शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

वाशिम-बडनेरा रेल्वेमार्गासाठी नितिन गडकरींना साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2018 13:51 IST

मंगरुळपीर: दोन वेळा सर्वेक्षण होऊनही अनेक वर्षांपासून के वळ विचाराधीन असलेला आणि जिल्ह्यातील बड्या लोकप्रतिनिधींने विकासासाठी पूर्ण करण्याची मागणी केलेला वाशिम-बडनेरा हा रेल्वेमार्ग पूर्णत्वास आणण्यासाठी जिल्ह्यातील काही बड्या नेत्यांनी केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांना साकडे घातले आहे.

ठळक मुद्दे. वाशिम-बडनेरा रेल्वे मार्ग झाल्यास वाशिम जिल्हा हा देशाच्या उत्तर-दक्षिण दिशेने देशात जोडला जाईल.बंगळुरू-दिल्ली हा रेल्वेमार्ग अस्तित्वात येऊन प्रवासाचे तास, अंतर व खर्चात बचत होईल.वाशिम जिल्ह्याच्या विकासातील अडथळा दूर होऊन कामास गती मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

मंगरुळपीर: दोन वेळा सर्वेक्षण होऊनही अनेक वर्षांपासून के वळ विचाराधीन असलेला आणि जिल्ह्यातील बड्या लोकप्रतिनिधींने विकासासाठी पूर्ण करण्याची मागणी केलेला वाशिम-बडनेरा हा रेल्वेमार्ग पूर्णत्वास आणण्यासाठी जिल्ह्यातील काही बड्या नेत्यांनी केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांना साकडे घातले आहे. माजी राज्यमंत्री सुभाषराव ठाकरे, माजी आमदार विजयराव जाधव यांच्यासह काही बड्यानेत्यांनी याबाबत नागपूर येथे गडकरी यांची भेट घेतली आहे.वाशिम जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधता यावा, शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती व्हावी, या उद्देशाने गेल्या १५ ते २० वर्षांपासून लोकप्रतिनिधी आणि नेतेमंडळी वाशिम-बडनेरा हा रेल्वेमार्ग करण्याची मागणी केंद्र शासनाकडे करीत आहे. त्याबाबत दोन वेळा केंद्रीय स्तरावरून सदर मार्गासाठी सर्वेक्षणही करण्यात आले; परंतु त्यापुढे काहीच झाले नाही. वाशिम-बडनेरा रेल्वे मार्ग झाल्यास वाशिम जिल्हा हा देशाच्या उत्तर-दक्षिण दिशेने देशात जोडला जाईल आणि जिल्ह्यातील शेतकºयांना देशाच्या बाजारपेठा उपलब्ध होतील, तसेच जिल्ह्यातील गौण खनिज वाहतूक, कारंजा येथील नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांचे मंदीर, बालाजी देवस्थान, पर्यटकीयदृष्ट्या विकसित होऊन ही दोन्ही शहरे जंक्शन बनतील व बडनेरा, कारंजा, मंगरुळपीर आणि वाशिम येथील औद्योगिक वसाहती, बाजार समित्या, गॅस प्रकल्प, मुख्य बाजार प्रगत होऊन औद्योगिक विकासाबरोबरच, रोजगाराची साधने उपलब्ध होतील, भविष्यात पाणीटंचाईवर मात करण्यासाठी या मार्गाचा उपयोग होण्याबरोबरच नवी बंगळुरू-दिल्ली हा रेल्वेमार्ग अस्तित्वात येऊन प्रवासाचे तास, अंतर व खर्चात बचत होईल, असे मुद्दे केंद्रीय मंत्री गडकरी यांना त्यांच्या नागपूर येथील निवासस्थानावर भेट घेऊन माजी राज्यमंत्री सुभाषराव ठाकरे आणि माजी आमदार विजयराव जाधव यांनी पटवून दिले. त्यावरून गडकरी यांनी या मार्गासाठी सकारात्मक भूमिका घेऊन रेल्वेमंत्रालयास निर्देश दिले आहेत. त्यामुळे वाशिम जिल्ह्याच्या विकासातील अडथळा दूर होऊन कामास गती मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यावेही वसंतराव पाटील शेगीकर, रमेशचंद्र नावंधर, धनंजय रणखांब, मारोतराव लादे, धनंजय घुगे, नितेश राठी, भिमकुमार जिवनाणी, शिवशंकर भोयर, दिलिप जोशी, सत्यानंद कांबळे, गिरधारी तोष्णीवाल व प्रा. अरू णकुमार इंगळे हे उपस्थित होते.

टॅग्स :washimवाशिमNitin Gadakriनितिन गडकरीMangrulpirमंगरूळपीर