शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

नव साहित्यिकांनी वाचन, चिंतनावर भर द्यावा - ना.चं.कांबळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2019 14:33 IST

नव साहित्यीकांनी त्यांच्या लिखानाचा दर्जा वाढविण्यासाठी वाचन व चिंतनावर भर दिला पाहिजे, असे मत ज्येष्ठ साहित्यीक तथा बालभारतीचे माजी अध्यक्ष ना.चं. कांबळे यांनी व्यक्त केले.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : सोशल मिडीयाच्या या काळात लिहीनाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. नवसाहित्यीक तयार होत आहेत, ही बाब चांगली असली, तरी नव साहित्यीकांनी त्यांच्या लिखानाचा दर्जा वाढविण्यासाठी वाचन व चिंतनावर भर दिला पाहिजे, असे मत ज्येष्ठ साहित्यीक तथा बालभारतीचे माजी अध्यक्ष ना.चं. कांबळे यांनी व्यक्त केले.ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते , प्रसिध्द साहित्यिक, बालभारतीचे माजी अध्यक्ष, नॅशनल बुक्स ट्रस्टचे सदस्य , महाराष्टÑ शासनाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर चारित्र्य साधने प्रकाशन समितीचे सदस्य, ना.चं. कांबळे हे आपल्या लिखाणामुळे महाराष्टÑात ओळखल्या जातात. साहित्य व अभ्यासमंडळ क्षेत्रात विविध भूमिका ते पार पाडत आहेत. त्यांच्याशी साधलेला संवाद......प्रश्न - वाचनसंस्कृती वाढीसाठी काय करावयास पाहिजे?कांबळे - वाचन संस्कृतीवाढीसाठी वाचनाशिवाय पर्याय नाही. मग ते वाचनालयात जावून वाचन असो किंवा शाळा, महाविद्यालयामध्ये विविध विषयांवरचे वाचन असो. पूर्वी विद्यार्थ्यांना शाळेमधून पुस्तके देवून ते वाचन करण्याची सवय लावण्यासाठी प्रयत्न केले जायचे, ते पुन्हा करणे गरजेचे आहे. लहान मुलांन कॉमिक्स देवून त्यांना वाचनाकडे वळविता येईल.प्रश्न - नव साहित्यिकांच्या लिखाणाबाबत काय सांगाल?कांबळे - सद्यस्थितीत सर्वच जण साहित्यिक बनले आहेत. उठसुठ वाटेल तो काहीना काही लिखान करुन सोशल मिडीयावर व्हायरल करतोय. मित्र मंडळीकडून त्याला प्रतिसाद मिळत असल्याने तो स्वत:ला मोठा साहित्यिक समजतोय. वास्तवात तसे नाही. साहित्यिकांचे लिखाण उत्तमच परंतु सोशल मिडीयामुळे त्याकडे कोणी लक्ष देत नसल्याने लिखान कमी झाले असे म्हणता येणार नाही; परंतु वाचक कमी झाले एवढे नक्की!प्रश्न - नवीन साहित्यिकांना काय संदेश द्याल ?कांबळे - नव्यानेच लिहिणाºया साहित्यिकांनी अवश्य लिहावे . लिहिताना आपण लिहिलेले साहित्य उत्तम दजार्चे आहे की नाही हे पडताळावे. नवीन साहित्यीकांनी भरपूर वाचन, चिंतन आणि मनन करणे अंत्यत महत्वाचे आहे. यातील अनुभव मनात रुजविला पाहिजे. त्यातून खरे साहित्य उतरेल जे वाचकांनाही आवडेल यात दुमत नाही.प्रश्न - उत्तम साहित्य घडविण्यासाठी काय करावे ?कांबळे - उत्तम साहित्य लिखान करावयाचे असल्यास आधी सांगितल्याप्रमाणे वाचन सर्वात महत्वाचे. त्यांनतर प्रतिष्ठित , ख्यातीप्राप्त साहित्यीकांच्या भेटी घेवून आपले विचार मांडणे . त्यांनी दिलेल्या मार्गदर्शक सुचनांचे पालन करणे आवश्यक आहे. त्यांनी सांगितलेल्या बाबी ऐकून त्यावर चिंतन करावे. हे केल्यानंतर आपण किती चांगले साहित्यिक आहोत याची कल्पना आपल्याला झाल्याशिवाय राहणार नाही.

 सोशल मिडीयामुळे वाचन वाढले, परंतु साहित्यीक निर्माण करीत असलेल्या साहित्याकडे वाचकांनी पाठ फिरविली आहे. हातात मोबाईल घेवून वाटेल तो वाटेल तेथे काहीही वाचन करतांना दिसतोय. साहित्यिक मोठया मेहनतीने, अभ्यासपूर्ण लिखान करतात पण त्याला मोजकेच वाचक मिळताहेत. हे वाचन संस्कृतीसाठी ठिक नाही.

टॅग्स :washimवाशिमinterviewमुलाखतliteratureसाहित्य