शहरं
Join us  
Trending Stories
1
गजब होई गवा! महिलेच्या व्होटर आयडीवर छापला बिहारी मुख्यमंत्र्यांचा फोटो; पती म्हणतोय... 
2
तीन हजारांवर काॅटेज, हाॅटेलमध्ये ‘सर्च ऑपरेशन’; संशयास्पद ‘बोटी’च्या संदेशानंतर पोलिस ‘अलर्ट’
3
फेसबुक लाईव्हवर व्यथा सांगितली अन् १५ मिनिटांत संपवलं जीवन! रिअल इस्टेट व्यावसायिकानं का उचललं टोकाचं पाऊल? 
4
कंगाल पाकिस्तानबद्दल काय म्हणावं? पाकिस्तानची सरकारी एअरलाईन्स खरेदी करण्यासाठी आले सीमेंटवाले
5
पुढील काही महिने पृथ्वी वेगाने फिरणार; भविष्यात घड्याळाची वेळ बदलावी लागणार, ९ जुलैला काय घडलं?
6
रात्री ज्याला चोर म्हणून तुडवला, त्यालाच सकाळी जावई बनवला! रात्रभरात असं नेमकं घडलं काय? 
7
आजचे राशीभविष्य: या राशींसाठी लग्न जुळण्याचा योग, व्यापार - व्यवसायात फायदा होणार, चांगला दिवस
8
हातात हात अन् प्रेग्नंट पत्नीला साथ! शूराची काळजी घेताना दिसला अरबाज खान, व्हिडीओ व्हायरल
9
समलैंगिक संबंध, ब्लॅकमेलिंग अन् शेवट...; मुंबईतील ३ घटना, ३ मृत्यू, नेमकं काय घडले?
10
५० लाख नागरिकांना मिळणार जागेची मालकी; तुकडेबंदी कायदा तूर्त शिथिल, नंतर रद्द करणार
11
...तर खराब रस्त्यांसाठी नागरिकांनी या आमदारांना का मारू नये?; टॉवेल बनियनवर गावगुंडासारखा राडा
12
विद्यार्थिनींची अंतर्वस्त्रे उतरवली, कारण...; शहापूरच्या खासगी शाळेतील अत्यंत घृणास्पद प्रकार
13
सोळावं वरीस धोक्याचं... किशोरवयातच प्रौढपण; खेळण्याच्या वयात मुली पडतायेत वासनेचा बळी
14
मतदारांच्या कमाल संख्येनुसार मतदान केंद्रे; निवडणूक आयोगाचे निर्देश, एका इमारतीत आता १० केंद्रे
15
पंढरीचे ‘एआय’ वारकरी! AI ने केली २७ लाख लोकांची गर्दी मोजण्याची किमया
16
निवडणूक आयोग जनतेला मूर्ख समजतो की काय?; रोखठोक प्रश्न विचारणं आवश्यक बनलंय
17
महासंचालकांचे परिपत्रक सर्व पोलिसांवर बंधनकारक नाही का?; अपूर्ण केस डायरीवरून उच्च न्यायालय संतापले
18
मृत घोषित केलेले बाळ अंत्यसंस्कारावेळी रडले; अंबाजोगाईच्या रुग्णालयात धक्कादायक प्रकार
19
‘आई’ व्हा! शाळकरी मुलींनाही 'या' देशानं दिलं आमिष; मुलं जन्माला घातली तर मिळणार १ लाख
20
ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाविकास आघाडी फुटणार का? पृथ्वीराज चव्हाणांचे सूचक विधान, म्हणाले...

जल व मृद संधारण काळाची गरज - सुभाष नानवटे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2019 15:39 IST

वाळकी-दोडकी येथील पाणी फाऊंडेशनचे जिल्हा समन्वयक तथा राज्यस्तरीय महात्मा फुले जलमित्र पुरस्कारप्राप्त सुभाष नानवटे यांच्याशी साधलेला हा संवाद...

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : दरवर्षी निर्माण होणारी पाणीटंचाई आणि त्यामुळे गावागावात उडणारी त्रेधातिरपीट, शेतशिवारांमधील पिकांची पुरेशा पाण्याअभावी होणारी हानी. हे प्रकार थांबवायचे असतील तर प्रथम पावसाचे जमिनीवर पडणारे पाणी अडविणे आणि ते जमिनीत मुरविणे आवश्यक आहे. यासंदर्भात वाशिम तालुक्यातील वाळकी-दोडकी येथील पाणी फाऊंडेशनचे जिल्हा समन्वयक तथा राज्यस्तरीय महात्मा फुले जलमित्र पुरस्कारप्राप्त सुभाष नानवटे यांच्याशी साधलेला हा संवाद...

गावागावात जल व मृद संधारणाची कामे दर्जेदार व्हावीत, यासाठी काय करणे अपेक्षित आहे?- दरवर्षीच जाणवणारी पाणीटंचाई कायमची संपुष्टात आणायची असेल तर गावागावात जल व मृद संधारणाची कामे मार्गी लागणे आवश्यक आहे. अर्थात ही कामे माथा ते पायथा याप्रमाणे तथा शास्त्रीय पद्धतीने होणे गरजेचे आहे. शेतशिवारात पडलेला पावसाचा प्रत्येक थेंब तेथेच मुरला तर दुष्काळाला हरविणे सहजसाध्य होईल. पावसाळ्यात पूर आल्यास केवळ पाणी वाहत नाही तर त्यासोबत शेतातील सुपीक माती देखील वाहून जाते. त्यामुळे मृद व जलसंधारणाची कामे योग्य पद्धतीने करून पावसाचे पाणी अडवून जिरविण्यासोबतच सुपीक मातीचे रक्षण करणे ही काळाची गरज आहे.

यात कुठली कामे करणे आवश्यक आहे ?- सी.सी.टी, दगडी बांध, छोटा माती बांध, वृक्ष लागवड यासारखे उपचार खूप परिणामकारक ठरतात. माथ्यावरून वाहून जाणारे पाणी व त्यासोबत वाहून जाणारी माती अडविण्यासाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे. गावातील गावातील प्रत्येक व्यक्त्तीने किमान दोन तास श्रमदान केले तरी मृद व जलसंधारणाची कामे दर्जेदार होणे शक्य आहे. श्रमदानातून एक घनमीटर काम पूर्ण झाले तरी किमान हजार लिटर पाणी अडते. हेच पाणी भूगर्भात मुरण्यास मदत होऊन पाणीटंचाईवर मात करणे शक्य आहे.गावे पाणीदार करण्यासाठी काय करता येईल?- शेतात जेथून पाणी वाहून जाते, त्याठिकाणी ६ मिटर गोलाई व ३ मिटर खोलीचा एक खड्डा तयार करून त्याचा बाजूला एक शोष खड्डा तयार करावा. मातीविरहित पाणी ‘रिचार्ज पिट’ मध्ये घेऊन उर्वरित पाणी बाहेर सोडावे. यामुळे गरजेनुसार शुद्ध पाणी भूगर्भात मुरण्यास मदत मिळते. परिणामी, भूगर्भाची पातळी वाढण्यासोबतच शेतातील सुपीक माती शेतातच थांबण्यास मदत मिळून भविष्यात गावे पाणीदार व्हायला वेळ लागणार नाही.

टॅग्स :washimवाशिमinterviewमुलाखत