शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
5
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
6
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
7
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
8
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
9
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
10
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
11
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
12
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
13
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
14
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
15
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
16
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
17
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
18
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
19
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
20
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या

नव साहित्यिकांनी वाचन, चिंतनावर भर द्यावा - ना.चं.कांबळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2019 14:33 IST

नव साहित्यीकांनी त्यांच्या लिखानाचा दर्जा वाढविण्यासाठी वाचन व चिंतनावर भर दिला पाहिजे, असे मत ज्येष्ठ साहित्यीक तथा बालभारतीचे माजी अध्यक्ष ना.चं. कांबळे यांनी व्यक्त केले.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : सोशल मिडीयाच्या या काळात लिहीनाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. नवसाहित्यीक तयार होत आहेत, ही बाब चांगली असली, तरी नव साहित्यीकांनी त्यांच्या लिखानाचा दर्जा वाढविण्यासाठी वाचन व चिंतनावर भर दिला पाहिजे, असे मत ज्येष्ठ साहित्यीक तथा बालभारतीचे माजी अध्यक्ष ना.चं. कांबळे यांनी व्यक्त केले.ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते , प्रसिध्द साहित्यिक, बालभारतीचे माजी अध्यक्ष, नॅशनल बुक्स ट्रस्टचे सदस्य , महाराष्टÑ शासनाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर चारित्र्य साधने प्रकाशन समितीचे सदस्य, ना.चं. कांबळे हे आपल्या लिखाणामुळे महाराष्टÑात ओळखल्या जातात. साहित्य व अभ्यासमंडळ क्षेत्रात विविध भूमिका ते पार पाडत आहेत. त्यांच्याशी साधलेला संवाद......प्रश्न - वाचनसंस्कृती वाढीसाठी काय करावयास पाहिजे?कांबळे - वाचन संस्कृतीवाढीसाठी वाचनाशिवाय पर्याय नाही. मग ते वाचनालयात जावून वाचन असो किंवा शाळा, महाविद्यालयामध्ये विविध विषयांवरचे वाचन असो. पूर्वी विद्यार्थ्यांना शाळेमधून पुस्तके देवून ते वाचन करण्याची सवय लावण्यासाठी प्रयत्न केले जायचे, ते पुन्हा करणे गरजेचे आहे. लहान मुलांन कॉमिक्स देवून त्यांना वाचनाकडे वळविता येईल.प्रश्न - नव साहित्यिकांच्या लिखाणाबाबत काय सांगाल?कांबळे - सद्यस्थितीत सर्वच जण साहित्यिक बनले आहेत. उठसुठ वाटेल तो काहीना काही लिखान करुन सोशल मिडीयावर व्हायरल करतोय. मित्र मंडळीकडून त्याला प्रतिसाद मिळत असल्याने तो स्वत:ला मोठा साहित्यिक समजतोय. वास्तवात तसे नाही. साहित्यिकांचे लिखाण उत्तमच परंतु सोशल मिडीयामुळे त्याकडे कोणी लक्ष देत नसल्याने लिखान कमी झाले असे म्हणता येणार नाही; परंतु वाचक कमी झाले एवढे नक्की!प्रश्न - नवीन साहित्यिकांना काय संदेश द्याल ?कांबळे - नव्यानेच लिहिणाºया साहित्यिकांनी अवश्य लिहावे . लिहिताना आपण लिहिलेले साहित्य उत्तम दजार्चे आहे की नाही हे पडताळावे. नवीन साहित्यीकांनी भरपूर वाचन, चिंतन आणि मनन करणे अंत्यत महत्वाचे आहे. यातील अनुभव मनात रुजविला पाहिजे. त्यातून खरे साहित्य उतरेल जे वाचकांनाही आवडेल यात दुमत नाही.प्रश्न - उत्तम साहित्य घडविण्यासाठी काय करावे ?कांबळे - उत्तम साहित्य लिखान करावयाचे असल्यास आधी सांगितल्याप्रमाणे वाचन सर्वात महत्वाचे. त्यांनतर प्रतिष्ठित , ख्यातीप्राप्त साहित्यीकांच्या भेटी घेवून आपले विचार मांडणे . त्यांनी दिलेल्या मार्गदर्शक सुचनांचे पालन करणे आवश्यक आहे. त्यांनी सांगितलेल्या बाबी ऐकून त्यावर चिंतन करावे. हे केल्यानंतर आपण किती चांगले साहित्यिक आहोत याची कल्पना आपल्याला झाल्याशिवाय राहणार नाही.

 सोशल मिडीयामुळे वाचन वाढले, परंतु साहित्यीक निर्माण करीत असलेल्या साहित्याकडे वाचकांनी पाठ फिरविली आहे. हातात मोबाईल घेवून वाटेल तो वाटेल तेथे काहीही वाचन करतांना दिसतोय. साहित्यिक मोठया मेहनतीने, अभ्यासपूर्ण लिखान करतात पण त्याला मोजकेच वाचक मिळताहेत. हे वाचन संस्कृतीसाठी ठिक नाही.

टॅग्स :washimवाशिमinterviewमुलाखतliteratureसाहित्य