शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
4
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
5
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
6
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
7
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
8
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
9
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
10
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
11
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
12
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
13
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
14
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
15
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
16
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
17
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
18
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
19
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
20
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले

नुकसानभरपाई मिळाली नाही; शेतकरी तहसिलवर धडकले!

By संतोष वानखडे | Updated: September 14, 2023 17:16 IST

मानोरा तालुक्यात २२ जुलै रोजी अतिवृष्टी झाल्याने पिकांचे अतोनात नुकसान झाले.

वाशिम : मानोरा तालुक्यातील शेतकऱ्यांना यंदाच्या पावसाळ्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांची नुकसानभरपाई मिळण्यास विलंब होत असल्याचे पाहून, १४ सप्टेंबर रोजी ऐन पोळ्याच्या दिवशी शेतकऱ्यांनी मानोरा तहसिल कार्यालयावर धडक देत रोष व्यक्त केला. याची दखल घेत दुपारी दीड वाजता तहसीलदारांनी उपोषणस्थळी भेट दिली आणि बँकेत जाऊन निधी वाटपाची यादी अपडेट केली. त्यामुळे १४ सप्टेंबर रोजीच नुकसानग्रस्तांच्या खात्यात निधी जमा होण्यास प्रारंभ झाल्याने उपोषण मागे घेण्यात आले.

मानोरा तालुक्यात २२ जुलै रोजी अतिवृष्टी झाल्याने पिकांचे अतोनात नुकसान झाले. पोहरादेवी, वसंतनगर, वाई परिसरातील शेकडो हेक्टर शेतातील पिके जमिनदोस्त झाले. काही शेतकऱ्यांची जमिन खरडून गेली तर काही नागरिकांच्या घरात पुराचे पाणी शिरले होते. यामुळे नुकसानग्रस्तांना शासनाकडून भरपाई मिळणे अपेक्षीत होते. नुकसानभरपाईचा अहवाल शासनाकडे पाठविण्यात आल्याने शासनाकडून निधीही मंजूर झालेला आहे. मात्र, शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात रक्कम जमा झाली नव्हती.

याविरोधात गुरुवार, दि. १४ सप्टेंबर रोजी पोळ्याच्या दिवशीच शेकडो महिला, शेतकरी, नागरिकांनी तहसील कार्यालयावर उपोषण सुरू केले. त्याची दखल घेत दुपारी दीड वाजता तहसीलदारांनी उपोषणस्थळी भेट दिली आणि बँकेत जाऊन निधी वाटपाची यादी अपडेट केली. या आंदोलनात सरपंच विनोद राठोड, अनिल नाईक, उमेश राठोड, गणेश जाधव, श्याम राठोड, गजानन भालेराव, रमेश पवार, राजाराम राठोड, राजू जयस्वाल, शेख नवाब, रेखा वावडे, शेख तनुजाबी, हरिदास जाधव, पृथ्वीराज राठोड आदींसह शेकडो नुकसानग्रस्त नागरिकांनी सहभाग घेतला होता.

टॅग्स :washimवाशिम