शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

सुसाट हवा सुटली अन् भव्यदिव्य टोलनाका जमिनदोस्त; सुदैवाने जिवितहानी टळली, वाशिमनजिकची घटना

By सुनील काकडे | Updated: September 30, 2022 17:38 IST

तुरळक पाऊस सुरू असताना सुसाट वेगात हवा सुटली अन् क्षणात भव्यदिव्य स्वरूपातील टोलनाका जमिनदोस्त झाला.

वाशिम: तुरळक पाऊस सुरू असताना सुसाट वेगात हवा सुटली अन् क्षणात भव्यदिव्य स्वरूपातील टोलनाका जमिनदोस्त झाला. ही घटना शहरानजिकच्या वाशिम-हिंगोली राष्ट्रीय महामार्गावरील तोंडगानजिक आज, ३० सप्टेंबर रोजी दुपारी ४.३० वाजेच्या सुमारास घडली. सुदैवाने यावेळी टोलनाक्यानजिक एकही वाहन उभे नव्हते. त्यामुळे जिवितहानी टळली.

प्राप्त माहितीनुसार, वाशिमपासून काहीच अंतरावर असलेल्या तोंडगावनजिक राष्ट्रीय महामार्गावर एकाचवेळी ८ वाहने निघू शकतील, असा भव्यदिव्य टोलनाका उभारण्यात आला आहे. काहीच दिवसांपूर्वी झालेल्या या कामावर कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यात आला. असे असताना आज दुपारच्या सुमारास सुसाट वेगात हवा सुटल्यानंतर हा टोलनाका काही कळण्याच्या आत जमिनदोस्त झाला. यावरून हे काम किती निकृष्ट दर्जाचे झाले, याची प्रचिती आली आहे. 

कर्मचाऱ्यांमध्ये घबराहट; नागरिकांचे मदतकार्य

अचानक टोलनाका कोसळल्याने त्याठिकाणी कार्यरत कर्मचाऱ्यांमध्ये मोठी घबराहट निर्माण झाली. आसपासच्या शेतात काम करत असलेल्या शेतकरी, शेतमजूरांसह रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांनी मदतकार्य करून टोलनाक्याखाली असलेल्या काही कर्मचाऱ्यांना सुखरूप बाहेर काढले.

 

टॅग्स :washimवाशिम