शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

जल व मृद संधारण काळाची गरज - सुभाष नानवटे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2019 15:39 IST

वाळकी-दोडकी येथील पाणी फाऊंडेशनचे जिल्हा समन्वयक तथा राज्यस्तरीय महात्मा फुले जलमित्र पुरस्कारप्राप्त सुभाष नानवटे यांच्याशी साधलेला हा संवाद...

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : दरवर्षी निर्माण होणारी पाणीटंचाई आणि त्यामुळे गावागावात उडणारी त्रेधातिरपीट, शेतशिवारांमधील पिकांची पुरेशा पाण्याअभावी होणारी हानी. हे प्रकार थांबवायचे असतील तर प्रथम पावसाचे जमिनीवर पडणारे पाणी अडविणे आणि ते जमिनीत मुरविणे आवश्यक आहे. यासंदर्भात वाशिम तालुक्यातील वाळकी-दोडकी येथील पाणी फाऊंडेशनचे जिल्हा समन्वयक तथा राज्यस्तरीय महात्मा फुले जलमित्र पुरस्कारप्राप्त सुभाष नानवटे यांच्याशी साधलेला हा संवाद...

गावागावात जल व मृद संधारणाची कामे दर्जेदार व्हावीत, यासाठी काय करणे अपेक्षित आहे?- दरवर्षीच जाणवणारी पाणीटंचाई कायमची संपुष्टात आणायची असेल तर गावागावात जल व मृद संधारणाची कामे मार्गी लागणे आवश्यक आहे. अर्थात ही कामे माथा ते पायथा याप्रमाणे तथा शास्त्रीय पद्धतीने होणे गरजेचे आहे. शेतशिवारात पडलेला पावसाचा प्रत्येक थेंब तेथेच मुरला तर दुष्काळाला हरविणे सहजसाध्य होईल. पावसाळ्यात पूर आल्यास केवळ पाणी वाहत नाही तर त्यासोबत शेतातील सुपीक माती देखील वाहून जाते. त्यामुळे मृद व जलसंधारणाची कामे योग्य पद्धतीने करून पावसाचे पाणी अडवून जिरविण्यासोबतच सुपीक मातीचे रक्षण करणे ही काळाची गरज आहे.

यात कुठली कामे करणे आवश्यक आहे ?- सी.सी.टी, दगडी बांध, छोटा माती बांध, वृक्ष लागवड यासारखे उपचार खूप परिणामकारक ठरतात. माथ्यावरून वाहून जाणारे पाणी व त्यासोबत वाहून जाणारी माती अडविण्यासाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे. गावातील गावातील प्रत्येक व्यक्त्तीने किमान दोन तास श्रमदान केले तरी मृद व जलसंधारणाची कामे दर्जेदार होणे शक्य आहे. श्रमदानातून एक घनमीटर काम पूर्ण झाले तरी किमान हजार लिटर पाणी अडते. हेच पाणी भूगर्भात मुरण्यास मदत होऊन पाणीटंचाईवर मात करणे शक्य आहे.गावे पाणीदार करण्यासाठी काय करता येईल?- शेतात जेथून पाणी वाहून जाते, त्याठिकाणी ६ मिटर गोलाई व ३ मिटर खोलीचा एक खड्डा तयार करून त्याचा बाजूला एक शोष खड्डा तयार करावा. मातीविरहित पाणी ‘रिचार्ज पिट’ मध्ये घेऊन उर्वरित पाणी बाहेर सोडावे. यामुळे गरजेनुसार शुद्ध पाणी भूगर्भात मुरण्यास मदत मिळते. परिणामी, भूगर्भाची पातळी वाढण्यासोबतच शेतातील सुपीक माती शेतातच थांबण्यास मदत मिळून भविष्यात गावे पाणीदार व्हायला वेळ लागणार नाही.

टॅग्स :washimवाशिमinterviewमुलाखत