शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय महामार्ग दुरुस्तीची समस्या निकाली निघणार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2018 13:13 IST

लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम: राज्यातील विविध राष्ट्रीय महामार्गाच्या दुरुस्ती प्रक्रियेत येणाºया अडचणींच्या पृष्ठभूमीवर वाशिम-यवतमाळच्या खासदार भावना गवळी यांनी लोकसभेत प्रश्न उपस्थित केला. या प्रश्नावर केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितिन गडकरी यांनी स्पष्टीकरण देताना राष्ट्रीय महामार्गाची दुरुस्ती राज्य शासनाकडून करून ते सर्व केंद्र सरकारच्या अखत्यारीत घेण्यात येणार आहेत, अशी माहिती त्यांनी शनिवारी ...

ठळक मुद्देराष्ट्रीय महामार्गाच्या दुरुस्तीच्या समस्येला आज खासदार भावना गवळी यांनी लोकसभेत प्रश्न उपस्थित करून वाचा फोडण्याचा प्रयत्न केला. केंद्रीय भुपृष्ठ वाहतुक मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्या उत्तरात सांगितले की, सदरची जबाबदारी ही राज्य सरकारची आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम: राज्यातील विविध राष्ट्रीय महामार्गाच्या दुरुस्ती प्रक्रियेत येणाºया अडचणींच्या पृष्ठभूमीवर वाशिम-यवतमाळच्या खासदार भावना गवळी यांनी लोकसभेत प्रश्न उपस्थित केला. या प्रश्नावर केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितिन गडकरी यांनी स्पष्टीकरण देताना राष्ट्रीय महामार्गाची दुरुस्ती राज्य शासनाकडून करून ते सर्व केंद्र सरकारच्या अखत्यारीत घेण्यात येणार आहेत, अशी माहिती त्यांनी शनिवारी दिली.राज्यात मोठया प्रमाणात राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरु आहे. या कामाची प्रक्रिया अनेक महिने सुरु राहत असल्यामुळे खराब झालेल्या रस्त्यावर नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे. दरम्यान तयार होत असलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या दुरुस्तीच्या समस्येला आज खासदार भावना गवळी यांनी लोकसभेत प्रश्न उपस्थित करून वाचा फोडण्याचा प्रयत्न केला. देशात वाहनांची संख्या मोठया प्रमाणात वाढली आहे. त्या अनुषंगाने केंद्र सरकार ने सुद्धा अनेक ठिकाणी राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरु केले आहे. सध्या महाराष्टÑात ६ हजार ४११ किलोमीटर राष्ट्रीय महामार्गासाठी विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. अनेक ठिकाणी या महामर्गाच्या कामाची प्रक्रिया सुरु झाली आहे. वास्तविक राष्ट्रीय महामार्गाचे विकास आराखडे तयार करताना तसेच निविदा काढण्यात एक ते दिड वर्षाचा कालावधी जातो. या दरम्यान त्या रस्त्याची दुरुस्ती केली जात नाही वाढलेली वाहनांची संख्या बघता नगारिकांना अशा रस्त्यामुळे कमालीचा त्रास सहन करावा लागतो त्या अनुषंगाने या  रस्त्याच्या दुरुस्तीची जबाबदारी निश्चित व्हावी म्हणून खासदार भावना गवळी यांनी प्रश्न उपस्थित केला. त्यावर केंद्रीय भुपृष्ठ वाहतुक मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्या उत्तरात सांगितले की, सदरची जबाबदारी ही राज्य सरकारची आहे. देशात आता १ लाख ८० हजार किलोमीटर अंतराचे तयार करण्यात येत आहेत. देशात २२ टक्के अ‍ॅटोमोबाईलची वाढ होत असल्यामुळे हे रस्ते तयार करणे गरजेचे आहे. यातील ९१ हजार ते १ लाख ३० हजार पर्यंतचे  रस्ते राष्टÑीय महामर्गाघोषीत करण्यात आले आहे. या समोरचे प्रक्रीयेत असलेले रस्ते मुख्य राष्ट्रीय महामार्ग म्हणून घोषीत करण्यात आले आहे. अशा मुख्य राष्ट्रीय महामार्गाची दुरुस्ती ही राज्य सरकारने करावयाची आहे. या रस्त्याचे काम झाल्यानंतर त्याला राष्ट्रीय महामार्ग घोषीत करून त्याची दुरुस्ती केंद्र सरकार स्वत:कडे घेईल. त्यामुळे अशा महामार्गांच्या दुरुस्तीच्या प्रश्न संपुष्ठात आला आहे.

टॅग्स :washimवाशिमBhavna Gavliभावना गवळीNitin Gadkariनितीन गडकरी