शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
4
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
5
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
6
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
7
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
8
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
9
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
10
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
11
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
12
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
13
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
14
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
15
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
16
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
17
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
18
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
19
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
20
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण

आसेगावचे महावितरण कार्यालय एक आठवड्यापासून कुलूपबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 12:12 IST

MSEDCL News कनिष्ठ अभियंता पदभार स्वीकारल्यापासून कार्यालयात आलेच नाहीत.

लोकमत न्यूज नेटवर्कआसेगाव: पोलीस स्टेशन आसेगावअंतर्गत येणाऱ्या ३ पेक्षा अधिक गावांतील वीजपुरवठ्याची जबाबदारी असलेले आसेगाव वीज उपकेंद्राच्या अभियंत्याचे कार्यालय गेल्या आठवडाभरापेक्षा अधिक काळापासून कुलूप बंद आहे. येथे नियुक्त करण्यात आलेले कनिष्ठ अभियंता पदभार स्वीकारल्यापासून कार्यालयात आलेच नाहीत. त्यामुळे विविध अडचणींमुळे शेकडो शेतकरी आणि हजारो ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत.आसेगाव येथील वीज उपकेंद्रातून शेगी, कुंभी, वारा जहॉगिर या तीन फिडरद्वारे ३०पेक्षा अधिक गावांत वीज पुरवठा केला जातो. त्यात हजारो कृषिपंप जोडण्यांसह घरगुती जोडण्यांचा समावेश आहे. गेल्या काही दिवसांपासून अनियमित वीजपुरवठ्यामुळे सिंचनात अडथळे येत आहेत, तर घरगुती वीजपुरवठाही खंडित होत आहे. त्यामुळे ग्रामस्थांनाही अडचणींचा सामना करावा लागत असून, लघु व्यवसायावर परिणाम होत आहे. ही समस्या सोडविण्यासाठी ग्रामस्थ, शेतकरी आसेगाव येथील कनिष्ठ अभियंत्याच्या कार्यालयात जात आहेत; परंतु हे कार्यालय गेल्या आठवडाभरापासून कुलूप बंद आहे. येथील कनिष्ठ अभियंत्यांची बदली झाल्यानंतर आठवडाभरापूर्वीच नव्या अभियंत्याची नियुक्ती करण्यात आली; परंतु पदभार स्वीकारल्यानंतर ते कार्यालयात फिरकलेच नाहीत. या संदर्भात महावितरणच्या मंगरूळपीर उपविभागीय अभियंत्यांनाही कोणतीच माहिती नसून, कनिष्ठ अभियंता पूर्वसूचनेशिवायच अनुपस्थित असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले. कनिष्ठ अभियंत्यांचे कार्यालयच बंद असल्याने आता समस्या कोणाकडे मांडाव्या आणि सुरळीत वीजपुरवठ्याची जबाबदारी कोण घेणार,  असा प्रश्न आसेगाव परिसरातील शेतकरी आणि घरगुती वीजग्राहकांकडून उपस्थित केला जात आहे.  

आसेगाव महावितरण कार्यालयात गत आठवड्यात नियुक्त कनिष्ठ अभियंत्यांच्या अनुपस्थितीबाबत आपणास कोणतीही कल्पना नाही. त्यांनी रजेबाबत कोणती सूचना किंवा पत्रही दिले नाही. याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली असून, कनिष्ठ अभियंत्यांच्या अनुपस्थितीचे कारण जाणून घेऊ.-हिरालाल जांभूळकर,उपविभागीय अभियंता, महावितरण मंगरुळपीर  

टॅग्स :mahavitaranमहावितरणwashimवाशिम