शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
2
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
3
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
4
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
5
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
6
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
7
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
8
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
9
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
10
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
11
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
12
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
13
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
14
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
15
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
16
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
17
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
18
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
19
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
20
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!

जल व मृद संधारण काळाची गरज - सुभाष नानवटे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2019 15:39 IST

वाळकी-दोडकी येथील पाणी फाऊंडेशनचे जिल्हा समन्वयक तथा राज्यस्तरीय महात्मा फुले जलमित्र पुरस्कारप्राप्त सुभाष नानवटे यांच्याशी साधलेला हा संवाद...

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : दरवर्षी निर्माण होणारी पाणीटंचाई आणि त्यामुळे गावागावात उडणारी त्रेधातिरपीट, शेतशिवारांमधील पिकांची पुरेशा पाण्याअभावी होणारी हानी. हे प्रकार थांबवायचे असतील तर प्रथम पावसाचे जमिनीवर पडणारे पाणी अडविणे आणि ते जमिनीत मुरविणे आवश्यक आहे. यासंदर्भात वाशिम तालुक्यातील वाळकी-दोडकी येथील पाणी फाऊंडेशनचे जिल्हा समन्वयक तथा राज्यस्तरीय महात्मा फुले जलमित्र पुरस्कारप्राप्त सुभाष नानवटे यांच्याशी साधलेला हा संवाद...

गावागावात जल व मृद संधारणाची कामे दर्जेदार व्हावीत, यासाठी काय करणे अपेक्षित आहे?- दरवर्षीच जाणवणारी पाणीटंचाई कायमची संपुष्टात आणायची असेल तर गावागावात जल व मृद संधारणाची कामे मार्गी लागणे आवश्यक आहे. अर्थात ही कामे माथा ते पायथा याप्रमाणे तथा शास्त्रीय पद्धतीने होणे गरजेचे आहे. शेतशिवारात पडलेला पावसाचा प्रत्येक थेंब तेथेच मुरला तर दुष्काळाला हरविणे सहजसाध्य होईल. पावसाळ्यात पूर आल्यास केवळ पाणी वाहत नाही तर त्यासोबत शेतातील सुपीक माती देखील वाहून जाते. त्यामुळे मृद व जलसंधारणाची कामे योग्य पद्धतीने करून पावसाचे पाणी अडवून जिरविण्यासोबतच सुपीक मातीचे रक्षण करणे ही काळाची गरज आहे.

यात कुठली कामे करणे आवश्यक आहे ?- सी.सी.टी, दगडी बांध, छोटा माती बांध, वृक्ष लागवड यासारखे उपचार खूप परिणामकारक ठरतात. माथ्यावरून वाहून जाणारे पाणी व त्यासोबत वाहून जाणारी माती अडविण्यासाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे. गावातील गावातील प्रत्येक व्यक्त्तीने किमान दोन तास श्रमदान केले तरी मृद व जलसंधारणाची कामे दर्जेदार होणे शक्य आहे. श्रमदानातून एक घनमीटर काम पूर्ण झाले तरी किमान हजार लिटर पाणी अडते. हेच पाणी भूगर्भात मुरण्यास मदत होऊन पाणीटंचाईवर मात करणे शक्य आहे.गावे पाणीदार करण्यासाठी काय करता येईल?- शेतात जेथून पाणी वाहून जाते, त्याठिकाणी ६ मिटर गोलाई व ३ मिटर खोलीचा एक खड्डा तयार करून त्याचा बाजूला एक शोष खड्डा तयार करावा. मातीविरहित पाणी ‘रिचार्ज पिट’ मध्ये घेऊन उर्वरित पाणी बाहेर सोडावे. यामुळे गरजेनुसार शुद्ध पाणी भूगर्भात मुरण्यास मदत मिळते. परिणामी, भूगर्भाची पातळी वाढण्यासोबतच शेतातील सुपीक माती शेतातच थांबण्यास मदत मिळून भविष्यात गावे पाणीदार व्हायला वेळ लागणार नाही.

टॅग्स :washimवाशिमinterviewमुलाखत