शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

कनेक्टीव्हिटी नसल्याच्या नावाखाली मंगरुळपीर स्टेट बँकेतील व्यवहार बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2018 15:52 IST

वाशिम: सर्व्हर कनेक्टीव्हीटी नसल्याचे  कारण सांगून स्टेट बँके च्या मंगरूळपीर शाखेतील संपूर्ण व्यवहार मागील दोन दिवसांपासून बंद ठेवण्यात आले आहेत. या प्रकारामुळे बँकेच्या खातेदारांसह इतर व्यवहारासाठी येथे येणाऱ्या ग्राहकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत असून, अनेक जण आर्थिक अडचणीत सापडत असल्याचे दिसत आहे. 

ठळक मुद्देमागील दोन दिवसांपासून स्टेट बँकेच्या मंगरुळपीर येथील शाखेचे व्यवहार बंद आहेत. बीएसएनएल सर्व्हरची तांत्रिक समस्या त्यासाठी कारणीभूत असल्याचे येथील अधिकारी सांगत आहेत. तथापि, स्टेट बँक वगळता इतर सर्वच बँकांचे व्यवहार मात्र सुरळीत चालू आहेत.

वाशिम: सर्व्हर कनेक्टीव्हीटी नसल्याचे  कारण सांगून स्टेट बँके च्या मंगरूळपीर शाखेतील संपूर्ण व्यवहार मागील दोन दिवसांपासून बंद ठेवण्यात आले आहेत. या प्रकारामुळे बँकेच्या खातेदारांसह इतर व्यवहारासाठी येथे येणाऱ्या ग्राहकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत असून, अनेक जण आर्थिक अडचणीत सापडत असल्याचे दिसत आहे. मागील दोन दिवसांपासून स्टेट बँकेच्या मंगरुळपीर येथील शाखेचे व्यवहार बंद आहेत. बीएसएनएल सर्व्हरची तांत्रिक समस्या त्यासाठी कारणीभूत असल्याचे येथील अधिकारी सांगत आहेत. मंगरुळपीर येथे सर्वच राष्ट्रीयकृत बँक आणि जिल्हा मध्यवर्ती बँके च्या शाखाही बीएसएनएलच्या सर्व्हरशी जोडल्या आहेत. तथापि, स्टेट बँक वगळता इतर सर्वच बँकांचे व्यवहार मात्र सुरळीत चालू आहेत. त्यातही स्टेट बँकेच्या इतर ठिकाणच्या शाखांतही ही अडचण नाही. त्यामुळे स्टेट बँके च्या मंगरुळपीर येथील शाखेसाठी बीएसएनएलचे स्वतंत्र सर्व्हर आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. विशेष म्हणजे बीएसएनएलशी जोडले असलेल्या कार्यालयांचे कामकाजही सुरळीत सुरू आहेत. मग मंगरुळपीर स्टेट बँकेच्या व्यवहारांनाच अडथळा कसा निर्माण झाला, हे न उलगडणारे कोडे आहे. कारण कोणतेही असले तरी, व्यवहार बंद असल्यामुळे येथे दरदिवशी येणारे हजारांवर ग्राहक, खातेदार प्रचंड अडचणीत सापडले असून, त्यांची समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नही केले जात नसल्याचे दिसत आहे.  कनेक्टीव्हिटीचा अभाव असेल, तर तो दूर करण्यासाठी प्रयत्न का केले जात नाहीत, असा प्रश्न ग्राहकवर्गाकडून उपस्थित केला जात आहे. त्याशिवाय सर्व्हर कनेक्टीव्हिटी नाही, असा फलक कोठेही लावण्यात आलेला नाही. त्यामुळे ग्राहकांना माहितीच होत नसल्याने त्यांच्या येरझारा मात्र सुरूच आहेत.   पण, कनेक्टीव्हीटी नसल्याचे सांगून बँक व्यवहार रोखणे आणि त्यासाठी सर्व ग्राहकांना वेठीस धरणे ही फार मोठी फसवणूक आहे. जर कनक्टीव्हीटी नाही तर तो प्रश्न प्रश्न तात्काळ सोडविणे आवश्यक होते. तसे वरीष्ठ पातळीवर कळविणे व वरिष्ठ पातळीवरून संबंधित तज्ञ, तंत्रज्ञ, वा इतर यांना पाठवून अडचण दूर करण्याचा प्रयत्न होणे आवश्यक होते. पण, तसे काहीही दिसले नाही. -निलेश मिसाळ, खातेदार ग्राहक, स्टेट बँक आॅफ इंडिया शाखा, मंगरुळपीर

टॅग्स :washimवाशिमMangrulpirमंगरूळपीरState Bank of Indiaस्टेट बँक आॅफ इंडिया