शहरं
Join us  
Trending Stories
1
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
2
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
3
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
4
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
5
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
6
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 
7
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
8
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
9
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 
10
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी
11
पालघर: मालवाहू जहाजाची मासेमारी करणाऱ्या बोटीला धडक, चार मच्छिमार पडले समुद्रात; 15 मच्छिमारांना कुणी आणले किनाऱ्यावर?
12
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
13
कोट्यवधीची रोकड, ६.७ किलो सोनं आणि..., काँग्रेसच्या आमदाराकडे सापडलं घबाड, EDची कारवाई   
14
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
15
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
16
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
17
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
18
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
19
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
20
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!

नऊ हजार शेतकरी रब्बी पीक विम्यापासून वंचित!

By admin | Updated: January 24, 2017 02:56 IST

वर्ष उलटूनही मिळाला नाही विम्याचा लाभ.

वाशिम, दि. २३- २0१५-१६ च्या रब्बी हंगामात जिल्ह्यातील ९ हजार ३५५ शेतकर्‍यांनी पीक विम्यापोटी २७ लाख ६७ हजार रुपये रकमेचा विमा कंपनीकडे भरणा केला; मात्र ३१ जानेवारी २0१६ रोजी यासंदर्भात लीड बँकेकडून पाठविण्यात आलेल्या अहवालावर अद्याप कुठलाच निर्णय झाला नसून, शेतकरी विम्याच्या लाभापासून वंचित असल्याची माहिती उजागर झाली.जिल्ह्यात सन २0१५-१६ मध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाकडे ८0९ शेतकर्‍यांनी १ लाख ८२ हजार ३0६ रुपये रक्कम भरून रब्बी हंगामातील पिकांचा विमा उतरविला होता. यासह युनियन बँकेकडे १६ शेतकर्‍यांनी ७ हजार ९0४, सेंट्रल बँक ऑफ इंडियाकडे २१२ शेतकर्‍यांनी ५१ हजार ३९, बँक ऑफ महाराष्ट्रकडे ८३६ शेतकर्‍यांनी १ लाख ८७ हजार ७४, कॅनरा बँकेकडे ६ शेतकर्‍यांनी ३ हजार ५६, आयसीआयसीआय बँकेकडे ६९0 शेतकर्‍यांनी ४ लाख ५६ हजार ६३६, विदर्भ कोकण ग्रामीण बँकेकडे ४१८ शेतकर्‍यांनी ५६ हजार ८0; तर अकोला जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे ६ हजार ३६८ शेतकर्‍यांनी १८ लाख २३ हजार रुपये रकमेचा भरणा करून पिकांचा विमा उतरविण्यात आला. दरम्यान, डिसेंबर २0१५ मध्ये जिल्ह्यातील अनेक ठिकाणी गारपीट होऊन रब्बी हंगामातील गहू, हरभरा या पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले होते. असे असतानाही ३१ जानेवारी २0१६ रोजी अग्रणी बँकेने विमा उतरविणार्‍या शेतकर्‍यांबाबतची इत्यंभूत माहिती इन्शूरन्स कंपनी आणि शासनाकडे सादर करूनही एकाही शेतकर्‍यास अद्यापपर्यंंत एकही रुपयाचा लाभ देण्यात आलेला नाही. त्यामुळे आधीच संकटात असलेल्या शेतकर्‍यांमध्ये शासनाच्या या धोरणाप्रती संताप व्यक्त होत आहे.पीक नुकसानाबाबतचे शासनाचे निकष ठरताहेत अत्यंत जाचक!खरिप असो अथवा रब्बी हंगामातील पीकविम्याचा लाभ देण्याकरिता शासनस्तरावरून घालून देण्यात आलेले निकष अत्यंत जाचक ठरत आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यात ४६ महसुली मंडळ असून, एका मंडळाकडे सहा गावांची जबाबदारी सोपविण्यात आलेली आहे. पीक विम्याचा लाभ अथवा आणेवारी जाहीर करण्यापूर्वी महसुली मंडळांकडून सहा गावांमध्ये प्रत्येकी दोन असे १२ कापणी प्रयोग केले जातात. त्यावरून नुकसानाची सरासरी काढून त्याची तुलना गत पाच वर्षाच्या शेतमाल उत्पादनाशी केली जाते. त्यामुळे चालूवर्षी पिकांचे नुकसान झाल्यानंतरही गत पाच वर्षाच्या तुलनेत ७0 टक्क्यांपेक्षा कमी नुकसान झाले तरच पीक विम्याचा लाभ संबंधित शेतकर्‍यांना दिला जातो. या जाचक निकषामुळेच अनेक शेतकरी शासनाच्या आर्थिक मदतीपासून वंचित राहत आहेत.