जयस्वाल, शेख नवाब, रेखा वावडे, शेख तनुजाबी, हरिदास जाधव, पृथ्वीराज राठोड आदींसह शेकडो नुकसानग्रस्त नागरिकांनी सहभाग घेतला होता.

टॅग्स :washimवाशिम