शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

वाशिम जिल्ह्यातील बहुतांश पाणी पुरवठा योजना ठप्पच 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2018 17:51 IST

वाशिम: पावसाळ्याला सुरुवात झाली असून, जिल्ह्यात १ जून पासून १९ जूनपर्यंत वार्षिक सरासरीच्या तुलनेत २४ टक्के पाऊस पडला; परंतु त्याचा फारसा परिणाम जलसाठ्यांवर झालेला नाही. जिल्ह्यातील ७७ प्रकल्प अद्यापही ठणठण असल्याने या प्रकल्पावर आधारित पाणी पुरवठा योजना ठप्पच आहेत. 

ठळक मुद्दे७७ प्रकल्पांत अद्यापही शुन्य टक्केच उपयुक्त जलसाठा असल्याने या प्रकल्पावरील पाणी पुरवठा योजना ठप्पच.प्रकल्पांवर अवलंबून असलेल्या गावांतील पाणीटंचाईची समस्या अद्यापही पूर्णपणे मिटलेली नाही.

वाशिम: पावसाळ्याला सुरुवात झाली असून, जिल्ह्यात १ जून पासून १९ जूनपर्यंत वार्षिक सरासरीच्या तुलनेत २४ टक्के पाऊस पडला; परंतु त्याचा फारसा परिणाम जलसाठ्यांवर झालेला नाही. जिल्ह्यातील ७७ प्रकल्प अद्यापही ठणठण असल्याने या प्रकल्पावर आधारित पाणी पुरवठा योजना ठप्पच आहेत. 

वाशिम जिल्ह्यात गत तीन वर्षांत सरासरी शंभर टक्के पाऊस झाला नाही. त्यातच मागील वर्षी वार्षिक सरासरीच्या तुलनेत केवळ ८४ टक्के पाऊस पडला. पाऊस कमी पडल्याने जलस्त्रोत आटले असताना कूपनलिका, हातपंप, विहीरीसारख्या खाजगी आणि सार्वजनिक जलस्त्रोतातून उपशाचे प्रमाण वाढले आणि त्याचा परिणाम भूजल पातळीवर झाला. त्यामुळे जिल्ह्याची भूजल पातळी २ मीटरपेक्षा अधिक खालावली. प्रकल्प कोरडे पडले होते. आता पावसाळ्याला सुरुवात झाली आणि मान्सूनपूर्व पावसाचे प्रमाण धरून १ जून ते १८ जूनपर्यंतच्या कालावधित जिल्ह्यात २४ टक्क्यांहून अधिक पाऊस पडला. यामुळे विहिरी, कूपनलिकांची पातळी थोडी वाढली असली तरी, रखरखत्या उन्हात आटलेल्या प्रकल्प क्षेत्रातील झालेली जमिनीची धूप आणि घटलेल्या भूजल पातळीमुळे जिल्ह्यातील प्रकल्पांत फारसा जलसाठाच झालेला नाही. त्यातच ७७ प्रकल्पांत अद्यापही शुन्य टक्केच उपयुक्त जलसाठा असल्याने या प्रकल्पावरील पाणी पुरवठा योजना ठप्पच असून, या प्रकल्पांवर अवलंबून असलेल्या गावांतील पाणीटंचाईची समस्या अद्यापही पूर्णपणे मिटलेली नाही. जूनच्या पूर्वार्धात पडलेल्या पावसामुळे गावशिवारातील विहिरीची पातळी वाढली असल्याने गावकरी त्यावरच आपल्या गरजा भागवित असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. 

टॅग्स :washimवाशिमWaterपाणी