शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

दुर्धर आजार बरे करण्याच्या नावावर रुग्णांच्या आर्थिक लुबाडणूकीचा गोरखधंदा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2018 12:57 IST

वाशीम : आयुर्वेदिक औषधांनी दुर्धर आजार बरा करण्याच्या नावावर रुग्णांना लक्षावधी रुपयांनी लुटणारी टोळी जिल्ह्यात सक्रिय झाली आहे.

ठळक मुद्देलोकांची मानसिकता ओळखून हे त्यांना उपचाराचे प्रलोभन दाखवून काही हजार ते लाख रुपयापर्यंत फसवणूक करतात.अशा लोकांचे परिसरात काही खाजगी दलाल सुद्धा कार्यरत दिसून येत आहेत.एक वा दोन तीन वेळा औषधे घेऊनही काहीच सुधारणा दिसत नसल्याने नंतर रुग्णांना काहीतरी मंत्र तांत्रिक गोष्टींमध्ये अडकवले जाते.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशीम :आयुर्वेदिक औषधांनी दुर्धर आजार बरा करण्याच्या नावावर रुग्णांना लक्षावधी रुपयांनी लुटणारी टोळी जिल्ह्यात सक्रिय झाली आहे.कोणतेही आयुर्वेदिक पदवी न घेतलेली ही टोळी विविध रुग्णालयात उपचार घेणाºया लोकांना लक्ष करते. शहरी व ग्रामीण भागात दुर्धर आजाराने ग्रस्त असलेल्या लोकांची मानसिकता ओळखून हे त्यांना उपचाराचे प्रलोभन दाखवून काही हजार ते लाख रुपयापर्यंत फसवणूक करतात. गावोगावी आयुर्वेदिक चूर्ण आणि इतर आयुर्वेदिक औषधे विक्री करतात. दुर्धर आजाराचा रुग्ण असल्याची माहिती मिळताच यांचे खरे कार्य सुरू होते.      अशा लोकांचे परिसरात काही खाजगी दलाल सुद्धा कार्यरत दिसून येत आहेत. आयुर्वेदिक औषधांमुळे मला खूप लाभ झाला असून ते आजारातून बाहेर आल्याचे पटवून सांगतात. रुग्णांच्या नातेवाईकांनी विचारपूस केल्यावर त्यांना एका अनोळखी व्यक्तीचा मोबाईल क्रमांक दिला जातो. संबंधित व्यक्तीशी नातेवाईकांशी बोलणे झाल्यावर त्यांचा रुग्ण चांगल्या पद्धतीने सामान्य जीवन जगत असल्याचे पटवले जाते. नातेवाईकांची खात्री झाल्यावर हे भोंदू वैद्य अत्यंत कमी तपासणी शुल्क घेऊन रुग्णांना महागडी भस्मे आणि इतर औषधे लिहून देतात. आयुर्वेदिक औषधांची   भस्मे महागडी असून ही सर्व आयुर्वेदिक औषधे शहरातील विशिष्ट आयुर्वेदिक दुकानातूनच खरेदी करण्याची अट घालतात. भोंदू वैद्यांनी लिहून दिलेली सदर औषधे शहरातील कुठल्याही आयुर्वेदिक दुकानात मिळत नसल्याने रुग्ण पुन्हा या भोंदूकडे परत जातात .मग त्यांना विशिष्ट आयुर्वेदिक दुकानांचा पत्ता दिला जातो. शहरात कुठेही न मिळणारी सदर काल्पनिक नावे असलेली ही भस्मे किंवा इतर औषधे त्या विशिष्ट आयुर्वेद दुकानात मात्र उपलब्ध असतात आणि ती सुद्धा अव्वाच्या सव्वा किमतीमध्ये. भोंदू वैद्याने सुवर्णभस्म लिहून दिले असता तो दुकानदार चक्क सोनेरी रंगाचे भस्म ग्रॅम ग्रॅम ने मोजून देतो. वास्तविक पाहता सुवर्णभस्म हे सोनेरी नसून काळ्या रंगाचे असते. भोंदू वैद्याने लिहून दिलेल्या यादीची किंमत हजारोंच्या घरात जाते. आजारातून बरे होण्याच्या आशेने रुग्ण किंवा त्यांचे नातेवाईक ही बोगस महागडी औषधे खरेदी करतात. एक वा दोन तीन वेळा औषधे घेऊनही काहीच सुधारणा दिसत नसल्याने नंतर रुग्णांना काहीतरी मंत्र तांत्रिक गोष्टींमध्ये अडकवले जाते.अशा प्रकरणामुळे आयुवेर्दाविषयी जनतेच्या मनात गैरसमजूत निर्माण होऊन रुग्ण निराशेच्या गर्तेत ढकलल्या जातात.अनेक रुग्ण त्यांचे अनुभव नंतर सांगतात आणि फसवणूक झाल्याचे मान्य करतात , परंतु कुणीही पोलिसात तक्रार करत नाहीत. तक्रार होत नसल्याने अशा भोंदू वैद्यांचे फावत चालले आहे. खेडोपाडी चूर्ण,वट्या गुट्या घेऊन यांचा गोरखधंदा राजरोशपणे सुरू असतो. ह्या प्रकाराचे बळी फक्त अडाणी लोक नसतात तर समाजातील सुशिक्षित लोक सुद्धा मोठ्या प्रमाणात आहेत.कोणतीही आयुवेर्दाची मान्यताप्राप्त पदवी नसतांना अनेक बेरोजगार सुद्धा हा गोरखधंदा करतांना दिसतात. नागरिकांनी याबाबत सावधता बाळगणे गरजेचे झाले आहे.

कुठलीही आयुर्वेदाची पदवी नसलेल्या भोंदूकडून उपचार घेण्याची परंपरा अनेक वर्षांपासून नागरिकांकडून चालत आली आहे. परंतु ही पध्दत चुकीची असून एखादयाच्या जिवावर बेतण्यासारखी आहे. भोंदू वैद्यांकडून उपचार न घेता त्यांची तक्रार करुन त्यांचे पितळ उघडे पाडण्याची गरज आहे.- डॉ दीपक ढोके, राज्यसदस्य,  महाराष्ट्र कौन्सिल आॅफ इंडियन मेडिसिन अंतर्गत बनावट  डॉक्टर प्रतिबंधक समितीे

टॅग्स :washimवाशिमdoctorडॉक्टर