शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
2
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
3
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
4
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
5
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
6
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
7
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
8
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
9
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
10
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
11
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
12
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
13
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
14
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
15
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
16
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
17
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
18
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
19
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
20
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!

वाशिम-बडनेरा रेल्वेमार्गासाठी नितिन गडकरींना साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2018 13:51 IST

मंगरुळपीर: दोन वेळा सर्वेक्षण होऊनही अनेक वर्षांपासून के वळ विचाराधीन असलेला आणि जिल्ह्यातील बड्या लोकप्रतिनिधींने विकासासाठी पूर्ण करण्याची मागणी केलेला वाशिम-बडनेरा हा रेल्वेमार्ग पूर्णत्वास आणण्यासाठी जिल्ह्यातील काही बड्या नेत्यांनी केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांना साकडे घातले आहे.

ठळक मुद्दे. वाशिम-बडनेरा रेल्वे मार्ग झाल्यास वाशिम जिल्हा हा देशाच्या उत्तर-दक्षिण दिशेने देशात जोडला जाईल.बंगळुरू-दिल्ली हा रेल्वेमार्ग अस्तित्वात येऊन प्रवासाचे तास, अंतर व खर्चात बचत होईल.वाशिम जिल्ह्याच्या विकासातील अडथळा दूर होऊन कामास गती मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

मंगरुळपीर: दोन वेळा सर्वेक्षण होऊनही अनेक वर्षांपासून के वळ विचाराधीन असलेला आणि जिल्ह्यातील बड्या लोकप्रतिनिधींने विकासासाठी पूर्ण करण्याची मागणी केलेला वाशिम-बडनेरा हा रेल्वेमार्ग पूर्णत्वास आणण्यासाठी जिल्ह्यातील काही बड्या नेत्यांनी केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांना साकडे घातले आहे. माजी राज्यमंत्री सुभाषराव ठाकरे, माजी आमदार विजयराव जाधव यांच्यासह काही बड्यानेत्यांनी याबाबत नागपूर येथे गडकरी यांची भेट घेतली आहे.वाशिम जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधता यावा, शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती व्हावी, या उद्देशाने गेल्या १५ ते २० वर्षांपासून लोकप्रतिनिधी आणि नेतेमंडळी वाशिम-बडनेरा हा रेल्वेमार्ग करण्याची मागणी केंद्र शासनाकडे करीत आहे. त्याबाबत दोन वेळा केंद्रीय स्तरावरून सदर मार्गासाठी सर्वेक्षणही करण्यात आले; परंतु त्यापुढे काहीच झाले नाही. वाशिम-बडनेरा रेल्वे मार्ग झाल्यास वाशिम जिल्हा हा देशाच्या उत्तर-दक्षिण दिशेने देशात जोडला जाईल आणि जिल्ह्यातील शेतकºयांना देशाच्या बाजारपेठा उपलब्ध होतील, तसेच जिल्ह्यातील गौण खनिज वाहतूक, कारंजा येथील नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांचे मंदीर, बालाजी देवस्थान, पर्यटकीयदृष्ट्या विकसित होऊन ही दोन्ही शहरे जंक्शन बनतील व बडनेरा, कारंजा, मंगरुळपीर आणि वाशिम येथील औद्योगिक वसाहती, बाजार समित्या, गॅस प्रकल्प, मुख्य बाजार प्रगत होऊन औद्योगिक विकासाबरोबरच, रोजगाराची साधने उपलब्ध होतील, भविष्यात पाणीटंचाईवर मात करण्यासाठी या मार्गाचा उपयोग होण्याबरोबरच नवी बंगळुरू-दिल्ली हा रेल्वेमार्ग अस्तित्वात येऊन प्रवासाचे तास, अंतर व खर्चात बचत होईल, असे मुद्दे केंद्रीय मंत्री गडकरी यांना त्यांच्या नागपूर येथील निवासस्थानावर भेट घेऊन माजी राज्यमंत्री सुभाषराव ठाकरे आणि माजी आमदार विजयराव जाधव यांनी पटवून दिले. त्यावरून गडकरी यांनी या मार्गासाठी सकारात्मक भूमिका घेऊन रेल्वेमंत्रालयास निर्देश दिले आहेत. त्यामुळे वाशिम जिल्ह्याच्या विकासातील अडथळा दूर होऊन कामास गती मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यावेही वसंतराव पाटील शेगीकर, रमेशचंद्र नावंधर, धनंजय रणखांब, मारोतराव लादे, धनंजय घुगे, नितेश राठी, भिमकुमार जिवनाणी, शिवशंकर भोयर, दिलिप जोशी, सत्यानंद कांबळे, गिरधारी तोष्णीवाल व प्रा. अरू णकुमार इंगळे हे उपस्थित होते.

टॅग्स :washimवाशिमNitin Gadakriनितिन गडकरीMangrulpirमंगरूळपीर