शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

दुर्धर आजार बरे करण्याच्या नावावर रुग्णांच्या आर्थिक लुबाडणूकीचा गोरखधंदा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2018 12:57 IST

वाशीम : आयुर्वेदिक औषधांनी दुर्धर आजार बरा करण्याच्या नावावर रुग्णांना लक्षावधी रुपयांनी लुटणारी टोळी जिल्ह्यात सक्रिय झाली आहे.

ठळक मुद्देलोकांची मानसिकता ओळखून हे त्यांना उपचाराचे प्रलोभन दाखवून काही हजार ते लाख रुपयापर्यंत फसवणूक करतात.अशा लोकांचे परिसरात काही खाजगी दलाल सुद्धा कार्यरत दिसून येत आहेत.एक वा दोन तीन वेळा औषधे घेऊनही काहीच सुधारणा दिसत नसल्याने नंतर रुग्णांना काहीतरी मंत्र तांत्रिक गोष्टींमध्ये अडकवले जाते.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशीम :आयुर्वेदिक औषधांनी दुर्धर आजार बरा करण्याच्या नावावर रुग्णांना लक्षावधी रुपयांनी लुटणारी टोळी जिल्ह्यात सक्रिय झाली आहे.कोणतेही आयुर्वेदिक पदवी न घेतलेली ही टोळी विविध रुग्णालयात उपचार घेणाºया लोकांना लक्ष करते. शहरी व ग्रामीण भागात दुर्धर आजाराने ग्रस्त असलेल्या लोकांची मानसिकता ओळखून हे त्यांना उपचाराचे प्रलोभन दाखवून काही हजार ते लाख रुपयापर्यंत फसवणूक करतात. गावोगावी आयुर्वेदिक चूर्ण आणि इतर आयुर्वेदिक औषधे विक्री करतात. दुर्धर आजाराचा रुग्ण असल्याची माहिती मिळताच यांचे खरे कार्य सुरू होते.      अशा लोकांचे परिसरात काही खाजगी दलाल सुद्धा कार्यरत दिसून येत आहेत. आयुर्वेदिक औषधांमुळे मला खूप लाभ झाला असून ते आजारातून बाहेर आल्याचे पटवून सांगतात. रुग्णांच्या नातेवाईकांनी विचारपूस केल्यावर त्यांना एका अनोळखी व्यक्तीचा मोबाईल क्रमांक दिला जातो. संबंधित व्यक्तीशी नातेवाईकांशी बोलणे झाल्यावर त्यांचा रुग्ण चांगल्या पद्धतीने सामान्य जीवन जगत असल्याचे पटवले जाते. नातेवाईकांची खात्री झाल्यावर हे भोंदू वैद्य अत्यंत कमी तपासणी शुल्क घेऊन रुग्णांना महागडी भस्मे आणि इतर औषधे लिहून देतात. आयुर्वेदिक औषधांची   भस्मे महागडी असून ही सर्व आयुर्वेदिक औषधे शहरातील विशिष्ट आयुर्वेदिक दुकानातूनच खरेदी करण्याची अट घालतात. भोंदू वैद्यांनी लिहून दिलेली सदर औषधे शहरातील कुठल्याही आयुर्वेदिक दुकानात मिळत नसल्याने रुग्ण पुन्हा या भोंदूकडे परत जातात .मग त्यांना विशिष्ट आयुर्वेदिक दुकानांचा पत्ता दिला जातो. शहरात कुठेही न मिळणारी सदर काल्पनिक नावे असलेली ही भस्मे किंवा इतर औषधे त्या विशिष्ट आयुर्वेद दुकानात मात्र उपलब्ध असतात आणि ती सुद्धा अव्वाच्या सव्वा किमतीमध्ये. भोंदू वैद्याने सुवर्णभस्म लिहून दिले असता तो दुकानदार चक्क सोनेरी रंगाचे भस्म ग्रॅम ग्रॅम ने मोजून देतो. वास्तविक पाहता सुवर्णभस्म हे सोनेरी नसून काळ्या रंगाचे असते. भोंदू वैद्याने लिहून दिलेल्या यादीची किंमत हजारोंच्या घरात जाते. आजारातून बरे होण्याच्या आशेने रुग्ण किंवा त्यांचे नातेवाईक ही बोगस महागडी औषधे खरेदी करतात. एक वा दोन तीन वेळा औषधे घेऊनही काहीच सुधारणा दिसत नसल्याने नंतर रुग्णांना काहीतरी मंत्र तांत्रिक गोष्टींमध्ये अडकवले जाते.अशा प्रकरणामुळे आयुवेर्दाविषयी जनतेच्या मनात गैरसमजूत निर्माण होऊन रुग्ण निराशेच्या गर्तेत ढकलल्या जातात.अनेक रुग्ण त्यांचे अनुभव नंतर सांगतात आणि फसवणूक झाल्याचे मान्य करतात , परंतु कुणीही पोलिसात तक्रार करत नाहीत. तक्रार होत नसल्याने अशा भोंदू वैद्यांचे फावत चालले आहे. खेडोपाडी चूर्ण,वट्या गुट्या घेऊन यांचा गोरखधंदा राजरोशपणे सुरू असतो. ह्या प्रकाराचे बळी फक्त अडाणी लोक नसतात तर समाजातील सुशिक्षित लोक सुद्धा मोठ्या प्रमाणात आहेत.कोणतीही आयुवेर्दाची मान्यताप्राप्त पदवी नसतांना अनेक बेरोजगार सुद्धा हा गोरखधंदा करतांना दिसतात. नागरिकांनी याबाबत सावधता बाळगणे गरजेचे झाले आहे.

कुठलीही आयुर्वेदाची पदवी नसलेल्या भोंदूकडून उपचार घेण्याची परंपरा अनेक वर्षांपासून नागरिकांकडून चालत आली आहे. परंतु ही पध्दत चुकीची असून एखादयाच्या जिवावर बेतण्यासारखी आहे. भोंदू वैद्यांकडून उपचार न घेता त्यांची तक्रार करुन त्यांचे पितळ उघडे पाडण्याची गरज आहे.- डॉ दीपक ढोके, राज्यसदस्य,  महाराष्ट्र कौन्सिल आॅफ इंडियन मेडिसिन अंतर्गत बनावट  डॉक्टर प्रतिबंधक समितीे

टॅग्स :washimवाशिमdoctorडॉक्टर