शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
6
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
7
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
8
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
9
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
10
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
11
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार
12
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
13
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
14
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
15
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
16
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
17
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

नवनिर्मित वाशिम-शेलूबाजार रस्त्याची वर्षभरातच दैना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:42 IST

जिल्हा मुख्यालयास जोडणाऱ्या वाशिम-शेलूबाजार मार्गाला दोन वर्षांपूर्वी प्रमुख जिल्हा मार्गाचा दर्जा दिल्यानंतर या रस्त्याचे नूतनीकरण व रुंदीकरण करण्यात आले ...

जिल्हा मुख्यालयास जोडणाऱ्या वाशिम-शेलूबाजार मार्गाला दोन वर्षांपूर्वी प्रमुख जिल्हा मार्गाचा दर्जा दिल्यानंतर या रस्त्याचे नूतनीकरण व रुंदीकरण करण्यात आले आणि वर्षभरापूर्वीच या रस्त्यावर वाहतूकही सुरू झाली. आता या मार्गावर शेलूबाजारमार्गे कारंजा, अमरावती, नागपूर आणि यवतमाळकडे जाणाऱ्या वाहनांची मोठ्या प्रमाणात वाहतूक वाढली आहे. शिवाय वाशिम-मालेगाव अकोला रस्त्याची अवस्था वाईट असल्याने वाशिम येथून अकोलाकडे जाण्यासाठी रुग्णवाहिका, मालवाहू वाहने याच मार्गाचा अवलंब करतात. या मार्गावरील पिंप्री अवगण ते चिखलीपर्यंतचा रस्ता हा वाइल्ड लाइफच्या अडथळ्यामुळे एकपदरीच करण्यात आला आहे. या रस्त्याच्या कडा त्यावेळी गिट्टीने दबाई करून भरल्या गेल्या होत्या; परंतु एक पदरी रस्त्यावर वाहने वेगात चालविण्यासह समोरच्या वाहनाला मार्ग देण्यासाठी रस्त्याच्या खाली उतरविली जात आहेत. त्यामुळे रस्त्याच्या कडेलगतची खडी उखडून कमी झाली, तर पावसामुळे रस्त्याच्या कडा खोलगट झाल्या आहेत. आता एकपदरी रस्त्यावर दोन वाहने समाेरासमोर आल्यास बाजू घेताना मोठी कसरत करावी लागत आहे. त्यामुळे अपघाताची भीती निर्माण झाली आहे.

-----------

पिंपरी ते गोगरीदरम्यानच्या पुलाची दुरवस्था

वाशिम-शेलूबाजार मार्गावर पिंप्री खुर्द ते गोगरी फाट्यादरम्यानच्या पुलाजवळ पावसाच्या पाण्यामुळे मोठी दरी पडली आहे. एखाद्या वाहन चालकाने वेगात बाजू घेण्याचा प्रयत्न केल्यास मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पिंप्री ते चिखली झोलेबाबा गावापर्यंतच्या रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या कडा भरणे गरजेचे आहे.